शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटेचा धोका!

By admin | Updated: May 29, 2015 00:09 IST

पृथ्वीवरील सातत्याने वाढत्या तापमानामुळे भविष्यात यापेक्षाही भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो,

नवी दिल्ली : देशभरात सध्या आलेली उष्णतेची लाट म्हणजे धोक्याचा इशारा आहे. पृथ्वीवरील सातत्याने वाढत्या तापमानामुळे भविष्यात यापेक्षाही भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एनव्हायर्नमेंटने (सीएसई) गुरुवारी वर्तविली.मागील पंधरवड्यात देशभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेने दोन हजारांवर लोकांचे बळी घेतले. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये याची भीषणता अधिक असून येथील कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे.हवामानाशी संबंधित आकडेवारीनुसार मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगमुळे (तापमानात वाढ) २०१४ हे सर्वाधिक उष्ण वर्ष राहिले. भारतातील सर्वात उष्ण १० वर्षांपैकी ८ वर्षे ही २००१ ते २०१० या दशकातील आहेत आणि त्या अनुषंगाने हे सर्वात उष्ण दशक ठरले आहे, असे सीएसईने अधोरेखित केले आहे. पृथ्वीवरील तापमानात मागील १०० वर्षांत सरासरी ०.८ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली असल्याने उष्णतेच्या लाटा आणखी वाढण्याची शक्यता आहे, असाही इशारा संघटनेने दिला आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या तापमानातही वाढ होत आहे. अहमदाबाद व दिल्लीत अलीकडेच रात्री ३९ व ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उष्णतेच्या लाटेचा कालावधी दरवर्षी पाच दिवसांवरून ३० ते ४० दिवस एवढा वाढू शकतो. २०१० च्या तुलनेत २०१५ साली उष्णतेच्या लाटेचा कालावधी कमी राहिला असला तरी यंदा मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)सीएसईच्या हवामान बदलविषयक कार्यक्रमाचे व्यवस्थापक अर्जुन श्रीनिधी यांच्या सांगण्यानुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बराच काळ तापमान कमी राहिल्यानंतर अचानक झालेला बदल हे यामागील कारण असू शकते. उष्णतेच्या या अभूतपूर्व लाटेनंतर आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला वैद्यकीय मदतीसह इतर सहकार्य केले आहे. या क्षेत्रात उष्णतेने १२०० लोकांचा बळी घेतला. मंत्रालय सर्व राज्यांना सतर्कतेची सूचनाही देऊ शकते. ४तीन दशकांमध्ये एखाद्या ठराविक दिवशी सरासरीपेक्षा पाच अथवा त्यापेक्षा अधिक अंश तापमानाची नोंद होते तेव्हा उष्णतेची लाट आल्याचे जाहीर केले जाते. ४शहरांमध्ये वाढलेली काँक्रीटची जंगले व हिरवळ व वृक्षांची कमतरता यामुळे तापमान वाढीचा अधिक त्रास होतो. याला ‘अर्बन हीट आयलँड इफेक्ट’ असे म्हणतात. यामुळे जेवढे तापमान असते त्यापेक्षा तीन ते चार अंश अधिक जास्त असल्याचे जाणवते.