शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
2
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
4
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
5
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
6
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
7
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
8
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
9
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
10
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
11
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
12
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
13
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
14
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
15
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
16
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
17
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
18
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
19
Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
20
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल

वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटेचा धोका!

By admin | Updated: May 29, 2015 00:09 IST

पृथ्वीवरील सातत्याने वाढत्या तापमानामुळे भविष्यात यापेक्षाही भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो,

नवी दिल्ली : देशभरात सध्या आलेली उष्णतेची लाट म्हणजे धोक्याचा इशारा आहे. पृथ्वीवरील सातत्याने वाढत्या तापमानामुळे भविष्यात यापेक्षाही भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एनव्हायर्नमेंटने (सीएसई) गुरुवारी वर्तविली.मागील पंधरवड्यात देशभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेने दोन हजारांवर लोकांचे बळी घेतले. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये याची भीषणता अधिक असून येथील कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे.हवामानाशी संबंधित आकडेवारीनुसार मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगमुळे (तापमानात वाढ) २०१४ हे सर्वाधिक उष्ण वर्ष राहिले. भारतातील सर्वात उष्ण १० वर्षांपैकी ८ वर्षे ही २००१ ते २०१० या दशकातील आहेत आणि त्या अनुषंगाने हे सर्वात उष्ण दशक ठरले आहे, असे सीएसईने अधोरेखित केले आहे. पृथ्वीवरील तापमानात मागील १०० वर्षांत सरासरी ०.८ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली असल्याने उष्णतेच्या लाटा आणखी वाढण्याची शक्यता आहे, असाही इशारा संघटनेने दिला आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या तापमानातही वाढ होत आहे. अहमदाबाद व दिल्लीत अलीकडेच रात्री ३९ व ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उष्णतेच्या लाटेचा कालावधी दरवर्षी पाच दिवसांवरून ३० ते ४० दिवस एवढा वाढू शकतो. २०१० च्या तुलनेत २०१५ साली उष्णतेच्या लाटेचा कालावधी कमी राहिला असला तरी यंदा मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)सीएसईच्या हवामान बदलविषयक कार्यक्रमाचे व्यवस्थापक अर्जुन श्रीनिधी यांच्या सांगण्यानुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बराच काळ तापमान कमी राहिल्यानंतर अचानक झालेला बदल हे यामागील कारण असू शकते. उष्णतेच्या या अभूतपूर्व लाटेनंतर आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला वैद्यकीय मदतीसह इतर सहकार्य केले आहे. या क्षेत्रात उष्णतेने १२०० लोकांचा बळी घेतला. मंत्रालय सर्व राज्यांना सतर्कतेची सूचनाही देऊ शकते. ४तीन दशकांमध्ये एखाद्या ठराविक दिवशी सरासरीपेक्षा पाच अथवा त्यापेक्षा अधिक अंश तापमानाची नोंद होते तेव्हा उष्णतेची लाट आल्याचे जाहीर केले जाते. ४शहरांमध्ये वाढलेली काँक्रीटची जंगले व हिरवळ व वृक्षांची कमतरता यामुळे तापमान वाढीचा अधिक त्रास होतो. याला ‘अर्बन हीट आयलँड इफेक्ट’ असे म्हणतात. यामुळे जेवढे तापमान असते त्यापेक्षा तीन ते चार अंश अधिक जास्त असल्याचे जाणवते.