शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटेचा धोका!

By admin | Updated: May 29, 2015 00:09 IST

पृथ्वीवरील सातत्याने वाढत्या तापमानामुळे भविष्यात यापेक्षाही भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो,

नवी दिल्ली : देशभरात सध्या आलेली उष्णतेची लाट म्हणजे धोक्याचा इशारा आहे. पृथ्वीवरील सातत्याने वाढत्या तापमानामुळे भविष्यात यापेक्षाही भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एनव्हायर्नमेंटने (सीएसई) गुरुवारी वर्तविली.मागील पंधरवड्यात देशभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेने दोन हजारांवर लोकांचे बळी घेतले. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये याची भीषणता अधिक असून येथील कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे.हवामानाशी संबंधित आकडेवारीनुसार मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगमुळे (तापमानात वाढ) २०१४ हे सर्वाधिक उष्ण वर्ष राहिले. भारतातील सर्वात उष्ण १० वर्षांपैकी ८ वर्षे ही २००१ ते २०१० या दशकातील आहेत आणि त्या अनुषंगाने हे सर्वात उष्ण दशक ठरले आहे, असे सीएसईने अधोरेखित केले आहे. पृथ्वीवरील तापमानात मागील १०० वर्षांत सरासरी ०.८ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली असल्याने उष्णतेच्या लाटा आणखी वाढण्याची शक्यता आहे, असाही इशारा संघटनेने दिला आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या तापमानातही वाढ होत आहे. अहमदाबाद व दिल्लीत अलीकडेच रात्री ३९ व ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उष्णतेच्या लाटेचा कालावधी दरवर्षी पाच दिवसांवरून ३० ते ४० दिवस एवढा वाढू शकतो. २०१० च्या तुलनेत २०१५ साली उष्णतेच्या लाटेचा कालावधी कमी राहिला असला तरी यंदा मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)सीएसईच्या हवामान बदलविषयक कार्यक्रमाचे व्यवस्थापक अर्जुन श्रीनिधी यांच्या सांगण्यानुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बराच काळ तापमान कमी राहिल्यानंतर अचानक झालेला बदल हे यामागील कारण असू शकते. उष्णतेच्या या अभूतपूर्व लाटेनंतर आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला वैद्यकीय मदतीसह इतर सहकार्य केले आहे. या क्षेत्रात उष्णतेने १२०० लोकांचा बळी घेतला. मंत्रालय सर्व राज्यांना सतर्कतेची सूचनाही देऊ शकते. ४तीन दशकांमध्ये एखाद्या ठराविक दिवशी सरासरीपेक्षा पाच अथवा त्यापेक्षा अधिक अंश तापमानाची नोंद होते तेव्हा उष्णतेची लाट आल्याचे जाहीर केले जाते. ४शहरांमध्ये वाढलेली काँक्रीटची जंगले व हिरवळ व वृक्षांची कमतरता यामुळे तापमान वाढीचा अधिक त्रास होतो. याला ‘अर्बन हीट आयलँड इफेक्ट’ असे म्हणतात. यामुळे जेवढे तापमान असते त्यापेक्षा तीन ते चार अंश अधिक जास्त असल्याचे जाणवते.