शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटेचा धोका!

By admin | Updated: May 29, 2015 00:09 IST

पृथ्वीवरील सातत्याने वाढत्या तापमानामुळे भविष्यात यापेक्षाही भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो,

नवी दिल्ली : देशभरात सध्या आलेली उष्णतेची लाट म्हणजे धोक्याचा इशारा आहे. पृथ्वीवरील सातत्याने वाढत्या तापमानामुळे भविष्यात यापेक्षाही भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एनव्हायर्नमेंटने (सीएसई) गुरुवारी वर्तविली.मागील पंधरवड्यात देशभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेने दोन हजारांवर लोकांचे बळी घेतले. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये याची भीषणता अधिक असून येथील कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे.हवामानाशी संबंधित आकडेवारीनुसार मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगमुळे (तापमानात वाढ) २०१४ हे सर्वाधिक उष्ण वर्ष राहिले. भारतातील सर्वात उष्ण १० वर्षांपैकी ८ वर्षे ही २००१ ते २०१० या दशकातील आहेत आणि त्या अनुषंगाने हे सर्वात उष्ण दशक ठरले आहे, असे सीएसईने अधोरेखित केले आहे. पृथ्वीवरील तापमानात मागील १०० वर्षांत सरासरी ०.८ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली असल्याने उष्णतेच्या लाटा आणखी वाढण्याची शक्यता आहे, असाही इशारा संघटनेने दिला आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या तापमानातही वाढ होत आहे. अहमदाबाद व दिल्लीत अलीकडेच रात्री ३९ व ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उष्णतेच्या लाटेचा कालावधी दरवर्षी पाच दिवसांवरून ३० ते ४० दिवस एवढा वाढू शकतो. २०१० च्या तुलनेत २०१५ साली उष्णतेच्या लाटेचा कालावधी कमी राहिला असला तरी यंदा मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)सीएसईच्या हवामान बदलविषयक कार्यक्रमाचे व्यवस्थापक अर्जुन श्रीनिधी यांच्या सांगण्यानुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बराच काळ तापमान कमी राहिल्यानंतर अचानक झालेला बदल हे यामागील कारण असू शकते. उष्णतेच्या या अभूतपूर्व लाटेनंतर आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला वैद्यकीय मदतीसह इतर सहकार्य केले आहे. या क्षेत्रात उष्णतेने १२०० लोकांचा बळी घेतला. मंत्रालय सर्व राज्यांना सतर्कतेची सूचनाही देऊ शकते. ४तीन दशकांमध्ये एखाद्या ठराविक दिवशी सरासरीपेक्षा पाच अथवा त्यापेक्षा अधिक अंश तापमानाची नोंद होते तेव्हा उष्णतेची लाट आल्याचे जाहीर केले जाते. ४शहरांमध्ये वाढलेली काँक्रीटची जंगले व हिरवळ व वृक्षांची कमतरता यामुळे तापमान वाढीचा अधिक त्रास होतो. याला ‘अर्बन हीट आयलँड इफेक्ट’ असे म्हणतात. यामुळे जेवढे तापमान असते त्यापेक्षा तीन ते चार अंश अधिक जास्त असल्याचे जाणवते.