शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
2
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
3
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
4
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
5
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
6
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
7
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
8
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
9
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
10
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
11
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
12
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
13
सुख-शांती हिरावून घेऊ शकतं स्मार्टफोनचं व्यसन; 'या' आजारांचा धोका, काय आहे Nomophobia?
14
पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण
15
"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक
16
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
17
'भाजपशासित राज्ये पेपरफुटीची केंद्रे बनली', NEET परीक्षेतील गोंधळावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
18
Paras Defence And Space Technologies : एका दिवसात २० टक्क्यांचे रिटर्न; 'या' स्मॉलकॅप डिफेन्स कंपनीचे शेअर्स का बनलेत रॉकेट?
19
'मला न्याय द्या...', स्वाती मालीवाल यांचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; भेटीची वेळ मागितली!
20
वयानुसार किती वेळ आणि कोणता प्रकारचा करावा व्यायाम?; WHO ने दिल्या गाइडलाईन्स

'अती उकाडा आणि अज्ञानी स्टाफमुळे झाला VVPATमध्ये बिघाड'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2018 1:19 PM

व्हीव्हीपॅट मशिन्सला जास्त प्रकाशापासून वाचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

नवी दिल्ली- अती उकाडा व अज्ञानी स्टाफमुळे गोंदिया आणि कैराना जागेसाठी झालेल्या मतदानाच्या वेळी व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड झाल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं आहे. व्हीव्हीपॅट मशिन्सला जास्त प्रकाशापासून वाचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या मशिन्स नव्याने तयार करण्यात आल्या आहेत, त्या मशिनला अती उजेडापासून दूर ठेवणं गरजेचं आहे, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं आहे. 28 मे रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत काही मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. उत्तर प्रदेशातील कैराना आणि महाराष्ट्राच्या गोंदियामधील मतदानावेळी व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड झाला होता. त्यावेळी कैरानामध्ये 20.8 टक्के आणि गोंदियामध्ये 19.22 व्हीव्हीपॅट बदलावे लागले. 

व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर निवडणुक आयोगाने त्यासंदर्भातील तपास केला. ज्या मशिन पहिल्यांदाच वापरात आल्या त्याच मशिनमध्ये बिघाड झाल्याचं निरिक्षण निवडणूक आयोगाने नोंदवलं आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पोटनिवडणुकीदरम्यान जवळपास 4 हजार नव्या व्हीव्हीपॅट मशिन्स वापरण्यात आल्या. यापैकी जास्त मशिन्स अती उकाड्यात ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मशिन्समध्ये बिघाड झाला. मशिन बनविणाऱ्या कंपनीने आधीच याबद्दल सांगितलं असल्याचंही समोर येत आहे. 

कमिटीने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की, व्हीव्हीपॅट मशिन्सची देखभाल करण्याची जबाबदारी ज्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती ते कर्माचारी अज्ञानी होते. त्या कर्मचाऱ्यांना मशिन्सबद्दल काहीही माहिती नव्हती. त्या कर्मचाऱ्यांनी मशिन्स अती प्रकाशात आणि उकाड्यात ठेववल्या ज्यामुळे मशिन्स खराब झाल्या. पोटनिवडणुकीदरम्यान खराब झालेल्या सर्व मशिनची तांत्रिकदृष्ट्या तपासणी केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.