शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

सत्तासंघर्षाची सुनावणी आता २९ नोव्हेंबरला; दोन्ही बाजूंच्या वकिलांशी चर्चा करुन निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 06:30 IST

सध्याच्या स्थितीमुळे जनतेच्या मनात अस्वस्थता असून, सर्वच राजकीय पक्ष ‘घटनात्मक नैतिकता’ टिकविण्यात अपयशी ठरले आहेत.

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर सुरू असलेल्या प्रकरणांची पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होईल. सुप्रीम कोर्टाचे न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. 

या प्रकरणी आता प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मतदारांच्या वतीने घटनात्मक नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करीत याचिका दाखल केली. त्यांच्या वतीने वकील असीम सरोदे व ज्येष्ठ विधिज्ञ अशोककुमार गुप्ता यांनी मतदारांच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल केली. याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकण्याची विनंती घटनापीठाने मान्य केली.

सध्याच्या स्थितीमुळे जनतेच्या मनात अस्वस्थता असून, सर्वच राजकीय पक्ष ‘घटनात्मक नैतिकता’ टिकविण्यात अपयशी ठरले आहेत.  अनेक नेत्यांनी घटनात्मक नैतिकतेचे उल्लंघन केल्याचे या सर्व घटनाक्रमात उघड झाले आहे. नेत्यांना राज्यघटनेबद्दल आता काही आस्था आहे, असे वाटत नाही, असे याचिकेत म्हटले आहे. 

याचिकाकर्त्याने ऐतिहासिक केशवानंद भारती निकालाचा दाखला यावेळी दिला. ‘घटनात्मक परंपरांचे उल्लंघन हे घटनात्मक नैतिकेतेचा भंग’ असल्याचे मत केशवानंद भारती खटल्याचा निकाल देताना कोर्टाने नोंदविले होते. घटनापीठाने यासंदर्भातील बाजू लिखित स्वरूपात मांडण्याची सूचना केली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सहमतीने चर्चा करून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लिखित स्वरूपात द्यावेत, अशी सूचना घटनापीठाने केली. यासाठी घटनापीठाने चार आठवड्यांचा वेळ दिला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार