शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सत्तासंघर्षाची सुनावणी आता २९ नोव्हेंबरला; दोन्ही बाजूंच्या वकिलांशी चर्चा करुन निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 06:30 IST

सध्याच्या स्थितीमुळे जनतेच्या मनात अस्वस्थता असून, सर्वच राजकीय पक्ष ‘घटनात्मक नैतिकता’ टिकविण्यात अपयशी ठरले आहेत.

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर सुरू असलेल्या प्रकरणांची पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होईल. सुप्रीम कोर्टाचे न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. 

या प्रकरणी आता प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मतदारांच्या वतीने घटनात्मक नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करीत याचिका दाखल केली. त्यांच्या वतीने वकील असीम सरोदे व ज्येष्ठ विधिज्ञ अशोककुमार गुप्ता यांनी मतदारांच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल केली. याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकण्याची विनंती घटनापीठाने मान्य केली.

सध्याच्या स्थितीमुळे जनतेच्या मनात अस्वस्थता असून, सर्वच राजकीय पक्ष ‘घटनात्मक नैतिकता’ टिकविण्यात अपयशी ठरले आहेत.  अनेक नेत्यांनी घटनात्मक नैतिकतेचे उल्लंघन केल्याचे या सर्व घटनाक्रमात उघड झाले आहे. नेत्यांना राज्यघटनेबद्दल आता काही आस्था आहे, असे वाटत नाही, असे याचिकेत म्हटले आहे. 

याचिकाकर्त्याने ऐतिहासिक केशवानंद भारती निकालाचा दाखला यावेळी दिला. ‘घटनात्मक परंपरांचे उल्लंघन हे घटनात्मक नैतिकेतेचा भंग’ असल्याचे मत केशवानंद भारती खटल्याचा निकाल देताना कोर्टाने नोंदविले होते. घटनापीठाने यासंदर्भातील बाजू लिखित स्वरूपात मांडण्याची सूचना केली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सहमतीने चर्चा करून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लिखित स्वरूपात द्यावेत, अशी सूचना घटनापीठाने केली. यासाठी घटनापीठाने चार आठवड्यांचा वेळ दिला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार