शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मध्य प्रदेशातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 05:35 IST

मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारने खरंच बहुमत गमावले आहे का याचा फैसला विधानसभेत कधी व कसा करावा याचा वाद आता भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात नेला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारने खरंच बहुमत गमावले आहे का याचा फैसला विधानसभेत कधी व कसा करावा याचा वाद आता भाजपाकाँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात नेला आहे. यावर उद्या बुधवारी सुनावणी होऊन काही मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे.कमलनाथ सरकारला विधानसभेत तात्काळ बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यावा, यासाठी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह १० भाजपा आमदारांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा काढून उद्या तातडीने सुनावणी घेण्याचे ठरविले. या सुनावणीत सहभागी होण्यासाठी १७ बंडखोर काँग्रेस आमदारांनीही अर्ज केला आहे. कोरोनामुळे अधिवेशन २७ पर्यंत तहकूब असूनही विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याच्या राज्यपालांच्या निर्देशाविरुद्ध काँग्रेसने याचिका केली आहे.लोकशाहीची हत्याभाजपाने पळवून डांबून ठेवलेले आमदार मुक्त झाल्याखेरीज विश्वासदर्शक ठरावाची बळजबरी करणे ही लोकशाहीची हत्या आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.बंडखोरांशी संपर्क साधू द्यावा -काँग्रेसनवी दिल्ली : मध्यप्रदेश काँग्रेस पक्षाने आपल्या बंडखोर आमदारांशी संपर्क साधू दिला जावा म्हणून केंद्र सरकार आणि कर्नाटक राज्य सरकारला आदेश द्यावा, अशी मागणी केलेली याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केली.मध्यप्रदेश विधानसभेत तात्काळ बहुमताची चाचणी घेतली जावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यावर बुधवारी आपले म्हणणे मांडण्यास न्यायालयाने कमल नाथ सरकारला आदेश दिला.काँग्रेसनेही दाखल केली याचिकाकेंद्रातील भाजपा सरकार सूत्रे हलवीत आहे. आमच्या आमदारांना भाजपाशासित कर्नाटकमध्ये नेऊन डांबून ठेवणे व राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाचा तगादा लावणे हा त्याचाच भाग आहे, असा आरोप काँग्रेसच्या याचिकेत करण्यात आला आहे.दरम्यान, राज्यपालांनी सांगूनही विश्वासदर्शक ठरावासाठी विधानसभेची बैठक आज मंगळवारी घेण्यात आली नाही.काँग्रेसचे आणखी २० आमदार आमच्यासोबत -बंडखोरांचा दावाबंगळुरू : मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या आमदारांनी काँग्रेसमधील आणखी आमदार आमच्यासोबत येण्यास तयार असल्याचा व येत्या काही दिवसांत ते भाजपमध्येही येण्याचा विचार करतील असा दावा मंगळवारी येथे केला.बंगळुरूत आल्यापासून व आपले पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिल्यानंतर प्रथमच वार्ताहरांशी बोलताना हे २२ आमदार म्हणाले की, कोणत्याही परिणामांना तोंड देण्यास आम्ही तयार आहोत. ‘‘ज्योतिरादित्य शिंदे हे आमचे नेते आहेत.अनेक वर्षांपासून आम्ही त्यांच्यासोबत राजकारण करीत आहोत व आमच्यापैकी अनेक जण हे त्यांच्याचमुळे राजकारणात आहेत. आम्ही अजूनही भाजपमध्ये दाखल होण्याचा विचार करीत आहोत.’’ आम्हाला जर केंद्रातील पोलिसांचे संरक्षण असेल, तर आम्ही मध्यप्रदेशमध्ये जाऊन त्यावर विचार करू, असे महिला आमदारम्हणाल्या.या आमदारांचा दावा असा आहे की, ‘‘आमच्यासोबत आणखी २० आमदार असले तरी त्यांना बंदी बनवून ठेवण्यात आले आहे. तेदेखील आमच्यासोबत आले तर काँग्रेस कोलमडून पडणार हे स्पष्टच आहे आणि त्या गटावर कोणताही कायदा लादला जाऊ शकणार नाही.’’ आम्ही कोणत्याही परिणामांना तोंड देण्यास तयार असून, आमच्या मतदारसंघांतील लोक आमच्यासोबत आहेत, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्योतिरादित्य शिंदे हे ११ मार्च रोजी भाजपमध्ये दाखल झाले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा