शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मध्य प्रदेशातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 05:35 IST

मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारने खरंच बहुमत गमावले आहे का याचा फैसला विधानसभेत कधी व कसा करावा याचा वाद आता भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात नेला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारने खरंच बहुमत गमावले आहे का याचा फैसला विधानसभेत कधी व कसा करावा याचा वाद आता भाजपाकाँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात नेला आहे. यावर उद्या बुधवारी सुनावणी होऊन काही मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे.कमलनाथ सरकारला विधानसभेत तात्काळ बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यावा, यासाठी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह १० भाजपा आमदारांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा काढून उद्या तातडीने सुनावणी घेण्याचे ठरविले. या सुनावणीत सहभागी होण्यासाठी १७ बंडखोर काँग्रेस आमदारांनीही अर्ज केला आहे. कोरोनामुळे अधिवेशन २७ पर्यंत तहकूब असूनही विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याच्या राज्यपालांच्या निर्देशाविरुद्ध काँग्रेसने याचिका केली आहे.लोकशाहीची हत्याभाजपाने पळवून डांबून ठेवलेले आमदार मुक्त झाल्याखेरीज विश्वासदर्शक ठरावाची बळजबरी करणे ही लोकशाहीची हत्या आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.बंडखोरांशी संपर्क साधू द्यावा -काँग्रेसनवी दिल्ली : मध्यप्रदेश काँग्रेस पक्षाने आपल्या बंडखोर आमदारांशी संपर्क साधू दिला जावा म्हणून केंद्र सरकार आणि कर्नाटक राज्य सरकारला आदेश द्यावा, अशी मागणी केलेली याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केली.मध्यप्रदेश विधानसभेत तात्काळ बहुमताची चाचणी घेतली जावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यावर बुधवारी आपले म्हणणे मांडण्यास न्यायालयाने कमल नाथ सरकारला आदेश दिला.काँग्रेसनेही दाखल केली याचिकाकेंद्रातील भाजपा सरकार सूत्रे हलवीत आहे. आमच्या आमदारांना भाजपाशासित कर्नाटकमध्ये नेऊन डांबून ठेवणे व राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाचा तगादा लावणे हा त्याचाच भाग आहे, असा आरोप काँग्रेसच्या याचिकेत करण्यात आला आहे.दरम्यान, राज्यपालांनी सांगूनही विश्वासदर्शक ठरावासाठी विधानसभेची बैठक आज मंगळवारी घेण्यात आली नाही.काँग्रेसचे आणखी २० आमदार आमच्यासोबत -बंडखोरांचा दावाबंगळुरू : मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या आमदारांनी काँग्रेसमधील आणखी आमदार आमच्यासोबत येण्यास तयार असल्याचा व येत्या काही दिवसांत ते भाजपमध्येही येण्याचा विचार करतील असा दावा मंगळवारी येथे केला.बंगळुरूत आल्यापासून व आपले पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिल्यानंतर प्रथमच वार्ताहरांशी बोलताना हे २२ आमदार म्हणाले की, कोणत्याही परिणामांना तोंड देण्यास आम्ही तयार आहोत. ‘‘ज्योतिरादित्य शिंदे हे आमचे नेते आहेत.अनेक वर्षांपासून आम्ही त्यांच्यासोबत राजकारण करीत आहोत व आमच्यापैकी अनेक जण हे त्यांच्याचमुळे राजकारणात आहेत. आम्ही अजूनही भाजपमध्ये दाखल होण्याचा विचार करीत आहोत.’’ आम्हाला जर केंद्रातील पोलिसांचे संरक्षण असेल, तर आम्ही मध्यप्रदेशमध्ये जाऊन त्यावर विचार करू, असे महिला आमदारम्हणाल्या.या आमदारांचा दावा असा आहे की, ‘‘आमच्यासोबत आणखी २० आमदार असले तरी त्यांना बंदी बनवून ठेवण्यात आले आहे. तेदेखील आमच्यासोबत आले तर काँग्रेस कोलमडून पडणार हे स्पष्टच आहे आणि त्या गटावर कोणताही कायदा लादला जाऊ शकणार नाही.’’ आम्ही कोणत्याही परिणामांना तोंड देण्यास तयार असून, आमच्या मतदारसंघांतील लोक आमच्यासोबत आहेत, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्योतिरादित्य शिंदे हे ११ मार्च रोजी भाजपमध्ये दाखल झाले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा