शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

मध्य प्रदेशातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 05:35 IST

मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारने खरंच बहुमत गमावले आहे का याचा फैसला विधानसभेत कधी व कसा करावा याचा वाद आता भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात नेला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारने खरंच बहुमत गमावले आहे का याचा फैसला विधानसभेत कधी व कसा करावा याचा वाद आता भाजपाकाँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात नेला आहे. यावर उद्या बुधवारी सुनावणी होऊन काही मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे.कमलनाथ सरकारला विधानसभेत तात्काळ बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यावा, यासाठी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह १० भाजपा आमदारांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा काढून उद्या तातडीने सुनावणी घेण्याचे ठरविले. या सुनावणीत सहभागी होण्यासाठी १७ बंडखोर काँग्रेस आमदारांनीही अर्ज केला आहे. कोरोनामुळे अधिवेशन २७ पर्यंत तहकूब असूनही विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याच्या राज्यपालांच्या निर्देशाविरुद्ध काँग्रेसने याचिका केली आहे.लोकशाहीची हत्याभाजपाने पळवून डांबून ठेवलेले आमदार मुक्त झाल्याखेरीज विश्वासदर्शक ठरावाची बळजबरी करणे ही लोकशाहीची हत्या आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.बंडखोरांशी संपर्क साधू द्यावा -काँग्रेसनवी दिल्ली : मध्यप्रदेश काँग्रेस पक्षाने आपल्या बंडखोर आमदारांशी संपर्क साधू दिला जावा म्हणून केंद्र सरकार आणि कर्नाटक राज्य सरकारला आदेश द्यावा, अशी मागणी केलेली याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केली.मध्यप्रदेश विधानसभेत तात्काळ बहुमताची चाचणी घेतली जावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यावर बुधवारी आपले म्हणणे मांडण्यास न्यायालयाने कमल नाथ सरकारला आदेश दिला.काँग्रेसनेही दाखल केली याचिकाकेंद्रातील भाजपा सरकार सूत्रे हलवीत आहे. आमच्या आमदारांना भाजपाशासित कर्नाटकमध्ये नेऊन डांबून ठेवणे व राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाचा तगादा लावणे हा त्याचाच भाग आहे, असा आरोप काँग्रेसच्या याचिकेत करण्यात आला आहे.दरम्यान, राज्यपालांनी सांगूनही विश्वासदर्शक ठरावासाठी विधानसभेची बैठक आज मंगळवारी घेण्यात आली नाही.काँग्रेसचे आणखी २० आमदार आमच्यासोबत -बंडखोरांचा दावाबंगळुरू : मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या आमदारांनी काँग्रेसमधील आणखी आमदार आमच्यासोबत येण्यास तयार असल्याचा व येत्या काही दिवसांत ते भाजपमध्येही येण्याचा विचार करतील असा दावा मंगळवारी येथे केला.बंगळुरूत आल्यापासून व आपले पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिल्यानंतर प्रथमच वार्ताहरांशी बोलताना हे २२ आमदार म्हणाले की, कोणत्याही परिणामांना तोंड देण्यास आम्ही तयार आहोत. ‘‘ज्योतिरादित्य शिंदे हे आमचे नेते आहेत.अनेक वर्षांपासून आम्ही त्यांच्यासोबत राजकारण करीत आहोत व आमच्यापैकी अनेक जण हे त्यांच्याचमुळे राजकारणात आहेत. आम्ही अजूनही भाजपमध्ये दाखल होण्याचा विचार करीत आहोत.’’ आम्हाला जर केंद्रातील पोलिसांचे संरक्षण असेल, तर आम्ही मध्यप्रदेशमध्ये जाऊन त्यावर विचार करू, असे महिला आमदारम्हणाल्या.या आमदारांचा दावा असा आहे की, ‘‘आमच्यासोबत आणखी २० आमदार असले तरी त्यांना बंदी बनवून ठेवण्यात आले आहे. तेदेखील आमच्यासोबत आले तर काँग्रेस कोलमडून पडणार हे स्पष्टच आहे आणि त्या गटावर कोणताही कायदा लादला जाऊ शकणार नाही.’’ आम्ही कोणत्याही परिणामांना तोंड देण्यास तयार असून, आमच्या मतदारसंघांतील लोक आमच्यासोबत आहेत, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्योतिरादित्य शिंदे हे ११ मार्च रोजी भाजपमध्ये दाखल झाले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा