शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

...जिन के सर हो इश्कही छाँव, पाँव के निचे जन्नत होगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 05:27 IST

कहानीमे गाने होते है, और उन नज्मोंके पीछे कहानीया होती! मै चाहू, तो भी ना बता पाऊ की क्या बितती है, जब मै फिल्मोंके लिए गाने लिखता हूं...

- अपर्णा वेलणकर डिग्गी पॅलेस, जयपूर : कहानीमे गाने होते है, और उन नज्मोंके पीछे कहानीया होती! मै चाहू, तो भी ना बता पाऊ की क्या बितती है, जब मै फिल्मोंके लिए गाने लिखता हूं... लेकिन इतना जरूर है, की मै चाहता हूं, मेरे गाने के छिलके निकाले जा सके!उपरका छिलका निकाले, तो अंदर कुछ और मिले...’निर्मितीचे मर्म उलगडण्याचा प्रयत्न गुलजार करत होते. जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलला उसळलेली प्रचंड गर्दी ते मखमली अस्तराचे प्रांजळ मनोगत ऐकत होती!चाल आधी येते की शब्द? सांगीतल्याबरहकूम गाणे लिहिणे ही कवीसाठी शिक्षा नसते का? तुम्हाला संगीतकारांसाठी पुन्हा पुन्हा लिहावे-बदलावे लागते का?- असे प्रश्न चर्चेचे सूत्रसंचालक संजोय गुप्ता यांनी विचारले तेव्हा गुलजार हसून म्हणाले, ‘मी गेली दोनशे वर्षे हेच तर सांगतो आहे, की सिनेमासाठी लिहिताना चाल आधी येते आणि मग शब्द. सिनेमात जिथे गाणे असणार त्या प्रसंगाची पार्श्वभूमी, जे पात्र ते गाणार त्याचे व्यक्तिमत्वव भाषा हे लक्षात घ्यावे लागतेच. शब्दांना स्वर मिळतात, त्या गणितानुसार पुन्हा पुन्हा लिहावे लागतेच. त्यात काय बिघडले? ...आपने जो लिख दिया, जरा मुडके देखे तो की क्या लिखा है!! तुम्हालाच एखादा शब्द बदलावा वाटेल, एखादी ओळ पुन्हा रचावीशी वाटेल!!’’रहमान, विशाल भारद्वाज अशा प्रतिभाशाली संगीतकारांबरोबर काम करण्याचे अनुभव गुलजार यांनी सांगितले. दहा शिव्याशिवाय म्हणणे मांडूच शकणार नाही, अशा मुलीच्या व्यक्तिरेखेसाठी गाणे लिहायचा प्रसंग आला, तेव्हा ‘जा पडोसीके चुल्हेसे आग लै ले’- चा तिरका, थेट ठसका आपसूक आला असे गुलजार म्हणाले, तेव्हा ‘बिडी जलाईले’च्या तिखट चटक्याने सारेच घायाळ झाले होते.तुमचे उर्दूवर अधिक प्रेम आहे, असे म्हणताच गुलजार यांनी दोन भाषांचे मीलन किती स्वाभाविक असते याची उदाहरणे दिली. ते गंमतीत म्हणाले की उजवीकडून डावीकडे लिहिले की हिंदी असते व डावीकडून उजवीकडे लिहिले तर उर्दू!सध्याच्या गाण्यांमध्ये शिव्या व गलिच्छ शब्दांचा वापर असतो, त्याचा तुम्हाला त्रास होत नाही का? तेव्हा गुलजार म्हणाले, तरुण पिढी भाषेशी खेळणार, हे स्वाभाविकच. त्यांच्या भाषेची मला काळजी आहेच, पण भाषेच्या संपन्नतेचा वारसा ज्येष्ठ पिढीकडून येतो. हल्ली ज्येष्ठ लोक चारचौघात वापरतात त्या भाषेतली उद्धट हिंसा मला चिंतित करते. आप दोस्तीकी बात कर रहे हो या दुश्मनीकी, जब बात करे तो शब्दोंका प्रयोग जरा संभालके करे. इतनाही मै चाहूंगा!उषा उथुप यांच्या सळसळत्या गायनाने महोत्सवाचा दुसरा दिवस सुरू झाला. दिवसभर चर्चा व परिसंवादांची रेलचेल होती.>‘आंधी’ : तेव्हा आणि आत्ता!इतक्या वर्षांपूर्वी तुम्ही तत्कालीन राजकीय वातावरणावर ‘आंधी’ हा चित्रपट केला होता, आजचे वातावरण तर त्याहून अधिक बिघडलेले आहे. ‘आंधी’ चा दुसरा भाग बनवावा असे तुम्हाला आत्ता वाटते आहे का?- असा थेट प्रश्न प्रेक्षकांंमधल्या गृहस्थांनी केला. त्यावर गुलजार म्हणाले, ती माझ्या काळाची कहाणी होती. आजच्या काळाची कहाणी वेगळी आहे, ती आजच्या तरुण लेखक-दिग्दर्शकांनी पडद्यावर आणावी. कहानी आज की है, तो आज जिनका है, उन्हें ये सवाल पुंछिंये!

टॅग्स :gulzarगुलजार