शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

त्यानं मोटारबाइकवरून फेकली वरमाळा आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:38 IST

मुलीच्या घरच्यांनी दिला चोप : पोलिसांनी सुनावले; दोघेही सज्ञान असल्याने तुम्ही काहीही करू शकत नाही

नायिकेच्या वडिलांनी तिचा विवाह तिला न आवडलेल्या व्यक्तीशी वा चक्क खलनायकाशीच ठरवलेलं असतं. लग्नाचे विधी सुरू होतात. ती तणावाखाली असते. अचानक नायक तिथे पोहोचतो. तिला पाहून तिच्या जीवात जीव येतो. नायक मग सर्वांच्या समोर तिला घेऊ न जातो आणि मंडपातील सारेच स्तंभित होतात. हे आपण सर्वांनी अनेकदा चित्रपटांत पाहिलं आहे.पण प्रत्यक्षात असं क्वचितच घडतं. असाच एक प्रकार घडला. एक तरुण व तरुणीचं कॉलेजात असतानाचं प्रेम होतं. पण दोघांची जात वेगळी. घरच्यांचा त्यामुळेच विरोध होता. त्यामुळे त्यांनी भलत्याच मुलाशी तिचा विवाह निश्चित केला. लग्नाच्या मंडपात वधू-वर एकमेकांच्या गळ्यात माळ घालणार, इतक्यात तो प्रियकर मोटारबाइकवरून तिथं पोहोचला. त्यांनी बाइकवर बसूनच आपल्या हातातील हार तिच्या दिशेनं फेकला. तो बरोबरच तिच्या गळ्यातच जाऊ न पडला. लगेच तीही त्याच्या दिशेनं धावत गेली आणि तिनंही त्याच्या गळ्यात हार घातला.मग काय, झाला की विवाह दोघांचा. अर्थात मुलीच्या घरच्यांनी त्याला चोपून काढलं. हिंदी चित्रपटांप्रमाणेच त्यावेळी ती त्याच्या अंगावर पडली आणि तिनं त्याला वाचवलं. तोपर्यंत पोलीसही पोहोचले. त्यांनी त्याची मारहाणीतून सुटका केली. दोघंही सज्ञान असल्याने तुम्ही काही करू शकत नाही, असं पालकांना सुनावलं. त्यामुळे तिचे पालकही गप्प झाले. मुलाकडचे लोक मात्र तणतणत तिथून निघून गेले. हा किस्सा उत्तर प्रदेशातल्या बिजनोरमधला.त्या दोघींनीही केला विवाहदुसरा किस्साही उत्तर प्रदेशातलाच. पण शहर आग्रा. तिथं दोन मुलींचं एकमेकांवर प्रेम होतं. आता दोन मुलींचा एकमेकींशी विवाह करून द्यायला आपले पालक तयार होणार नाहीत, याची त्यांनाही माहिती होती. त्यामुळे त्यांच्यापैकी एकीनं विवाह संस्थेत मुलगा म्हणून, तर दुसरीनं मुलगी म्हणून नोंदणी केली. दोघींनी एकमेकांना पती व पत्नी म्हणून पसंत केलं आणि सामुदायिक विवाह सोहळ्यात चक्क लग्नही केलं. त्यासाठी दोघींनी पालकही भाड्यानं आणले होते. विवाह झाल्यानंतरही दोघींच्या पालकांनी त्यांचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, दमदाटी केली. पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. पोलिसांना बोलावलं. त्यांनीही समजावलं. त्याचंही या मुलींनी ऐकलं नाही. दोघींंनी एकत्र राहण्याचा आमचा निर्णय कायम आहे, असं ठामपणे सांगितलं.त्यामुळे पोलीसही परत गेले.

टॅग्स :marriageलग्न