शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं विनाकारण हस्तक्षेप का करत आहेत? कुमारस्वामींचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 17:27 IST

HD Kumaraswamy On Boundary Issue : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी, बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं विनाकारण हस्तक्षेप का करत आहे, असा सवाल केला आहे.

ठळक मुद्देकुमारस्वामी यांची सीमाप्रश्नावर थेट विचारणामहाराष्ट्रातील लोक सीमाप्रश्नावर अनावश्यक हस्तक्षेप का करीत आहेत - कुमारस्वामीबेळगाव सीमाप्रश्नी कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही - कुमारस्वामी

बेंगळुरू : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अलीकडेच शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या वाहनावर केलेला हल्ला आणि याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापुरात कर्नाटकातील बसेसना घातलेली बंदी, अशातच आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं विनाकारण हस्तक्षेप का करत आहे, असा सवाल केला आहे. ( hd kumaraswamy asked why are maharashtra people unnecessarily interfering into boundary issue)

बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं आवश्यकता नसताना हस्तक्षेप का करीत आहेत? हा मुद्दा फार पूर्वीपासून होता. सामान्य लोकांना त्रास होत आहे. आमचे राज्य सरकार पंतप्रधानांचं नाव हस्तक्षेप करण्यासाठी का आणत आहे? माझ्या म्हणण्यानुसार कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही,  असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांचा मोदी आणि शहांवर हल्लाबोल

बेळगावमध्ये कर्नाटक भाजपाप्रणित एक संघटना आहे, ते आमच्या मराठी लोकांवर ज्याप्रकारे हल्ले करत आहेत. आमच्या शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. हे अत्यंत चिंताजनक आहे. भाजपाला किंवा केंद्र सरकारला पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार सुरू आहे, असे ते म्हणत आहेत, त्याबद्दल त्यांना खूप चिंता आहे. परंतु, बेळगावमध्ये आठ दिवसांपासून आमच्या लोकांवर ज्या प्रकारे हल्ले सुरू आहेत, खुनी खेळ सुरू आहे. त्याबाबत भाजपचा कोणताही वरिष्ठ नेता, केंद्रीय गृहमंत्री किंवा पंतप्रधान काहीच बोलत नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले होते.

काँग्रेस महात्मा गांधींच्या नाही, तर जिनांच्या मार्गावर जातोय; शिवराज सिंह चौहान यांची टीका

दरम्यान, अलीकडेच बेळगाव येथील कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला केला होता. एवढंच नाहीतर गाडीवरील भगवा ध्वज काढून टाकत, गाडीवरील भगव्या फलकास काळे फासण्याचाही प्रयत्न झाल्याची घटना घडल्याचे समोर आले होते. यावर प्रत्युत्तर म्हणून कोल्हापुरात शिवसेनेकडून कर्नाटकच्या बसेसना बंदी घालण्यात आली होती. या एकंदरीत घडामोडींनंतर सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

टॅग्स :belgaonबेळगावKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणMaharashtraमहाराष्ट्र