हॉकर्स पोहोचले राज्यपालांच्या कार्यालयात मागणीवर ठाम: निवेदन सादर
By Admin | Updated: April 19, 2016 00:48 IST2016-04-19T00:48:50+5:302016-04-19T00:48:50+5:30
जळगाव : सुभाष चौक बळीराम पेठ मधील हॉकर्सने सोमवारी राज्यपालांच्या कार्यालयात जाऊन आपल्या मागणीने निवेदन सादर केले. जागा द्या अन्यथा आता आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असे या हॉकर्सने साकडे घातले असून सायंकाळी सर्व जण जळगावकडे परतले.

हॉकर्स पोहोचले राज्यपालांच्या कार्यालयात मागणीवर ठाम: निवेदन सादर
ज गाव : सुभाष चौक बळीराम पेठ मधील हॉकर्सने सोमवारी राज्यपालांच्या कार्यालयात जाऊन आपल्या मागणीने निवेदन सादर केले. जागा द्या अन्यथा आता आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असे या हॉकर्सने साकडे घातले असून सायंकाळी सर्व जण जळगावकडे परतले. सुभाष चौकातील हॉकर्सला न्यू बी.जे. मार्केटमध्ये व्यवसायासाठी जागा देण्यात आली आहे. तर बळीराम पेठेतही कारवाई प्रस्तावित असून या हॉकर्सनला गोलाणी मार्केटमध्ये आखणी करून ओट्यांच्या खालच्या जागा देणे प्रस्तावित आहे. सुभाष चौकातून न्यू बी.जे. मार्केटमध्ये स्थलांतरित केलेल्या हॉर्कर्सचे तेथे व्यवसाय होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुभाष चौकात वाहतुकीला अथडळा ठरणार नाही अशा ठिकाणी जागा दिली जावी, अशी त्यांची मागणी आहे. तर बळीराम पेठेतील व्यावसायिकांनीही तेथून जाण्यास विरोध दर्शविला असून नाही तर पक्के ओटे मिळावेत अशी मागणी केली आहे. मात्र महापालिकेने यास विरोध दर्शविल्याने हे हॉकर्स सोमवारी थेट मुंबईत राज्यपाल विद्यासागर राव यांच्या कार्यालयात पोहोचले. मात्र राज्यपालांशी त्यांची भेट होऊ शकली नाही. कार्यालयात दिले निवेदनराज्यपालांच्या कार्यालयात जवळपास २० हॉकर्सचे शिष्टमंडळ गेले होते. तर प्रत्यक्ष निवेदन देण्यास हॉकर्स संघटनेच्या अध्यक्षा शकुंतला भरत पाटील, रवींद्र कडू पाटील हे गेले होते. योग्य जागा द्या अन्यथा आमची व आमच्या कुटुंबीयांची उपासमार होत असल्याने आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असा इशारा संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिला आहे.