शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Hathras Stampede : "माझ्या पत्नीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण भोले बाबांनी..."; पतीचा मोठा दावा, सांगितला चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 13:39 IST

Hathras Stampede : भोले बाबा यांचे भक्त दीपक यादव यांनी मोठा दावा केला आहे. करवा चौथच्या दिवशी त्यांची पत्नी संजू हिचा मृत्यू झाला होता आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं. पण भोले बाबा यांनी तिला पुन्हा जिवंत केलं असं म्हटलं आहे.

हाथरसमध्ये सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान आता ​​भोले बाबा यांचे भक्त दीपक यादव यांनी मोठा दावा केला आहे. करवा चौथच्या दिवशी त्यांची पत्नी संजू हिचा मृत्यू झाला होता आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं. पण भोले बाबा यांनी तिला पुन्हा जिवंत केलं असं म्हटलं आहे. त्यांनी जेव्हा आपल्या पत्नीला भोले बाबा यांचा मंत्र असलेलं पाणी पाजलं तेव्हा ती पुन्हा जिवंत झाली असं म्हटलं आहे. 

भोले बाबांबद्दल जग कितीही काही बोललं तरी आमचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. सूरज पाल उर्फ ​​नारायण साकार हरी यांच्यामुळे आमच्या जीवनात बदल झाला असून आपण त्यांना देव मानतो आणि त्यांची पूजा करतो. दीपक यांनी न्यूज18 हिंदी याबाबत माहिती दिली. कोरोनाच्या काळात ​​भोले बाबा यांचा दरबार झाला नाही आणि बाबांनी दर्शनही दिलं नाही. पण जेव्हा कोरोनाचा प्रभाव कमी झाला तेव्हा राजस्थानच्या दौसा येथील दरबार भरणार असल्याची माहिती मिळताच हे जोडपं तिथे पोहोचले. 

दर्शनानंतर दीपक यांची पत्नी संजूची तब्येत बिघडली आणि त्यानंतर संजूने तिच्यासोबत बसलेल्या इतर महिलांना आपल्याला बरं वाटत नसल्याचं सांगितलं. त्या महिलांनी संजूला बाहेर आणलं. पण तोपर्यंत संजू बेशुद्ध झाली होती. इतर लोकांनी संजूचे पती दीपकचा शोध घेतला आणि पत्नी बेशुद्ध झाल्याची माहिती दिली.

दीपक यादव यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांनी पत्नीला बेशुद्धावस्थेत पाहिलं तेव्हा काहीच हालचाल होत नव्हती. महिलांनी तिला जमिनीवर झोपवलं होतं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर संजूला मृत घोषित केलं. मात्र त्यानंतर भोले बाबांचा मंत्र सांगून दीपक यांनी पत्नीला पाणी दिलं आणि तिच्या शरीरात हालचाल झाली आणि पत्नी पुन्हा जिवंत झाली.

आरोग्यविषयक समस्या होत्या. पण भोले बाबांकडे गेल्यावर असलेला आजार बरा झाला. अनेक चमत्कार त्यांना त्यांच्या आयुष्यात पाहायला मिळाले. त्यामुळेच पत्नी आणि कुटुंबासह सर्वच जण भगवान भोले बाबांची पूजा आणि आरती करतात असं देखील दीपक यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश