शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

भाजपच्या धक्कातंत्राची हॅटट्रिक, तीनही राज्यात नवे चेहरे; लोकसभेच्या तयारीचे दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 05:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच वेगळे निर्णय घेतात, असे म्हटले जाते.

संजय शर्मा

नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांत मोहन यादव, विष्णुदेव साय व भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्रिपद देऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तीन राज्यांत पिढी बदलली. तिन्ही नवीन मुख्यमंत्री ६० पेक्षा कमी वयाचे तर आहेतच; पण त्याचबरोबर पक्षाने अनेक संदेशही दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच वेगळे निर्णय घेतात, असे म्हटले जाते. हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर, गुजरातेत भूपेंद्र पटेल व उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणूक पराभूत झालेले पुष्करसिंह धामी यांना मुख्यमंत्रिपद देऊन पंतप्रधानांनी यापूर्वीच हा संदेश दिलेला आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा हे ५६ वर्षांचे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचे वय ५८ वर्षाचे, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे वय ५९ आहे. म्हणजेच सर्व नेते ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. nराजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी जयपूर येथील भाजप मुख्यालयात आमदारांची बैठक सुरू होती.

nमंचावर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या राजनाथ यांच्या उजव्या बाजूला बसल्या होत्या. काही वेळ दोघांमध्ये संवादही झाला. तेवढ्यात राजनाथ सिंह यांनी एक चिठ्ठी वसुंधरा यांना दिली. त्यांनी ती चिठ्ठी उघडू नये असे म्हटले. काही वेळाने वसुंधरा यांनी चिठ्ठी उघडताच त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. हा क्षण व्हिडीओत कैद झाला.

छत्तीसगडमध्ये रमण सिंह, मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान, नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल, कैलाश विजयवर्गीय व राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनलाल मेघवाल यांना मुख्यमंत्रिपद न देऊन पक्षाने स्पष्ट संदेश दिलेला आहे की, या सर्व ज्येष्ठांचे राज्यातील राजकारण आता संपलेले आहे. एक प्रकारे पिढीचा बदलच भाजपने या तीन राज्यांत केला आहे.

पहिल्यांदा आमदार अन् थेट मुख्यमंत्री

जयपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निकटवर्तीय आणि पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले भजनलाल शर्मा यांची राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली. तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांची उपमुख्यमंत्रिपदी आणि वासुदेव देवनानी यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली.

जयपूर येथील भाजप मुख्यालयात केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून आलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक झाली. त्यावेळी माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी विधिमंडळाचे नेते म्हणून भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राजस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जाईल, अशी प्रतिक्रिया शर्मा यांनी दिली. त्यानंतर राजभवन येथे राज्यपाल कलराज मिश्र यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. भजनलाल हे प्रदेश महासचिव असून, ते सांगानेर मतदारसंघातून ४८,०८१ मतांनी विजयी झाले.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक