शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

तुमच्या घरापर्यंत आली का नळजोडणी? महाराष्ट्रात ७५ टक्क्यांहून अधिक घरांमध्ये नळाचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 16:06 IST

केंद्र सरकारने २०१९ मध्ये सुरू केलेल्या जलजीवन मिशनद्वारे २०२४पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आतापर्यंत या योजनेंतर्गत किती लोकांपर्यंत नळजोडणी मिळाली, त्याबाबत.

नवी दिल्ली : अन्न, वस्त्र, निवाऱ्यासह प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्याचा मूलभूत अधिकार आहे. विविध जलस्रोतांद्वारे देशाच्या ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, काही ठिकाणी पाण्यासाठी अनेकांना पायपीट करावी लागते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २०१९ मध्ये सुरू केलेल्या जलजीवन मिशनद्वारे २०२४पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आतापर्यंत या योजनेंतर्गत किती लोकांपर्यंत नळजोडणी मिळाली, त्याबाबत.

ग्रामीण भागातील योजनेची सद्य:स्थिती -३१ जुलै २०२३ पर्यंतघरोघरी नळजोडणी का? - डायरिया, गॅस्ट्रो आदी जलजन्य आजारांमुळे होणारी मनुष्यहानी रोखणे.- महिलांवरील पाणी आणण्याची जबाबदारी कमी करून त्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या अधिकाधिक संधी देणे.- पाणी आणण्यासाठी होणारे कष्ट आणि वाया जाणाऱ्या इंधनाची बचत करणे.

एकूण घरे / कुटुंब १९,४२,५३,९१४योजना सुरू होण्यापूर्वी ३,२३,६२,८३८योजना सुरू झाल्यानंतर - ९,४५,३३,६३५आतापर्यंत नळजोडणी - १२,६८,९६,४७३

आदिवासी भागात नळजोडण्या अपूर्ण  - देशाच्या आदिवासी भागातील सुमारे ४४ टक्के घरापर्यंत अद्याप नळजोडण्या पोहोचल्या नसल्याची माहिती जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी राज्यसभेत दिली. - देशाच्या ग्रामीण भागातील २.१७ कोटींपैकी सुमारे १.२ कोटी कुटुंबीयांना नळजोडणी मिळाली नसून, त्यामध्ये प्रामुख्याने झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.

नळजोडण्या पूर्ण -लक्ष्य साध्य होईल?२०२४ पर्यंत सर्व घरांना नळजोडणीचे सरकारचे लक्ष्य आहे. परंतु रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या मालाच्या तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत योजनेचे लक्ष्य साध्य करणे कठीण आहे.

१००% - गोवा, अंदमान-निकोबार, दादरा-नगरहवेली, दीव-दमण, पुदुच्चेरी, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरयाणा, तेलंगणा७५-९६% - बिहार, मिझोरम, सिक्कीम, अरुणाचल, लडाख, महाराष्ट्र, मणिपूर, नागालँड, उत्तराखंड५१-७०% - तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, जम्मू - काश्मीर, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मेघालय, आसाम, मध्य प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा५०%- - केरळ, राजस्थान, झारखंड, प. बंगाल 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणी