शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

तुमच्या घरापर्यंत आली का नळजोडणी? महाराष्ट्रात ७५ टक्क्यांहून अधिक घरांमध्ये नळाचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 16:06 IST

केंद्र सरकारने २०१९ मध्ये सुरू केलेल्या जलजीवन मिशनद्वारे २०२४पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आतापर्यंत या योजनेंतर्गत किती लोकांपर्यंत नळजोडणी मिळाली, त्याबाबत.

नवी दिल्ली : अन्न, वस्त्र, निवाऱ्यासह प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्याचा मूलभूत अधिकार आहे. विविध जलस्रोतांद्वारे देशाच्या ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, काही ठिकाणी पाण्यासाठी अनेकांना पायपीट करावी लागते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २०१९ मध्ये सुरू केलेल्या जलजीवन मिशनद्वारे २०२४पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आतापर्यंत या योजनेंतर्गत किती लोकांपर्यंत नळजोडणी मिळाली, त्याबाबत.

ग्रामीण भागातील योजनेची सद्य:स्थिती -३१ जुलै २०२३ पर्यंतघरोघरी नळजोडणी का? - डायरिया, गॅस्ट्रो आदी जलजन्य आजारांमुळे होणारी मनुष्यहानी रोखणे.- महिलांवरील पाणी आणण्याची जबाबदारी कमी करून त्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या अधिकाधिक संधी देणे.- पाणी आणण्यासाठी होणारे कष्ट आणि वाया जाणाऱ्या इंधनाची बचत करणे.

एकूण घरे / कुटुंब १९,४२,५३,९१४योजना सुरू होण्यापूर्वी ३,२३,६२,८३८योजना सुरू झाल्यानंतर - ९,४५,३३,६३५आतापर्यंत नळजोडणी - १२,६८,९६,४७३

आदिवासी भागात नळजोडण्या अपूर्ण  - देशाच्या आदिवासी भागातील सुमारे ४४ टक्के घरापर्यंत अद्याप नळजोडण्या पोहोचल्या नसल्याची माहिती जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी राज्यसभेत दिली. - देशाच्या ग्रामीण भागातील २.१७ कोटींपैकी सुमारे १.२ कोटी कुटुंबीयांना नळजोडणी मिळाली नसून, त्यामध्ये प्रामुख्याने झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.

नळजोडण्या पूर्ण -लक्ष्य साध्य होईल?२०२४ पर्यंत सर्व घरांना नळजोडणीचे सरकारचे लक्ष्य आहे. परंतु रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या मालाच्या तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत योजनेचे लक्ष्य साध्य करणे कठीण आहे.

१००% - गोवा, अंदमान-निकोबार, दादरा-नगरहवेली, दीव-दमण, पुदुच्चेरी, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरयाणा, तेलंगणा७५-९६% - बिहार, मिझोरम, सिक्कीम, अरुणाचल, लडाख, महाराष्ट्र, मणिपूर, नागालँड, उत्तराखंड५१-७०% - तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, जम्मू - काश्मीर, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मेघालय, आसाम, मध्य प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा५०%- - केरळ, राजस्थान, झारखंड, प. बंगाल 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणी