शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

अजब तर्कट ! जीन्स-मोबाइलच्या वापरामुळे मुली भरकटतात व मुलांसोबत पळून जातात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 10:47 IST

इथली ग्रामपंचायत म्हणे मुली जीन्स व मोबाइल वापरतात आणि....

ठळक मुद्देजीन्स-मोबाइल वापरामुळे मुली भरकटतातजीन्स-मोबाइल वापरुन मुली मुलांसोबत पळून जातातमुलींनी जीन्स-मोबाइलचा वापर करायचा नाही, तालिबानी फतवा

सोनीपत - प्रत्येक क्षेत्रात आज महिलावर्ग महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहेत. उत्तुंग असे शिखर गाठत आहेत. मात्र हरियाणातील सोनीपत येथे महिलांनी समाजात कसे वावरावे, याबाबतचे समज अद्यापही बदललेले नाहीत. सोनीपतमधील एका गावामध्ये तरुणींच्या जीन्स व मोबाइल वापराला विरोध दर्शवण्यात येत आहे. जीन्स व मोबाइलच्या वापरामुळे मुली भरकटतात आणि मुलांसोबत पळून जातात, असे येथील लोकांचं म्हणणे आहे. मुलींच्या जीन्स-मोबाइल वापराविरोधात पंचायतीनं तालिबानी फतवा काढला आहे.

संपूर्ण गाव या निष्कर्षाचे समर्थन करत असल्याची माहिती गावच्या सरपंचानं दिली आहे. गावातील मुलींनी जीन्स व मोबाइलचा वापर करायचा नाही, असा तालिबानी फतवा गोहानाच्या जवळील गाव ईशापूर खेडीतील पंचायत समितीनं काढला आहे. हा फतवा काढण्यामागील पार्श्वभूमीदेखील अजबच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तीन प्रकरणांत मुलींनी प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले आणि तिन्ही मुली जीन्स व मोबाइलचा वापर करायच्या, असा हास्यास्पद तर्क पंचायत समितीनं लावला आहे. 

'मुलींच्या पळून जाण्याला मोबाइल जबाबदार'सरपंच प्रेम सिंह यांचे म्हणणे आहे की, ईशापूर खेडी येथे गेल्या दोन-तीन घटनांमध्ये मुली आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्या. मुलींच्या पळून जाण्यानं पंचायतीची बदनामी झाली आणि यामुळे पंचायतच्या बैठकीत या घटनेला मोबाइलला जबाबदार ठरवण्यात आले आहे. दरम्यान, अशा प्रकारचे अनेक तुघलकी फतवे हरियाणातील ग्रामीण क्षेत्रांमध्ये काढले जातात.   

टॅग्स :MobileमोबाइलWomenमहिला