शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

हरियाणाचे लोक आता काश्मीरमधून नवरी आणू शकतात, मुख्यमंत्री खट्टर यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 04:43 IST

हरियाणाचे लोक आता काश्मीरमधून नवरी आणू शकतात, असे विधान करून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

चंदीगड : हरियाणाचे लोक आता काश्मीरमधून नवरी आणू शकतात, असे विधान करून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. काश्मीरमधील ३७० कलम हटविल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे.खट्टर यांनी शुक्रवारी फतेहाबाद येथे एका कार्यक्रमात हे विधान केले. ते म्हणाले की, जर मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असेल तर, अडचणी येतात. आमचे सहकारी ओ. पी. धनखडजी म्हणाले होते की, नवरी मुलगी बिहारहून आणावी लागेल. पण, काही जण म्हणाले, काश्मीर खुले झाले आहे. त्यामुळे नवरी मुलगी काश्मीरमधून आणली जाईल. यातील विनोदाचा भाग सोडून दिला तर, प्रश्न असा आहे की, मुला-मुलींच्या संख्येत समानता राहिली तर, समाजात संतुलन कायम राहील.विशेष म्हणजे, धनखड यांनी २०१४ मध्ये असे विधान केले होते की, जर हरियाणात मुलांना योग्य जोडीदार मिळत नसेल तर, ते बिहारमधून त्यांच्यासाठी नवरी मुलगी आणतील. हरियाणात मुला- मुलींच्या संख्येत विषमता असल्याने मुलांच्या विवाहाचा प्रश्न अनेकदा गंभीर बनलेला आहे.आरएसएसच्या विचारसरणीचा परिणाम : राहुल गांधीकाश्मिरी महिलांबाबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेले वक्तव्य म्हणजे आरएसएसचे प्रशिक्षण एका व्यक्तीच्या विचाराला कसे वळण देतात याचे उदाहरण आहे, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.राहुल गांधी यांनी टष्ट्वीट केले आहे की, खट्टर यांचे वक्तव्य निंदणीय आहे. महिला काही संपत्ती नाही की, पुरुष त्यांच्यावर मालकीहक्क सांगू शकेल.

टॅग्स :HaryanaहरयाणाChief Ministerमुख्यमंत्री