शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्यांनी लिहिलं राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 11:29 IST

अधिकारी आपल्या चुका लपविण्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सहनशीलता संपली असून ते सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागत आहेत.

जुलाना - शाहबाद ते जयपूर या शहरांना जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बनविण्यात येत असून यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण केल्या जात आहेत. मात्र जमीन अधिग्रहण करताना योग्य भाव दिला जावा यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पत्र लिहून सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. सरकारकडून अन्याय होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी पत्रात केला आहे. 

शेतकऱ्यांनी पत्रात नमूद केलं आहे की, सरकारकडून जमीन अधिग्रहण करताना बाजारभावानुसार किंमतीची घोषणा केली नाही. शेतकरी सरकारकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहात आहेत. शेतकरी नेते रमेश दलाल यांनी सांगितले की, मागील 5 महिन्यांपासून शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करतंय त्यामुळे आम्हाला सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. 

12 जून रोजी शेतकरी आणि सरकारमध्ये उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्वसमंतीने शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. मात्र समितीकडून बाजारभावानुसार जमिनीचा मोबदला देण्याबद्दल काहीच घोषणा केली नाही. अधिकारी आपल्या चुका लपविण्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सहनशीलता संपली असून ते सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागत आहेत. 

आमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. कायदा आमच्या बाजूने असताना मागील 5 महिने रस्त्यावर उतरुन आम्हाला आंदोलन करावं लागत आहे. आम्ही आमच्या मागण्या मागत असून सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आमचे हक्क मिळावे त्याकरिता सरकारशी लढण्यासाठी आमच्याकडे उर्जा नाही. अधिकाऱ्यांच्या अहंकाराच्या समोर आमचा पराभव झाला आहे. हा फक्त आमचा नाही तर देशाच्या संविधानाचा पराभव आहे त्यामुळे आम्ही तुमच्याकडे सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागतो असं हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी पत्रात लिहिलं आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीPresidentराष्ट्राध्यक्षprime ministerपंतप्रधान