शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्यांनी लिहिलं राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 11:29 IST

अधिकारी आपल्या चुका लपविण्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सहनशीलता संपली असून ते सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागत आहेत.

जुलाना - शाहबाद ते जयपूर या शहरांना जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बनविण्यात येत असून यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण केल्या जात आहेत. मात्र जमीन अधिग्रहण करताना योग्य भाव दिला जावा यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पत्र लिहून सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. सरकारकडून अन्याय होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी पत्रात केला आहे. 

शेतकऱ्यांनी पत्रात नमूद केलं आहे की, सरकारकडून जमीन अधिग्रहण करताना बाजारभावानुसार किंमतीची घोषणा केली नाही. शेतकरी सरकारकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहात आहेत. शेतकरी नेते रमेश दलाल यांनी सांगितले की, मागील 5 महिन्यांपासून शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करतंय त्यामुळे आम्हाला सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. 

12 जून रोजी शेतकरी आणि सरकारमध्ये उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्वसमंतीने शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. मात्र समितीकडून बाजारभावानुसार जमिनीचा मोबदला देण्याबद्दल काहीच घोषणा केली नाही. अधिकारी आपल्या चुका लपविण्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सहनशीलता संपली असून ते सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागत आहेत. 

आमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. कायदा आमच्या बाजूने असताना मागील 5 महिने रस्त्यावर उतरुन आम्हाला आंदोलन करावं लागत आहे. आम्ही आमच्या मागण्या मागत असून सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आमचे हक्क मिळावे त्याकरिता सरकारशी लढण्यासाठी आमच्याकडे उर्जा नाही. अधिकाऱ्यांच्या अहंकाराच्या समोर आमचा पराभव झाला आहे. हा फक्त आमचा नाही तर देशाच्या संविधानाचा पराभव आहे त्यामुळे आम्ही तुमच्याकडे सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागतो असं हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी पत्रात लिहिलं आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीPresidentराष्ट्राध्यक्षprime ministerपंतप्रधान