शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 14:34 IST

या निवडणुकीत भाजपला बहुमतापेक्षा 45 पेक्षा तीन जागा अधिक अर्थात 48 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 36 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच हरयाणामध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करताना दिसत आहे. 

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, राज्यात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती जिलेबीची. राजकारणातील तज्ज्ञांपासून ते राज्यातील स्थानिक जनतेपर्यंत सर्वच जण जिलेबीसंदर्भात सोशल मीडिया पोस्ट करताना आणि काँग्रेसची खिल्ली उडवताना दिसत आहेत. यासंदर्भात आता राहुल गांधी यांनी गोहानातील ज्या दुकानाची 'तारीफ' केली होती, त्या दुकानाच्या दुकानदाराचीही प्रतिक्रिया आली आहे. 

राहुल गांधी यांनी गोहानात खाल्ली होती जिलेबी - हरयाणा  विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोनीपतच्या गोहानामध्ये एका सभेला संबोधित केले होते. यावेळी, काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी त्यांना गोहानाची जलेबी भरवली होती. यावेळी राहुल गाधी यांनी गोहानातील जिलेबीची दबरदस्त तारीफ केली होती. एवढेच नाही तर राहुल गांधी आपली बहीण प्रियांका गांधींसाठीही येथून जिलेबी घेऊन गेले होते. हरयाणा विधानसभा निवडणुका निकाल समोर आल्यानंतर, जिलेबी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जबरदस्त ट्रेंड करत आहे.

जिलेबी दुकानाचा दुकानदार काय म्हणाला? -जिलेबी तयार करणाऱ्या दुकानदाराने म्हटले आहे, "राहुल गांधी यांनी जिलेबीचे कौतुक केले होते. ही जिलेबी देशी तुपात करण्यात आली आहे. ती एक आठवड्यांपेक्षाही अदिक दिवस टिकते. जर राहुल गांधी यांनी कौतुक केले असले तर, नक्कीच आयटममध्ये दम असेल. सर्वसामान्य लोकही आमच्या जिलेबीचे कौतुक करतात."

'जिलेबी फॅक्ट्रीतील वस्तू नाही' -ते पुढे म्हणाले, "ही जिलेबी म्हणजे एखाद्या फॅक्ट्रीतील वस्तू नाही. हा दुकानात बनवला जाणारा पदार्थ आहे. येथे दहा लोक जिलेबी तयार करतात आणि आपली सेवा करतात. आमचे तीन दुकान आहेत. हे दुकान मी जन्माला येण्यापूर्वीचे आहे. मी गेल्या 22-23 वर्षांपासून येथे काम करतो. संपूर्ण माल देशी तुपात तयार केला जातो. येथील जिलेबी भारताबरोबरच परदेशातूनही मागणी आहे.

जनतेनं खिल्ली उडवली -राहुल गांधी सोनीपतमध्ये एका जाहीर सभेसाठी आले होते. तेव्हा त्यांनी, जिलेबी खाल्ल्यानंतर जिलेबीची फॅक्ट्री लावण्याबरोबरच कामगारांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात भाष्य केले होते. त्यांच्या फॅक्ट्रीसंदर्भातील वक्तव्यावरून भाजप समर्थकांनी त्यांच्यावर निशाणा सधायला सुरुवात केली होते आणि मोठ्या प्रमाणावर मिम्स देखील तयार केले होते. यासंदर्भात स्थानिक लोकही राहुल गांधी यांची जबरदस्त खिल्ली उडवताना दिसत होते. निवडणूक निकालानंतर, हरयाणातील जनतेला विकासाची जिबेली हवी आहे. त्यांना माहीत आहे की, जिलेबी फॅक्ट्रीत नव्हे तर हलवाईच्या दुकानात तयाह होते, असे जनता म्हणत आहे.

या निवडणुकीत भाजपला बहुमतापेक्षा 45 पेक्षा तीन जागा अधिक अर्थात 48 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 36 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच हरयाणामध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करताना दिसत आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसharyana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४