शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 14:34 IST

या निवडणुकीत भाजपला बहुमतापेक्षा 45 पेक्षा तीन जागा अधिक अर्थात 48 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 36 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच हरयाणामध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करताना दिसत आहे. 

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, राज्यात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती जिलेबीची. राजकारणातील तज्ज्ञांपासून ते राज्यातील स्थानिक जनतेपर्यंत सर्वच जण जिलेबीसंदर्भात सोशल मीडिया पोस्ट करताना आणि काँग्रेसची खिल्ली उडवताना दिसत आहेत. यासंदर्भात आता राहुल गांधी यांनी गोहानातील ज्या दुकानाची 'तारीफ' केली होती, त्या दुकानाच्या दुकानदाराचीही प्रतिक्रिया आली आहे. 

राहुल गांधी यांनी गोहानात खाल्ली होती जिलेबी - हरयाणा  विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोनीपतच्या गोहानामध्ये एका सभेला संबोधित केले होते. यावेळी, काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी त्यांना गोहानाची जलेबी भरवली होती. यावेळी राहुल गाधी यांनी गोहानातील जिलेबीची दबरदस्त तारीफ केली होती. एवढेच नाही तर राहुल गांधी आपली बहीण प्रियांका गांधींसाठीही येथून जिलेबी घेऊन गेले होते. हरयाणा विधानसभा निवडणुका निकाल समोर आल्यानंतर, जिलेबी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जबरदस्त ट्रेंड करत आहे.

जिलेबी दुकानाचा दुकानदार काय म्हणाला? -जिलेबी तयार करणाऱ्या दुकानदाराने म्हटले आहे, "राहुल गांधी यांनी जिलेबीचे कौतुक केले होते. ही जिलेबी देशी तुपात करण्यात आली आहे. ती एक आठवड्यांपेक्षाही अदिक दिवस टिकते. जर राहुल गांधी यांनी कौतुक केले असले तर, नक्कीच आयटममध्ये दम असेल. सर्वसामान्य लोकही आमच्या जिलेबीचे कौतुक करतात."

'जिलेबी फॅक्ट्रीतील वस्तू नाही' -ते पुढे म्हणाले, "ही जिलेबी म्हणजे एखाद्या फॅक्ट्रीतील वस्तू नाही. हा दुकानात बनवला जाणारा पदार्थ आहे. येथे दहा लोक जिलेबी तयार करतात आणि आपली सेवा करतात. आमचे तीन दुकान आहेत. हे दुकान मी जन्माला येण्यापूर्वीचे आहे. मी गेल्या 22-23 वर्षांपासून येथे काम करतो. संपूर्ण माल देशी तुपात तयार केला जातो. येथील जिलेबी भारताबरोबरच परदेशातूनही मागणी आहे.

जनतेनं खिल्ली उडवली -राहुल गांधी सोनीपतमध्ये एका जाहीर सभेसाठी आले होते. तेव्हा त्यांनी, जिलेबी खाल्ल्यानंतर जिलेबीची फॅक्ट्री लावण्याबरोबरच कामगारांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात भाष्य केले होते. त्यांच्या फॅक्ट्रीसंदर्भातील वक्तव्यावरून भाजप समर्थकांनी त्यांच्यावर निशाणा सधायला सुरुवात केली होते आणि मोठ्या प्रमाणावर मिम्स देखील तयार केले होते. यासंदर्भात स्थानिक लोकही राहुल गांधी यांची जबरदस्त खिल्ली उडवताना दिसत होते. निवडणूक निकालानंतर, हरयाणातील जनतेला विकासाची जिबेली हवी आहे. त्यांना माहीत आहे की, जिलेबी फॅक्ट्रीत नव्हे तर हलवाईच्या दुकानात तयाह होते, असे जनता म्हणत आहे.

या निवडणुकीत भाजपला बहुमतापेक्षा 45 पेक्षा तीन जागा अधिक अर्थात 48 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 36 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच हरयाणामध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करताना दिसत आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसharyana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४