शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

Haryana assembly elections 2019: आखाड्यात ४२% उमेदवार कोट्यधीश; ११७ जणांवर गुन्हे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 7:57 AM

२०१४ च्या तुलनेत गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांची संख्या ३ टक्के अधिक आहे.

नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या एकूण उमेदवारांपैकी ४२ टक्के उमेदवार कोट्यधीश असून, १० टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे आहेत. १,१३८ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर असोसिएशन आॅफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार ४८१ उमेदवार कोट्यधीश आहेत, तर ११७ उमेदवारांवर गुन्हे आहेत.

२०१४ च्या तुलनेत गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांची संख्या ३ टक्के अधिक आहे. यावेळी हरयाणा विधानसभेची निवडणूक एकूण ७४ राजकीय पक्ष लढवीत आहेत. २०१४ मध्ये ४३ राजकीय पक्षांनी उमेदवार उतरविले होते. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी येत्या २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत असून, ७४ राजकीय पक्षांचे एकूण १,१६९ उमेदवार नशीब अजमावत आहेत. २०१४ ची निवडणूक ४३ पक्षांनी एकमेकांविरुद्ध लढविली होती.

यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या कोट्यधीश ४८१ उमेदवारांची एकूण संपत्ती सरासरी ४ कोटी ३१ लाख रुपये आहे. याचाच अर्थ ४२ टक्के उमेदवारांनी आपली संपत्ती एक कोटीपेक्षा अधिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात घोषित केले आहे. राजकीय पक्षनिहाय काँग्रेसचे ७९, भाजपचे ७९, जेजेपीचे ६२, आयएनएलडीचे ८० आणि बसपाचे ३४ उमेदवार कोट्यधीश आहेत.

गुन्हे असलेले ११७ उमेदवारयावेळी निवडणूक लढविणांऱ्यापैकी १० टक्के म्हणजे ११७ उमेदवारांनी आपल्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती दिली आहे. ७० उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत. यात काँग्रेसचे २२, भाजपचे ४, जजपाचे १६, आयएनएलडीचे १२ आणि बसपाच्या २१ उमेदवारांचा समावेश आहे.

निरक्षर ते उच्चशिक्षित उमेदवार रिंगणातनिरक्षर ते उच्चशिक्षित उमेदवार निवडणूक लढवीत असून, ५७४ उमेदवार ५ वी आणि १२ वी उत्तीर्ण आहेत. ४८४ उमेदवार पदवीधर किंवा अधिक शिक्षित आहेत. ३५ उमेदवार पदविकाधारक असून, १९ उमेदवार साक्षर असून, २५ निरक्षर आहेत. उमेदवारांचे वयोमान २५ ते ८० वर्षांदरम्यान आहे.बेरोजगारीवर भाजप गप्प का?चंदीगड : बेरोजगारीसारख्या ज्वलंत मुद्यावर भाजप का गप्प आहे? असा सवाल जनता भाजपला विचारत आहे. जनतेने भाजपला यावेळी बाहेरचा रस्ता दाखविण्याचा चंग बांधला आहे, असा दावा हरयाणा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष कुमारी शैलजा यांनी केला आहे.खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार अनेक घोटाळ्यांत अडकले आहे. अनुच्छेद ३७० ला भाजप निवडणुकीत मोठा मुद्दा बनविला आहे. यावर त्या म्हणाल्या की, हा डाव त्यांच्यावर उलटेल. कारण बेरोजगारीसारख्या मुद्यांवर भाजप मूग गिळून का? असा सवाल जनता विचारत आहे. हरयाणात काँग्रेसचे सरकार येईल, अशी ठाम आशा आहे.

टॅग्स :HaryanaहरयाणाElectionनिवडणूक