शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2024 05:39 IST

भाजपने स्वतःही असा विचार केला नव्हता की, तिसऱ्यांदा हरयाणात कमळ फुलेल; पण निवडणुकीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, यंदा हरयाणात जाट-बिगर जाट मतदारांमध्ये ध्रुवीकरण झाले. 

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: हरयाणात सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार सत्तारूढ होणार आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच कोणालाही या निकालाची अपेक्षा नव्हती. भाजपने स्वतःही असा विचार केला नव्हता की, तिसऱ्यांदा हरयाणात कमळ फुलेल; पण निवडणुकीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, यंदा हरयाणात जाट-बिगर जाट मतदारांमध्ये ध्रुवीकरण झाले आहे. 

काँग्रेसने भूपेंद्रसिंह हुड्डा यांना पुढे केले खरे; पण कुमारी शैलजा यांची नाराजी जगजाहीर होती. याचा फायदा भाजपला झाला. काँग्रेसच्या परंपरागत मागास समुदायाच्या मतदारांनी आपले समर्थन बिगर जाटच्या बाजूने दिले आणि भाजपच्या बाजूने झुकते माप दिले.

तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे मागास समुदायाच्या मतदारांनी इंडिया आघाडीला समर्थन दिले होते; पण हरयाणात मागास समुदायाचे मत बिगर जाटच्या बाजूला सहभागी झाले आहे. याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे काँग्रेसने जाट चेहरा असलेले भूपेंद्रसिंह हुड्डा यांना पुढे केले होते.

शैलजा आणि हुड्डा यांची हातमिळवणी राहुल गांधी यांनी केली खरी; पण त्यांची मने मिळाली नाहीत आणि दोघांच्या वादाने काँग्रेसला तिसऱ्यांदा हरयाणात सत्तेतून बाहेर राहावे लागले. हरयाणात आता काँग्रेसला जाट समुदायाच्या पलीकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. 

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस