हर्षवर्धन पाटलांपुढे महाआघाडीचे आव्हान
By Admin | Updated: September 18, 2014 12:59 IST2014-09-18T00:24:18+5:302014-09-18T12:59:14+5:30
यंदाच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्याच्या विकासाचा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक प्रश्न गेल्या काही वर्षापासून सुटले नसल्याचा आरोप होत आहे.

हर्षवर्धन पाटलांपुढे महाआघाडीचे आव्हान
पुणो : यंदाच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्याच्या विकासाचा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक प्रश्न गेल्या काही वर्षापासून सुटले नसल्याचा आरोप होत आहे. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना या स्थानिक प्रश्नांनीच ग्रासले आहे. 2क्क्9 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणो यांनी महाआघाडीच्या माध्यमातून तुल्यबळ लढत दिली. पाटील यांना निसटता विजय मिळवता आला. परंतु, यंदा स्थानिक प्रश्न निवडणुकीच्या रणधुमाळीत चर्चीले जाऊ लागल्याने पाटील यांच्यापुढे महाआघाडीचे मोठे आव्हान आहे.
नगरपालिकेची सत्ता असतानाही शहरातील बकालपणा कमी करण्यासाठी कोणत्याही उपाय योजना केल्या नाहीत. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थानिक पुढा:यांकडूनच हर्षवर्धन पाटील यांना यंदाही आव्हान मिळू शकते. महाआघाडीच्या प्रयोगाबरोबरच काही मंडळी थेट भाजपात प्रवेश करून पाटील यांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय भरणो, जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्यापैकी कोणीतरी पाटील यांच्या विरोधात रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. जातीय समिकरणात धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील विरोधकांकडून तापविण्यात येत आहे. 2क्क्9 पासून इंदापूर तालुक्यात घट्ट झालेले जातीय राजकारण आणि त्यातच धनगर आरक्षणाचे आंदोलन यामुळे कॉँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
कॉँग्रेस बरोबर राष्ट्रवादीची आघाडी झाली तरी राष्ट्रवादीचा इंदापूर तालुक्यातील मोठा गट हर्षवर्धन पाटील यांचे कामच करीत नाही. याचा प्रत्यय 2क्क्9 च्या निवडणूकीत आला होता.
इंदापूर तालुक्यातही अनेक प्रश्न आहेत. निरा भीमा स्थिरीकरण योजनेसह सिंचनाचे प्रकल्प रखडले आहेत.
बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी औद्योगिक वसाहतीत मोठे प्रकल्प आलेले नाहीत. क् वर्षापासून एमआयडीसीसाठी घेतलेली जागा पडून आहे. काही छोटे प्रकल्प वगळता एमआयडीसीत रोजगार निर्मितीसाठी काही झाले नाही. फक्त कुरघुडय़ांचे राजकारण झाले आहे. त्याचे उत्तर हर्षवर्धन पाटील यांना यंदाच्या निवडणुकीत द्यावे लागणार आहे. (वार्ताहर)
इंदापूरकरांचा सतत दुष्काळाशी सामना
हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याचा सर्वागिण विकासासाठी फारसे लक्ष दिले नाही, असा विरोधकांचा आरोप आहे. सर्व सत्ताकेंद्रावर घरातील मंडळींचा प्रभाव ठेवला. मागील 2क् वर्षापासून पंचतारांकीत एमआयडीसीत मोठे प्रकल्प आले नाहीत. 22 गावांना बारमाही पाणी प्रश्न सोडविण्यासाठी गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे या गावांना पाणीटंचाईचा दरवर्षी सामना करावा लागतो. त्याच बरोबर लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना दर पाच वर्षात निवडणूूक प्रचार काळात मार्गी लावू, असे पाटील यांनी आश्वासन दिले. या भागात सतत दुष्काळाशी सामना शेतकरी, ग्रामस्थ करीत आहेत.