शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एक विवाह ऐसा भी! लग्नाआधी नवरदेवाने पाय गमावला पण तिने सोडली नाही साथ; घेतल्या सप्तपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 12:18 IST

लग्नाच्या काही दिवस आधीच एका रस्ते अपघातात नवरदेवाला त्याचा एक पाय गमावावा लागला. त्यानंतर मुलीने हॉस्पिटलमध्ये सोबत राहून त्याची काळजी घेतली.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील हरदोईमध्ये एखाद्या चित्रपटासारखी घटना खऱ्या आयुष्यात घडली आहे. एका तरुणीने आपल्या नवऱ्याला उत्तमरित्या साथ दिली आहे. लग्नाच्या काही दिवस आधीच एका रस्ते अपघातात नवरदेवाला त्याचा एक पाय गमावावा लागला. त्यानंतर मुलीने हॉस्पिटलमध्ये सोबत राहून त्याची काळजी घेतली. एवढंच नाही तर नंतर त्याच्याशीच लग्न केलं आणि त्याची पत्नी झाली. या तरुणीच्या धाडसामुळे सर्वत्र या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हरदोईमधील हन्नपसिगवामध्ये ही घटना घडली आहे. कलेक्टरचा मुलगा आदित्यचा विवाह खेरी जिल्ह्यातील जामुका गावात राहणाऱ्या सरोजिनीशी ठरला होता. दोघांचा साखरपुडा झाला होता परंतु, 1 एप्रिल 22 रोजी रात्री उशिरा गावाकडून जहनीखेडा येथे जात असताना अज्ञात वाहनाने आदित्यच्या दुचाकीला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. चांगल्या उपचारांसाठी आदित्यला शाहजहानपूर आणि तिथून लखनौला नेण्यात आलं. लखनौमध्ये आदित्यच्या पायावर प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली, पण ती यशस्वी झाली नाही. यानंतर आदित्यच्या पायावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आदित्यला पाय गमवावा लागला.

आदित्यवर उपचार सुरू असताना सरोजिनीने त्याची साथ सोडली नाही. त्याच्याबरोबर राहून त्याची काळजी घेतली. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर आदित्य त्याच्या घरी गेला आणि सरोजिनी तिच्या घरी गेली. आदित्यला झालेल्या अपघातानंतर सरोजिनीच्या कुटुंबीयांच्या मनात या लग्नाबाबत थोडी शंका होती. त्यांनी सरोजिनीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण सरोजिनीने आदित्यशी लग्न करण्याचा निर्णय कुटुंबीय आणि नातेवाईकांसमोर बोलून दाखवला. सरोजिनीच्या आग्रहास्तव आदित्य आणि सरोजिनी यांचं लग्न ठरलेल्या तारखेला झालं. आता सरोजिनी आपल्या पती आणि कुटुंबासह खूश आहे.

सरोजिनीचं शिक्षण आठवीपर्यंत झालं आहे. तिचे वडील रामशंकर शेती करतात आणि तिला आई नाही. वडील आणि आजी-आजोबांनी तिचं पालनपोषण केलं. तिला 2 लहान भाऊ आहेत. आदित्य आणि सरोजिनीचा साखरपुडा गेल्या वर्षी जूनमध्ये झाला नंतर अपघातात आदित्यने पाय गमावला. त्यानंतर यांचं लग्न कसं होणार, अशी चर्चा सुरू होती. परंतु सरोजिनी आदित्यशी लग्न करण्याचा तिच्या निर्णयावर ठाम राहिली आणि घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं. अखेर ठरलेल्या तारखेला 12 मे 22 रोजी सरोजिनीनी आदित्यसोबत सप्तपदी घेत आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न