शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

एक विवाह ऐसा भी! लग्नाआधी नवरदेवाने पाय गमावला पण तिने सोडली नाही साथ; घेतल्या सप्तपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 12:18 IST

लग्नाच्या काही दिवस आधीच एका रस्ते अपघातात नवरदेवाला त्याचा एक पाय गमावावा लागला. त्यानंतर मुलीने हॉस्पिटलमध्ये सोबत राहून त्याची काळजी घेतली.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील हरदोईमध्ये एखाद्या चित्रपटासारखी घटना खऱ्या आयुष्यात घडली आहे. एका तरुणीने आपल्या नवऱ्याला उत्तमरित्या साथ दिली आहे. लग्नाच्या काही दिवस आधीच एका रस्ते अपघातात नवरदेवाला त्याचा एक पाय गमावावा लागला. त्यानंतर मुलीने हॉस्पिटलमध्ये सोबत राहून त्याची काळजी घेतली. एवढंच नाही तर नंतर त्याच्याशीच लग्न केलं आणि त्याची पत्नी झाली. या तरुणीच्या धाडसामुळे सर्वत्र या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हरदोईमधील हन्नपसिगवामध्ये ही घटना घडली आहे. कलेक्टरचा मुलगा आदित्यचा विवाह खेरी जिल्ह्यातील जामुका गावात राहणाऱ्या सरोजिनीशी ठरला होता. दोघांचा साखरपुडा झाला होता परंतु, 1 एप्रिल 22 रोजी रात्री उशिरा गावाकडून जहनीखेडा येथे जात असताना अज्ञात वाहनाने आदित्यच्या दुचाकीला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. चांगल्या उपचारांसाठी आदित्यला शाहजहानपूर आणि तिथून लखनौला नेण्यात आलं. लखनौमध्ये आदित्यच्या पायावर प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली, पण ती यशस्वी झाली नाही. यानंतर आदित्यच्या पायावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आदित्यला पाय गमवावा लागला.

आदित्यवर उपचार सुरू असताना सरोजिनीने त्याची साथ सोडली नाही. त्याच्याबरोबर राहून त्याची काळजी घेतली. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर आदित्य त्याच्या घरी गेला आणि सरोजिनी तिच्या घरी गेली. आदित्यला झालेल्या अपघातानंतर सरोजिनीच्या कुटुंबीयांच्या मनात या लग्नाबाबत थोडी शंका होती. त्यांनी सरोजिनीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण सरोजिनीने आदित्यशी लग्न करण्याचा निर्णय कुटुंबीय आणि नातेवाईकांसमोर बोलून दाखवला. सरोजिनीच्या आग्रहास्तव आदित्य आणि सरोजिनी यांचं लग्न ठरलेल्या तारखेला झालं. आता सरोजिनी आपल्या पती आणि कुटुंबासह खूश आहे.

सरोजिनीचं शिक्षण आठवीपर्यंत झालं आहे. तिचे वडील रामशंकर शेती करतात आणि तिला आई नाही. वडील आणि आजी-आजोबांनी तिचं पालनपोषण केलं. तिला 2 लहान भाऊ आहेत. आदित्य आणि सरोजिनीचा साखरपुडा गेल्या वर्षी जूनमध्ये झाला नंतर अपघातात आदित्यने पाय गमावला. त्यानंतर यांचं लग्न कसं होणार, अशी चर्चा सुरू होती. परंतु सरोजिनी आदित्यशी लग्न करण्याचा तिच्या निर्णयावर ठाम राहिली आणि घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं. अखेर ठरलेल्या तारखेला 12 मे 22 रोजी सरोजिनीनी आदित्यसोबत सप्तपदी घेत आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न