शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

"काँग्रेसवाले फक्त फोटो काढायला येतात, मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनाला कोणीही आलं नव्हतं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 18:06 IST

Hardeep Singh Puri And Manmohan Singh : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काँग्रेसचे लोक फक्त फोटो काढण्यासाठी येतात, मात्र डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनाला कोणीही आलं नव्हतं असं म्हटलं आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक आणि अंत्यसंस्कार यावरून अजूनही राजकारण सुरू आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी जमीन का दिली जात नाही आणि त्यासाठी दिरंगाई का केली जात आहे, असा सवाल काँग्रेस सातत्याने उपस्थित करत आहे. तसेच निगम बोध घाटावर झालेल्या अंत्यसंस्कारावरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काँग्रेसचे लोक फक्त फोटो काढण्यासाठी येतात, मात्र डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनाला कोणीही आलं नव्हतं असं म्हटलं आहे.

काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. या मुद्द्यावर काँग्रेस फक्त राजकारण करत आहे, असं भाजपच्या बाजूने सांगण्यात आलं आहे. तसेच भाजपाने यापूर्वीच डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारण्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगितलं आहे. निगम बोध घाटात मात्र अंत्यसंस्कारावर प्रश्न उपस्थित करून काँग्रेस फक्त राजकारण करत आहे असं म्हटलं.

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी काँग्रेसच्या आरोपांवर हल्लाबोल करत काँग्रेस बिनबुडाचे आरोप करत असल्याचं म्हटलं. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या स्मारकाबाबत बोललं जात होतं ते स्मारकासाठी सरकार तयार आहे, परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की, त्यात काही अडचणी आहेत. गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करता येत नव्हते.

हरदीप पुरी म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळातही देशाच्या अनेक माजी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे अंत्यसंस्कार एकता स्थळावर झाले आहेत, जिथे त्यांचे स्मारकही बांधले गेले आहे. काँग्रेसची इच्छा असती तर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करता आले असते कारण ती जागा आधीच चिन्हांकित आहे आणि त्या ठिकाणी दोन स्मारक बांधण्यासाठी जागा शिल्लक आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांचा अपमान झाल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना हरदीप सिंग पुरी म्हणाले की, मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांचे वाहन कोणत्याही ताफ्यामुळे थांबलेलं नाही आणि निगम बोध घाटावरही त्यांच्यासाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आली. काँग्रेस फक्त राजकारण करत आहे. काँग्रेस नेते फक्त फोटो काढण्यासाठी तिथे पोहोचतात, पण आज जेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थींचं विसर्जन झालं, तेव्हा काँग्रेसचा एकही नेता तिथे पोहोचला नाही. 

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगcongressकाँग्रेसPoliticsराजकारण