शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

80 टक्के प्रवासी क्षमतेसह देशांतर्गत उड्डाणांना मंजुरी, हरदीप पुरींनी ट्विट करून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 18:32 IST

कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने नागरी विमानसेवा महासंचालक (डीजीसीए)ने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहे.

नवी दिल्ली - नागरी उड्डण मंत्रालयाने देशांतर्गत उड्डाणांसाठी प्रवाशांची क्षमता वाढवून आता 80 टक्के करण्याचा निर्मय घेतला आहे. नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांनी ही घोषणा केली. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ''25 मेरोजी 30 हजार प्रवाशांसह देशांतर्गत उड्डाणांना सुरुवात करण्यात आली. हे प्रमाण वाढून आता 2.52 लाखांवर पोहोचले आहे. आता सरकार देशांतर्गत उड्डाणांसाठी 80 टक्के प्रवासी क्षमतेची परवानगी देत आहे.''आंतरराष्ट्रीय उड्डाणे 31 डिसेंबरपर्यंत बंद -कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने नागरी विमानसेवा महासंचालक (डीजीसीए)ने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहे. यासंदर्भात डीजीसीएने पत्रकही काढले होते. भारतात कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केल्यानंतर २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. अनलॉकनंतरही यावरील स्थगिती उठविली नव्हती. युरोपमध्ये दुसरी लाट आली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत स्थगिती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपवादात्मक परिस्थितीत काही ठरावीक मार्गांवर निवडक उड्डाणांना परवानगी देण्यात येऊ शकते, असेही डीजीसीएने स्पष्ट केले आहे.

कार्गासेवा, वंदे भारत मोहिमेला वगळले -या निर्बंधातून कार्गासेवा, वंदे भारत मोहीम आणि विशेष विमानांना वगळण्यात आले आहे. भारताने अमेरिका आणि इंग्लंडसह २० देशांसोबत ‘एअर बबल’ करार केला आहे. याअंतर्गत जुलै महिन्यापासून विशेष उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत, तर देशांतर्गत विमानसेवेला २५ मेपासून परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :airplaneविमानCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत