शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! तीन लाखांच्या कर्जावर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 11:46 IST

केंद्र सरकारनं देशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारनं देशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.शेतकऱ्यांच्या 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज प्रक्रियेवर कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. आता शेतकऱ्यांना प्रक्रिया, तपासणी शुल्क किंवा सेवा शुल्क भरावे लागणार नाही.

नवी दिल्ली- केंद्र सरकारनं देशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज प्रक्रियेवर कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. आता शेतकऱ्यांना प्रक्रिया, तपासणी शुल्क किंवा सेवा शुल्क भरावे लागणार नाही. इंडियन बँक असोसिएशन(आयबीए)नं यासंबंधी सरकारी बँकांना निर्देश जारी केले आहेत.शेतकऱ्यांना कृषी ऋण आणि किसान क्रेडिट कार्ड(केसीसी)वर कर्ज घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. पहिल्यांदा वेगवेगळ्या बँकांमार्फत हे कर्ज दिलं जात होतं. त्यावर काही शुल्कही आकारण्यात येत होतं. कृषी सचिवाद्वारे 6.95 केसीसीधारकांना सुविधा पुरवण्यासाठी सर्व राज्यांना पत्र लिहिण्यात आलं असून, यात जास्त करून केसीसी धारकांना सुविधा पुरवण्यास सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आयबीएनं सर्व बँकांना निर्देश दिले आहेत की, शेतकऱ्यांनी तीन लाखांपर्यंत कर्ज घेतल्यास त्यावर कोणतंही शुल्क आकारलं जाऊ नये. विशेष म्हणजे बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आयबीएनं लिखित स्वरूपात हे कळवलं आहे. कर्जाच्या रकमेच्या एक टक्का पैसे वसूल केला जात होता. सर्व बँकांच्या कर्ज प्रक्रियेतील शुल्क वेगवेगळं आहे. त्यात कोणतीही समानता नाही. गृह कर्ज किंवा कृषी कर्ज घेतल्यावर या शुल्काचा अतिरिक्त भार पडतो. परंतु शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतच कर्ज फक्त कोणत्याही शुल्काविना मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त कर्ज घेतल्यास ही शुल्क वसूल केली जाणार आहे. दुसरीकडे अर्थसंकल्पात मोदी सरकारनं शेतकऱ्याला सहा हजार रुपये वर्षाला देण्याची घोषणा केली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी