शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

निर्भया प्रकरणातील दोषींना 15 दिवसात फाशी द्या, सर्वोच्च न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 13:45 IST

देशाला हादरुन सोडणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्याप्रकरणातील तीन दोषींना 15 दिवसांत म्हणजेच दोन आठवड्यात फाशी द्यावी,

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातील दोषींना 15 दिवसांत फाशी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये, निर्भयाच्या हत्याप्रकरणातील आरोपींना दोन आठवड्यात फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. 

देशाला हादरुन सोडणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्याप्रकरणातील तीन दोषींना 15 दिवसांत म्हणजेच दोन आठवड्यात फाशी द्यावी, अशी मागणी एका याचिकेद्वार सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश देत आरोपींना फासावर लटकावे, असे म्हटले होते. राजधानी दिल्ली येथे 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण घडले होते. त्यानंतर, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात आला. याप्रकरणी सत्र न्यायालयाने 12 सप्टेंबर 2013 रोजी निकाल देत चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. तर यांमधील रामसिंह या एका आरोपीने निकालापूर्वीच तुरुंगात आत्महत्या केली होती. तर याप्रकरणातील सहावा आरोपी हा अल्वपयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. तर सर्वोच्च न्यायालयानेही चारही आरोपींची शिक्षा कायम ठेवली आहे. 

काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?

अल्पवयीन दोषीसह सहा जणांनी 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार केला होता. तसेच निर्भया व तिच्या मित्राला अमानुष मारहाण केली. यानंतर या दोघांना विवस्त्र रस्त्यावर फेकून त्यांच्यावर बस चालवण्याचा प्रयत्न केला. हे दोघं कित्येक तास विवस्त्र कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर पडून होते. या दरम्यान रस्त्यावरुन जाणा-या काहींनी त्यांना काही कपडे दिली व हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले. काही दिवसांनंतर निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. त्यापैकी एक दोषी राम सिंहने जेलमध्येच आत्महत्या केली.निर्भया प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. संसदेतही बलात्कारसंबंधी कायद्यात बदल करण्यात आले आणि कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली.  

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपSupreme Courtसर्वोच्च न्यायालयdelhiदिल्ली