शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

शहीद कर्नल आशुतोष शर्मा यांना भावपूर्ण निरोप; आईसाठी लिहिलेली कविता वाचून डोळे पाणावतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 15:29 IST

'आशुतोष शर्मा अमर रहे'च्या घोषणा आसमंतात घुमल्या आणि उपस्थितांचे डोळे पाणावले, अंग शहारले.

ठळक मुद्देशहीद कर्नल आशुतोष शर्मा यांना आज लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.कर्नल आशुतोष यांना आलेलं वीरमरण ही भारतीय लष्कराची मोठी हानीच आहे. लष्कराचा युनिफॉर्म म्हणजे कर्नल आशुतोष यांचं सर्वस्व होता.

जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा इथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जिगरबाज वीर कर्नल आशुतोष शर्मा यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. जयपूरमध्ये लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी 'आशुतोष शर्मा अमर रहे'च्या घोषणा आसमंतात घुमल्या आणि उपस्थितांचे डोळे पाणावले, अंग शहारले. भारतमातेच्या या शूरवीर सुपुत्राला त्याच्या कुटुंबीयांसह सगळ्यांनी अखेरचा सलाम केला.

कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामधील एका गावात शनिवारी एका घरात लपलेल्या काही दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. ही माहिती मिळताच, लष्कराच्या एका तुकडीने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने या भागाला घेराव घातला होता आणि नागरिकांची सुखरूप सुटका केली होती. मात्र त्याचवेळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर गोळीबार केला. त्याला चोख प्रत्युत्तर देत, 15 तास चाललेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं, पण आपले पाच वीर शहीद झाले होते. कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद यांच्यासह दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीसचे उपनिरीक्षक शकील काझी यांना हौतात्म्य आलं होतं.

 

२१ राष्ट्रीय रायफल युनिटचे नेतृत्व सांभाळणाऱ्या कर्नल आशुतोष यांना आलेलं वीरमरण ही भारतीय लष्कराची मोठी हानीच आहे. त्यांना दोन वेळा शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होतं. पाच वर्षांत पहिल्यांदाच भारतीय लष्करानं एवढ्या वरिष्ठ दर्जाचा अधिकारी गमावला आहे. काश्मीरमध्ये 'टायगर' अशीच त्यांची ओळख होती. 

मातृभूमीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या, तिच्या रक्षणासाठी शत्रूशी दोन होत करणाऱ्या कर्नल आशुतोष यांच्या मनाचा हळवा कोपरा आणि त्यात आईला असलेलं विशेष स्थान एका कवितेतून सहज लक्षात येतं. 28 एप्रिलला आशुतोष यांनी आपल्या आईसाठी लिहिलेली एक कविता वीरपत्नी पल्लवी यांनी माध्यमांना दिली आहे.  

वो अक्सर घर को सम्भालती, संवारती रहती हैमेरी मां मेरे घर आने की राह निहारती रहती हैलौट कर आऊंगा मैं भी पंछी की तरह मैं भी एक दिनवो बस इसी उम्मीद में दिन गुजारती रहती हैउससे मिले हुए हो गया पूरा एक साल लेकिनउसकी बातों में मेरे सरहद पर होने का गुरूर दिखता है।

या कवितेच्या प्रत्येक पंक्तीतून आईवरची माया, ममता, आस्था सहज जाणवते.

लष्कराचा युनिफॉर्म म्हणजे कर्नल आशुतोष यांचं सर्वस्व होता. त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल आम्हाला अभिमान आहे, अशा भावना वीरपत्नी पल्लवी यांनी व्यक्त केल्या. 

एन्काऊंटरवेळी कर्नलच्या फोनवर दहशतवाद्यांनी म्हटलं अस्सलाम वालेकुम; अन्...हे बलिदान विसरता कामा नये; हंदवाडा चकमकीत शहीद जवानांना Virat Kohliसह क्रीडा विश्वातून मानवंदनाकर्तव्यनिष्ठेला सलाम..."मला १५०० जवानांची काळजी घ्यायचीय, कुटुंब तू सांभाळ!""त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा"'ती' सरप्राईज भेट अखेरची ठरली; शहीद कर्नल शर्मांच्या भावानं सांगितली आठवण

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवाद