शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शहीद कर्नल आशुतोष शर्मा यांना भावपूर्ण निरोप; आईसाठी लिहिलेली कविता वाचून डोळे पाणावतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 15:29 IST

'आशुतोष शर्मा अमर रहे'च्या घोषणा आसमंतात घुमल्या आणि उपस्थितांचे डोळे पाणावले, अंग शहारले.

ठळक मुद्देशहीद कर्नल आशुतोष शर्मा यांना आज लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.कर्नल आशुतोष यांना आलेलं वीरमरण ही भारतीय लष्कराची मोठी हानीच आहे. लष्कराचा युनिफॉर्म म्हणजे कर्नल आशुतोष यांचं सर्वस्व होता.

जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा इथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जिगरबाज वीर कर्नल आशुतोष शर्मा यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. जयपूरमध्ये लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी 'आशुतोष शर्मा अमर रहे'च्या घोषणा आसमंतात घुमल्या आणि उपस्थितांचे डोळे पाणावले, अंग शहारले. भारतमातेच्या या शूरवीर सुपुत्राला त्याच्या कुटुंबीयांसह सगळ्यांनी अखेरचा सलाम केला.

कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामधील एका गावात शनिवारी एका घरात लपलेल्या काही दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. ही माहिती मिळताच, लष्कराच्या एका तुकडीने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने या भागाला घेराव घातला होता आणि नागरिकांची सुखरूप सुटका केली होती. मात्र त्याचवेळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर गोळीबार केला. त्याला चोख प्रत्युत्तर देत, 15 तास चाललेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं, पण आपले पाच वीर शहीद झाले होते. कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद यांच्यासह दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीसचे उपनिरीक्षक शकील काझी यांना हौतात्म्य आलं होतं.

 

२१ राष्ट्रीय रायफल युनिटचे नेतृत्व सांभाळणाऱ्या कर्नल आशुतोष यांना आलेलं वीरमरण ही भारतीय लष्कराची मोठी हानीच आहे. त्यांना दोन वेळा शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होतं. पाच वर्षांत पहिल्यांदाच भारतीय लष्करानं एवढ्या वरिष्ठ दर्जाचा अधिकारी गमावला आहे. काश्मीरमध्ये 'टायगर' अशीच त्यांची ओळख होती. 

मातृभूमीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या, तिच्या रक्षणासाठी शत्रूशी दोन होत करणाऱ्या कर्नल आशुतोष यांच्या मनाचा हळवा कोपरा आणि त्यात आईला असलेलं विशेष स्थान एका कवितेतून सहज लक्षात येतं. 28 एप्रिलला आशुतोष यांनी आपल्या आईसाठी लिहिलेली एक कविता वीरपत्नी पल्लवी यांनी माध्यमांना दिली आहे.  

वो अक्सर घर को सम्भालती, संवारती रहती हैमेरी मां मेरे घर आने की राह निहारती रहती हैलौट कर आऊंगा मैं भी पंछी की तरह मैं भी एक दिनवो बस इसी उम्मीद में दिन गुजारती रहती हैउससे मिले हुए हो गया पूरा एक साल लेकिनउसकी बातों में मेरे सरहद पर होने का गुरूर दिखता है।

या कवितेच्या प्रत्येक पंक्तीतून आईवरची माया, ममता, आस्था सहज जाणवते.

लष्कराचा युनिफॉर्म म्हणजे कर्नल आशुतोष यांचं सर्वस्व होता. त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल आम्हाला अभिमान आहे, अशा भावना वीरपत्नी पल्लवी यांनी व्यक्त केल्या. 

एन्काऊंटरवेळी कर्नलच्या फोनवर दहशतवाद्यांनी म्हटलं अस्सलाम वालेकुम; अन्...हे बलिदान विसरता कामा नये; हंदवाडा चकमकीत शहीद जवानांना Virat Kohliसह क्रीडा विश्वातून मानवंदनाकर्तव्यनिष्ठेला सलाम..."मला १५०० जवानांची काळजी घ्यायचीय, कुटुंब तू सांभाळ!""त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा"'ती' सरप्राईज भेट अखेरची ठरली; शहीद कर्नल शर्मांच्या भावानं सांगितली आठवण

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवाद