शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Kashmir Attack: काश्मीर बिहारींना सोपवा, १५ दिवसांत सुधारुन दाखवू; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 10:31 IST

जम्मू काश्मीरमध्ये लष्करी जवानांच्या दहशतवादविरोधी कारवायांना कंटाळून दहशतवाद्यांनी एकामागोमाग एक गैर काश्मीरी लोकांना निशाणा बनवलं आहे.

पटना – जम्मू काश्मीर दहशतवाद्यांकडून बाहेरील लोकांना टार्गेट करण्यावरुन बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काश्मीरची जबाबदारी बिहारी लोकांवर द्यावी. १५ दिवसांत परिस्थिती सुधारुन दाखवू असा इशाराच त्यांनी दिला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये लष्करी जवानांच्या दहशतवादविरोधी कारवायांना कंटाळून दहशतवाद्यांनी एकामागोमाग एक गैर काश्मीरी लोकांना निशाणा बनवलं आहे. रविवारी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बिहारच्या दोन मजुरांची हत्या केली. बिहारमध्ये राहणाऱ्या या मृत मजुरांचे नाव राजा आणि जोगिंदर असं होतं. शनिवारी दहशतवाद्यांनी पुलवामा आणि श्रीनगर येथे दोन लोकांची गोळी मारुन हत्या केली. श्रीनगरमध्ये राहणाऱ्या बिहारी अरविंद कुमारला निशाणा बनवण्यात आलं. तर पुलवामा येथील रहिवासी सगीर अहमद याचीही हत्या करण्यात आली.

या घटनांबाबत माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी ट्विट करुन सांगितलं आहे की, काश्मीरमध्ये वारंवार होणाऱ्या गरीब बिहारी लोकांच्या हत्येने मन व्यथित झालं आहे. जर परिस्थितीत बदल होत नसतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आग्रह आहे की, काश्मीरची जबाबदारी बिहारींवर द्या, १५ दिवसांत परिस्थिती बदलून दाखवू असं त्यांनी म्हटलं आहे.

काश्मीरमध्ये काय घडतंय?

दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये अल्पसंख्याक आणि परप्रातींयांना निशाणा बनवत आहेत. दहशतवाद्यांविरोधात सैन्यानं हल्लाबोल केला आहे. आतापर्यंत ७०० हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सुरक्षा जवानांनी अनेक भागात ऑपरेशन सुरु केले आहे. त्यामुळे भडकलेल्या दहशतवाद्यांनी परप्रांतीयांना निशाणा बनवलं आहे. बिहारमधील २ मजुरांची रविवारी कुलगाममध्ये हत्या करण्यात आली. या महिन्यात सर्वसामन्यांना दहशतवाद्यांकडून टार्गेट केले जात आहे.

अरविंद कुमार साह हा बिहारच्या बांका जिल्ह्यातील रहिवासी आहे. श्रीनगरमधील ईदगाह परिसरात एका पार्कच्या बाहेर तो पाणीपुरी विकतो. दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली. बिहारच्या मुख्यमत्र्यांनी त्याच्या कुटुंबाला २ लाखाच्या मदतीची घोषणा केली आहे. बिहारच्या भागलपूर येथील वीरेंद्र पासवान श्रीनगरच्या लाल बाजारातील फेरीवाला आहे. दहशतवाद्याने त्यालाही गोळ्या झाडून ठार केले. या महिनाभरात दहशतवाद्यांनी ११ जणांना ठार केले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाBiharबिहार