शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

Kashmir Attack: काश्मीर बिहारींना सोपवा, १५ दिवसांत सुधारुन दाखवू; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 10:31 IST

जम्मू काश्मीरमध्ये लष्करी जवानांच्या दहशतवादविरोधी कारवायांना कंटाळून दहशतवाद्यांनी एकामागोमाग एक गैर काश्मीरी लोकांना निशाणा बनवलं आहे.

पटना – जम्मू काश्मीर दहशतवाद्यांकडून बाहेरील लोकांना टार्गेट करण्यावरुन बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काश्मीरची जबाबदारी बिहारी लोकांवर द्यावी. १५ दिवसांत परिस्थिती सुधारुन दाखवू असा इशाराच त्यांनी दिला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये लष्करी जवानांच्या दहशतवादविरोधी कारवायांना कंटाळून दहशतवाद्यांनी एकामागोमाग एक गैर काश्मीरी लोकांना निशाणा बनवलं आहे. रविवारी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बिहारच्या दोन मजुरांची हत्या केली. बिहारमध्ये राहणाऱ्या या मृत मजुरांचे नाव राजा आणि जोगिंदर असं होतं. शनिवारी दहशतवाद्यांनी पुलवामा आणि श्रीनगर येथे दोन लोकांची गोळी मारुन हत्या केली. श्रीनगरमध्ये राहणाऱ्या बिहारी अरविंद कुमारला निशाणा बनवण्यात आलं. तर पुलवामा येथील रहिवासी सगीर अहमद याचीही हत्या करण्यात आली.

या घटनांबाबत माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी ट्विट करुन सांगितलं आहे की, काश्मीरमध्ये वारंवार होणाऱ्या गरीब बिहारी लोकांच्या हत्येने मन व्यथित झालं आहे. जर परिस्थितीत बदल होत नसतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आग्रह आहे की, काश्मीरची जबाबदारी बिहारींवर द्या, १५ दिवसांत परिस्थिती बदलून दाखवू असं त्यांनी म्हटलं आहे.

काश्मीरमध्ये काय घडतंय?

दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये अल्पसंख्याक आणि परप्रातींयांना निशाणा बनवत आहेत. दहशतवाद्यांविरोधात सैन्यानं हल्लाबोल केला आहे. आतापर्यंत ७०० हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सुरक्षा जवानांनी अनेक भागात ऑपरेशन सुरु केले आहे. त्यामुळे भडकलेल्या दहशतवाद्यांनी परप्रांतीयांना निशाणा बनवलं आहे. बिहारमधील २ मजुरांची रविवारी कुलगाममध्ये हत्या करण्यात आली. या महिन्यात सर्वसामन्यांना दहशतवाद्यांकडून टार्गेट केले जात आहे.

अरविंद कुमार साह हा बिहारच्या बांका जिल्ह्यातील रहिवासी आहे. श्रीनगरमधील ईदगाह परिसरात एका पार्कच्या बाहेर तो पाणीपुरी विकतो. दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली. बिहारच्या मुख्यमत्र्यांनी त्याच्या कुटुंबाला २ लाखाच्या मदतीची घोषणा केली आहे. बिहारच्या भागलपूर येथील वीरेंद्र पासवान श्रीनगरच्या लाल बाजारातील फेरीवाला आहे. दहशतवाद्याने त्यालाही गोळ्या झाडून ठार केले. या महिनाभरात दहशतवाद्यांनी ११ जणांना ठार केले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाBiharबिहार