शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Hamid Ansari Nusrat Mirza: पाकिस्तानला भारताबद्दलची माहिती पुरवण्याच्या आरोप; हमीद अन्सारींनी दिलं सडेतोड स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 20:12 IST

हमीद अन्सारी २००७ ते २०१७ या काळात भारताचे उपराष्ट्रपती होते.

Hamid Ansari Nusrat Mirza: नुसरत मिर्झा या पाकिस्तानी पत्रकाराच्या दाव्याने भारताच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून वाद वाढल्यानंतर खुद्द माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनीच या संदर्भात स्पष्टीकरण दिले. 'मी नुसरत मिर्झा यांना कधीही फोन केलेला नाही किंवा भेटलेलो नाही', असे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी स्पष्ट केले. मीडियामध्ये माझ्याबाबत सुरू असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. माझ्याविरोधात खोटे बोलले जात आहे आणि त्यांच्यात भाजपाच्या अधिकृत प्रवक्त्याचाही समावेश आहे, असा उलट आरोपही त्यांनी केला.

भाजपाने काय केले आरोप?

एका पाकिस्तानी पत्रकाराच्या खुलाशानंतर भाजपने काँग्रेस नेते आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी खुलासा केला की, तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांना पाच वेळा भारतात आमंत्रित केले होते. अन्सारींनी या दरम्यान भारतासंबंधी अति संवेदनशील आणि गोपनीय माहिती त्यांना दिली. ही माहिती ISI सोबत शेअर करुन भारताविरोधात वापरली गेली.' 

हमीद अन्सारींचे स्पष्टीकरण

हमीद अन्सारी म्हणाले की, सध्या अशा बातम्या दिल्या जात आहेत की भारताचे उपराष्ट्रपती या नात्याने मी पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांना निमंत्रित केले आहे. नवी दिल्लीत 'दहशतवाद' या विषयावर आयोजित कार्यक्रमात मी त्यांची भेट घेतली. आणि जेव्हा मी इराणमध्ये भारताचा राजदूत होतो तेव्हा मी राष्ट्रहिताच्या विरोधात वागलो. पण हे सारं तथ्यहीन आहे. उपराष्ट्रपतींकडून परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्याची प्रक्रिया सरकारच्या सल्ल्यानुसार केली जाते. त्यात प्रामुख्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा समावेश असतो ही बाब सर्वांनाच ज्ञात आहे आणि ते सत्य आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की मी त्या व्यक्तीला कधीही आमंत्रित केले नाही आणि कधीही भेटलेलो नाही.

११ डिसेंबर २०१० रोजी दहशतवाद या विषयावरील परिषदेचे उद्घाटन मी केले होते. नेहमीप्रमाणे, पाहुण्यांची यादी आयोजकांनी तयार केली होती. मी त्यातील कोणालाही कधीही फोन केला नाही किंवा भेटलेलो नाही. इराणमधील राजदूत माझ्या कामाची सर्व माहिती त्या वेळच्या सरकारकडे होती. मी राष्ट्रीय सुरक्षेशी बांधील आहे आणि अशा प्रकरणांवर प्रतिक्रिया देणे टाळतो. या संबंधीची सर्व माहिती भारत सरकारकडे आहे आणि याबाबतचे सत्य सांगणे हा त्यांचा अधिकार आहे. तेहरानमधील माझ्या कार्यकाळानंतर मला UNSC मध्ये भारताचा स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले आणि तेथे माझ्या कार्याला देश-विदेशात मान्यता मिळाली हेदेखील रेकॉर्डवर आहे, याचीही हमीद अन्सारी यांनी आठवण करून दिली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBJPभाजपाcongressकाँग्रेस