शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

बंगळुरूमधील अर्धे लोक परप्रांतीय, नोकरीपासून, व्यवसायांपर्यंत एवढे लाख लोक आहेत बाहेरील  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 17:39 IST

Bengaluru News: कर्नाटकधील मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना १०० टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकाला नुकतीच मान्यता दिली होती. मात्र या निर्णयाला विरोध झाल्यानंतर सरकारने या विधेयकाला स्थगिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आता बंगळुरूमध्ये परप्रांतियांची संख्या किती आहे आणि ते काय काम करतात, याची आकडेवारी समोर आली आहे. 

कर्नाटकधील मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना १०० टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकाला नुकतीच मान्यता दिली होती. मात्र या निर्णयाला विरोध झाल्यानंतर सरकारने या विधेयकाला स्थगिती दिली होती. दरम्यान, कर्नाटक सरकारच्या या निर्णयानंतर बंगळुरूमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरील लोक वास्तव्यास आहेत, त्यामुळे खासगी कंपन्यांना नियुक्त्या करताना अडचणी येऊ शकतात, असे बोलले जात होते.  त्या पार्श्वभूमीवर आता बंगळुरूमध्ये परप्रांतियांची संख्या किती आहे आणि ते काय काम करतात, याची आकडेवारी समोर आली आहे. 

२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार त्यावेळी कर्नाटकची लोकसंख्या ६.११ कोटी रुपये होती. त्यामध्ये ३.६ टक्के लोक हे परप्रांतीय म्हणजे बाहेरील लोकांकडून आलेले होते. जनगणनेच्या आकडेवारीनुसार कर्नाटकमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये ६.४ लाख लोक हे तामिळनाडूमधील आहेत. तर आंध्र प्रदेशातील ४.४ लाख, केरळमधील २.३ लाख, उत्तर प्रदेशमधील १.४ लाख, बिहारमधील १.२ लाख, महाराष्ट्रातील १.१ लाख आणि इतर राज्यांमधील ३.२ लाख लोक होते. म्हणजेच सुमारे ३२ लाख लोक हे परप्रांतीय होते. आता ही आकडेवारी बदलण्याची शक्यता आहे. 

एका रिपोर्टनुसार २०१९ मध्ये बंगळुरूमध्ये राहणाऱ्या लोकांपैकी ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही बाहेरून आलेल्यांची आहे. बंगळूरूमध्ये ४४.३ लाख लोक हे बाहेरील राहणारे आहेत. हा आकडा बंगळुरूच्या एकूण लोकसंख्येपैकी ५०.६० टक्के आहे.  उल्लेखनीय बाब म्हणजे ही संख्या कर्नाटकमधून बाहेर जाणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा खूप अधिक आहे. एका अहवालानुसार कर्नाटकमधून बाहेर जाणाऱ्या लोकांची संख्या ही २५ लाख आहे. 

बंगळुरूचा विचार करायचा झाल्यास २०११ च्या जनगणनेनुसार बंगळुरूची लोकसंख्या ९६.२ लाख एवढी होती. त्यामध्ये ४४.३ लाख लोक हे परप्रांतीय होते. मात्र नंतर सुधारीत आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र आता या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. ही आकडेवारी ग्रामीण आणि शहरी अशी दोन्ही भागांमधील आहे. येथे येणाऱ्या लोकांमध्ये सर्वाधिक संख्या ही आंध्र प्रदेशमधील लोकांची आहे. त्यांची आकडेवारी ३४ टक्के आहे. त्यानंतर केरळचा नंबर लागलोत. तर शेजारील राज्यांनंतर बंगळुरूमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये राजस्थानमधून येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे.

या रिपोर्टनुसार २००१ च्या जनगणनेदरम्यान, बंगळुरूमधील लोकसंख्या ही ६५ लाख ३७ हजार एवढी होती. त्यामध्ये २०.८ लाख स्थलांतरीत झालेले होते. ही संख्या २०११ मध्ये वाढून ती ४४.३ लाख एवढी झाली. ही संख्या दुप्पटीहून अधिक झालेली आहे. अशा परिस्थितीत पुढील जनगणनेवेळी बंगळुरूमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या ही आणखी वाढण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकBengaluruबेंगळूर