भारताने अलीकडेच राबवलेलं ऑपरेशन ‘सिंदूर’ पाकिस्तानसाठी एक मोठा हादरा ठरलं आहे. पाकिस्तानमधीलदहशतवादाच्या मुळांवर हा जोरदार आघात बसल्यामुळे तिकडच्या दहशतवादी गटांमध्ये जबरदस्त भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या कारवाईनंतर पाकिस्तानमधून कुठलाही औपचारिक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या मौनातूनच परिस्थितीचं गांभीर्य स्पष्ट होतं.
तल्हा सईद घाबरलादहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद सध्या पाकिस्तानी सोशल मीडियावर एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला की, “भारताला हाफिज सईदची गरज का आहे?” मात्र, त्याचा संताप आणि बचावात्मक भूमिका पाहता हे स्पष्ट होतं की, ऑपरेशन सिंदूरमुळे त्याच्या मनात भीती घर करून बसली आहे.
कालपर्यंत भारतविरोधी जहरी वक्तव्य करणारे हे चेहरे आज स्वतःच्या निष्पापतेचा दाखला देताना दिसत आहेत. यावरून स्पष्ट होते की ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.
७ मेच्या कारवाईने दहशतवादी तळ हादरले!७ मे रोजी भारताने पाकिस्तानातील विविध दहशतवादी तळांवर तडाखेबंद कारवाई केली. या कारवाईत हाफिज सईद आणि मसूद अझहरच्या दहशतवादी नेटवर्कवरही आघात करण्यात आला. हाफिजच्या ठिकाणावर झालेला हल्ला अत्यंत प्रभावी होता, आणि मसूद अझहरचा बहावलपूर येथील मदरसा उद्ध्वस्त झाला. दोघेही या कारवाईतून थोडक्यात वाचले, मात्र त्यांची सुरक्षितता आता धोक्यात आहे.
दहशतवादी नेत्यांच्या काळजावर भीतीची छाया!हाफिज सईद आणि मसूद अझहरसारखे कुख्यात दहशतवादी आता त्यांच्या गुप्त ठिकाणांवर लपून बसले आहेत. ऑपरेशन सिंदूरमुळे त्यांना समजलं आहे की, भारत आता केवळ प्रतिक्रियाशील भूमिका न घेता थेट कारवाई करतोय. त्यामुळेच पाकिस्तानातील इतर दहशतवादी गटांमध्ये देखील असुरक्षिततेची भावना आहे.
राजकीय नेतृत्वालाही झटकाफक्त दहशतवादीच नव्हे, तर पाकिस्तानातील उच्चपदस्थ नेते – शाहबाज शरीफ आणि जनरल मुनीर – यांच्याही हालचालींवर याचा परिणाम झालेला दिसतो. आताच्या घडीला त्यांच्यावरही दबाव वाढलेला आहे, कारण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची प्रतिमा खराब झाली आहे.