शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

एकदा माफी मागितली असती, तर वाचली असती राहुल गांधींची खासदारकी! मानहानीप्रकरणी आधीही मागीतलीय 3 वेळा माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 12:19 IST

अशा स्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की, राहुल गांधी या संपूर्ण प्रकरणात अडकलेच कसे? यामागे खरो खरच भाजप आहे का? तर सत्य असे आहे...

मोदी आडनावावरील वक्तव्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयानंतर लगेचच राहुल गांधींना जामीनही मिळाला. पण या निर्णयामुळे, लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली असून राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व गेले आहे.

अशा स्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की, राहुल गांधी या संपूर्ण प्रकरणात अडकलेच कसे? यामागे खरो खरच भाजप आहे का? तर सत्य असे आहे की, यामागे भाजप नाही, तर वकिलांची टीमच आहे, जी या प्रकरणात राहुल गांधींची बाजू मांडत होती. म्हणजे, या वकिलांमुळेच राहुल गांधी या प्रकरणात एवढे अडकले, की त्यांना संसदेचे सदस्यत्वही गमवावे लागले, असे वाटते.

खरे तर, मानहानी प्रकरणातील बहुतांश प्रकरणे माफी मागून निकाली निघत असतात. तसेच, या प्रकरणातही राहुल गांधींनी माफी मागितली असती, तर कदाचित न्यायालयातच काही तोडगा निघाला असता आणि न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवले नसते. परिणामी, राहुल यांची खासदारकी वाचली असती, ती रद्द झाली नसती.

माफी मागितली असती तर वाचली असती खासदारकी? -खरे तर, राहुल गांधी सूरतच्या न्यायालयात तीन वेळ हजर झाले. पण त्यांनी यांपैकी एकदाही न्यायालयात आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही. यामुळे हे सर्व घडले. पण, यापूर्वी त्यांनी कधी मानहानी प्रकरणात माफी मागीतलीच नाही, असे नाही. यापूर्वी 2019 मध्ये, राहुल गांधींनी प्रधान मोदींबद्दल 'चौकीदार चोर है' अशी घोषणा दिली होती. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात, एक-दोन नव्हे तर, तब्बल तीन वेळा माफीनामा सादर केला होता. तसेच यांपैकी जो शेवटचा माफीनामा होता, यात राहुल गांधींनी चौथ्या मुद्द्यात लिहिले होते की, 'ते आपल्या या चुकीच्या वक्तव्यासाठी बिनशर्त माफी मागत आहेत.' 

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींचे वकील अभिषेक मनु सिंघवी होते आणि त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना जो सल्ला दिला होता, त्या सल्ल्यावर राहुल गांधी माफी मागून त्या प्रकरणातून मुक्त झाले होते. राहुल गांधी असेच या प्रकरणातही करू शकले असते. मात्र कदाचित त्यांच्या वकिलांनी त्यांना यावेळी माफी न मागण्याचा सल्ला दिला असावा, यामुळेच ते या प्रकरणात अडकत गेले आणि आता खासदारावरून माजी खासदार झाले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCourtन्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदी