शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

एकदा माफी मागितली असती, तर वाचली असती राहुल गांधींची खासदारकी! मानहानीप्रकरणी आधीही मागीतलीय 3 वेळा माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 12:19 IST

अशा स्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की, राहुल गांधी या संपूर्ण प्रकरणात अडकलेच कसे? यामागे खरो खरच भाजप आहे का? तर सत्य असे आहे...

मोदी आडनावावरील वक्तव्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयानंतर लगेचच राहुल गांधींना जामीनही मिळाला. पण या निर्णयामुळे, लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली असून राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व गेले आहे.

अशा स्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की, राहुल गांधी या संपूर्ण प्रकरणात अडकलेच कसे? यामागे खरो खरच भाजप आहे का? तर सत्य असे आहे की, यामागे भाजप नाही, तर वकिलांची टीमच आहे, जी या प्रकरणात राहुल गांधींची बाजू मांडत होती. म्हणजे, या वकिलांमुळेच राहुल गांधी या प्रकरणात एवढे अडकले, की त्यांना संसदेचे सदस्यत्वही गमवावे लागले, असे वाटते.

खरे तर, मानहानी प्रकरणातील बहुतांश प्रकरणे माफी मागून निकाली निघत असतात. तसेच, या प्रकरणातही राहुल गांधींनी माफी मागितली असती, तर कदाचित न्यायालयातच काही तोडगा निघाला असता आणि न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवले नसते. परिणामी, राहुल यांची खासदारकी वाचली असती, ती रद्द झाली नसती.

माफी मागितली असती तर वाचली असती खासदारकी? -खरे तर, राहुल गांधी सूरतच्या न्यायालयात तीन वेळ हजर झाले. पण त्यांनी यांपैकी एकदाही न्यायालयात आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही. यामुळे हे सर्व घडले. पण, यापूर्वी त्यांनी कधी मानहानी प्रकरणात माफी मागीतलीच नाही, असे नाही. यापूर्वी 2019 मध्ये, राहुल गांधींनी प्रधान मोदींबद्दल 'चौकीदार चोर है' अशी घोषणा दिली होती. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात, एक-दोन नव्हे तर, तब्बल तीन वेळा माफीनामा सादर केला होता. तसेच यांपैकी जो शेवटचा माफीनामा होता, यात राहुल गांधींनी चौथ्या मुद्द्यात लिहिले होते की, 'ते आपल्या या चुकीच्या वक्तव्यासाठी बिनशर्त माफी मागत आहेत.' 

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींचे वकील अभिषेक मनु सिंघवी होते आणि त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना जो सल्ला दिला होता, त्या सल्ल्यावर राहुल गांधी माफी मागून त्या प्रकरणातून मुक्त झाले होते. राहुल गांधी असेच या प्रकरणातही करू शकले असते. मात्र कदाचित त्यांच्या वकिलांनी त्यांना यावेळी माफी न मागण्याचा सल्ला दिला असावा, यामुळेच ते या प्रकरणात अडकत गेले आणि आता खासदारावरून माजी खासदार झाले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCourtन्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदी