शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

एकदा माफी मागितली असती, तर वाचली असती राहुल गांधींची खासदारकी! मानहानीप्रकरणी आधीही मागीतलीय 3 वेळा माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 12:19 IST

अशा स्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की, राहुल गांधी या संपूर्ण प्रकरणात अडकलेच कसे? यामागे खरो खरच भाजप आहे का? तर सत्य असे आहे...

मोदी आडनावावरील वक्तव्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयानंतर लगेचच राहुल गांधींना जामीनही मिळाला. पण या निर्णयामुळे, लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली असून राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व गेले आहे.

अशा स्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की, राहुल गांधी या संपूर्ण प्रकरणात अडकलेच कसे? यामागे खरो खरच भाजप आहे का? तर सत्य असे आहे की, यामागे भाजप नाही, तर वकिलांची टीमच आहे, जी या प्रकरणात राहुल गांधींची बाजू मांडत होती. म्हणजे, या वकिलांमुळेच राहुल गांधी या प्रकरणात एवढे अडकले, की त्यांना संसदेचे सदस्यत्वही गमवावे लागले, असे वाटते.

खरे तर, मानहानी प्रकरणातील बहुतांश प्रकरणे माफी मागून निकाली निघत असतात. तसेच, या प्रकरणातही राहुल गांधींनी माफी मागितली असती, तर कदाचित न्यायालयातच काही तोडगा निघाला असता आणि न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवले नसते. परिणामी, राहुल यांची खासदारकी वाचली असती, ती रद्द झाली नसती.

माफी मागितली असती तर वाचली असती खासदारकी? -खरे तर, राहुल गांधी सूरतच्या न्यायालयात तीन वेळ हजर झाले. पण त्यांनी यांपैकी एकदाही न्यायालयात आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही. यामुळे हे सर्व घडले. पण, यापूर्वी त्यांनी कधी मानहानी प्रकरणात माफी मागीतलीच नाही, असे नाही. यापूर्वी 2019 मध्ये, राहुल गांधींनी प्रधान मोदींबद्दल 'चौकीदार चोर है' अशी घोषणा दिली होती. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात, एक-दोन नव्हे तर, तब्बल तीन वेळा माफीनामा सादर केला होता. तसेच यांपैकी जो शेवटचा माफीनामा होता, यात राहुल गांधींनी चौथ्या मुद्द्यात लिहिले होते की, 'ते आपल्या या चुकीच्या वक्तव्यासाठी बिनशर्त माफी मागत आहेत.' 

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींचे वकील अभिषेक मनु सिंघवी होते आणि त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना जो सल्ला दिला होता, त्या सल्ल्यावर राहुल गांधी माफी मागून त्या प्रकरणातून मुक्त झाले होते. राहुल गांधी असेच या प्रकरणातही करू शकले असते. मात्र कदाचित त्यांच्या वकिलांनी त्यांना यावेळी माफी न मागण्याचा सल्ला दिला असावा, यामुळेच ते या प्रकरणात अडकत गेले आणि आता खासदारावरून माजी खासदार झाले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCourtन्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदी