शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

पतीच्या मृत्यूनंतर न रडल्याची भयंकर शिक्षा; 'तिने' पाच वर्ष तुरुंगात काढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 14:29 IST

पतीच्या मृत्यूनंतर रडली नाही म्हणून आसाममधील एका न्यायालयाने पतीच्या हत्येसाठी पत्नीला जबाबदार ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

गुवाहाटी - पतीच्या मृत्यूनंतर रडली नाही म्हणून आसाममधील एका न्यायालयाने पतीच्या हत्येसाठी पत्नीला जबाबदार ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून तुरुंगात असलेल्या या महिलेची सर्वोच्च न्यायालयाने आता सुटका केली आहे. आसाम सत्र न्यायालयाचा महिलेच्या शिक्षेसंदर्भातला निर्णय आसाम उच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर या महिलेला न्याय मिळाला आहे. 

पाच वर्षांपूर्वी या महिलेच्या पतीची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी पतीच्या अंत्यसंस्काराच्यावेळी त्याची पत्नी अजिबात रडली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी या हत्येसाठी पत्नीलाच आरोपी ठरवले होते. सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने देखील महिलेला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध महिलेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन आणि न्यायमूर्ती नवीन सिन्हा यांच्या खंडपीठाने महिलेला या परिस्थितीजन्य पुराव्यांवरून दोषी ठरवता येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि महिलेची निर्दोष मुक्तता केली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMurderखून