शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

नखं वाढवल्यानं मुख्याध्यापक सर्वांसमोर ओरडले; विद्यार्थिनीनं गळफास लावून जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 10:38 IST

नखं वाढवल्यानं, मोठे कानातले घातल्यानं मुख्याध्यापक ओरडल्यानं विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबावर शोककळा

गुरुग्राम: दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणातल्या गुरुग्राममध्ये घडली आहे. ही विद्यार्थी १५ वर्षांची होती. या प्रकरणी मुलीच्या काकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर मुलीच्या कानशिलात लगावली. त्यामुळेच तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप काकांनी केला आहे. नखं वाढवल्यानं, मोठे कानातले घातल्यानं आणि मोबाईल सोबत बाळगल्यानं मुख्याध्यापक सर्व विद्यार्थ्यांसमोर मुलीला ओरडले होते, असं काकांनी तक्रारीत म्हटलं आहे.९ एप्रिल रोजी मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या एक दिवस आधी तिला शाळेत मुख्याध्यापक ओरडले होते. '८ एप्रिलला मुख्याध्यापकांनी मुलीच्या पालकांना शाळेत बोलावलं होतं. मुलगी शिस्त पाळत नसल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी पालकांकडे केली. विद्यार्थिनी नखं वाढवते, मोठे कानातले घालते, मोबाईल सोबत ठेवते अशा तक्रारींचा पाढा मुख्याध्यापकांनी पालकांसमोर वाचला. मी तुमच्या मुलीला शाळेतून काढून टाकेन, असंदेखील ते पुढे म्हणाले,' असं मुलीच्या काकांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे.धक्कादायक! ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १२ कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू८ एप्रिलला मुलगी शाळेतून घरी आली. ती घरी कोणाशीही बोलली नाही. तिनं काहीच खाल्लं नाही. ९ एप्रिलला विद्यार्थिनीचे पालक नववीत शिकत असलेल्या तिच्या भावाला घेऊन मुख्याध्यापकांना भेटायला गेले. मुलीला शाळेतून काढू नका, अशी विनंती त्यांनी केली. यानंतर मुख्याध्यापक संतापले. त्यांनी पालकांकडे दोन्ही मुलांच्या तक्रारी केल्या आणि त्यांची नावं शाळेतून कमी करण्यास सांगितली. पालकांनी मुख्याध्यापकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कोणाचंही ऐकून घेतलं नाही, असं मुलीच्या काकांनी तक्रारीत म्हटलं आहे.