शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

नखं वाढवल्यानं मुख्याध्यापक सर्वांसमोर ओरडले; विद्यार्थिनीनं गळफास लावून जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 10:38 IST

नखं वाढवल्यानं, मोठे कानातले घातल्यानं मुख्याध्यापक ओरडल्यानं विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबावर शोककळा

गुरुग्राम: दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणातल्या गुरुग्राममध्ये घडली आहे. ही विद्यार्थी १५ वर्षांची होती. या प्रकरणी मुलीच्या काकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर मुलीच्या कानशिलात लगावली. त्यामुळेच तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप काकांनी केला आहे. नखं वाढवल्यानं, मोठे कानातले घातल्यानं आणि मोबाईल सोबत बाळगल्यानं मुख्याध्यापक सर्व विद्यार्थ्यांसमोर मुलीला ओरडले होते, असं काकांनी तक्रारीत म्हटलं आहे.९ एप्रिल रोजी मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या एक दिवस आधी तिला शाळेत मुख्याध्यापक ओरडले होते. '८ एप्रिलला मुख्याध्यापकांनी मुलीच्या पालकांना शाळेत बोलावलं होतं. मुलगी शिस्त पाळत नसल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी पालकांकडे केली. विद्यार्थिनी नखं वाढवते, मोठे कानातले घालते, मोबाईल सोबत ठेवते अशा तक्रारींचा पाढा मुख्याध्यापकांनी पालकांसमोर वाचला. मी तुमच्या मुलीला शाळेतून काढून टाकेन, असंदेखील ते पुढे म्हणाले,' असं मुलीच्या काकांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे.धक्कादायक! ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १२ कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू८ एप्रिलला मुलगी शाळेतून घरी आली. ती घरी कोणाशीही बोलली नाही. तिनं काहीच खाल्लं नाही. ९ एप्रिलला विद्यार्थिनीचे पालक नववीत शिकत असलेल्या तिच्या भावाला घेऊन मुख्याध्यापकांना भेटायला गेले. मुलीला शाळेतून काढू नका, अशी विनंती त्यांनी केली. यानंतर मुख्याध्यापक संतापले. त्यांनी पालकांकडे दोन्ही मुलांच्या तक्रारी केल्या आणि त्यांची नावं शाळेतून कमी करण्यास सांगितली. पालकांनी मुख्याध्यापकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कोणाचंही ऐकून घेतलं नाही, असं मुलीच्या काकांनी तक्रारीत म्हटलं आहे.