शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

नखं वाढवल्यानं मुख्याध्यापक सर्वांसमोर ओरडले; विद्यार्थिनीनं गळफास लावून जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 10:38 IST

नखं वाढवल्यानं, मोठे कानातले घातल्यानं मुख्याध्यापक ओरडल्यानं विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबावर शोककळा

गुरुग्राम: दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणातल्या गुरुग्राममध्ये घडली आहे. ही विद्यार्थी १५ वर्षांची होती. या प्रकरणी मुलीच्या काकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर मुलीच्या कानशिलात लगावली. त्यामुळेच तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप काकांनी केला आहे. नखं वाढवल्यानं, मोठे कानातले घातल्यानं आणि मोबाईल सोबत बाळगल्यानं मुख्याध्यापक सर्व विद्यार्थ्यांसमोर मुलीला ओरडले होते, असं काकांनी तक्रारीत म्हटलं आहे.९ एप्रिल रोजी मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या एक दिवस आधी तिला शाळेत मुख्याध्यापक ओरडले होते. '८ एप्रिलला मुख्याध्यापकांनी मुलीच्या पालकांना शाळेत बोलावलं होतं. मुलगी शिस्त पाळत नसल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी पालकांकडे केली. विद्यार्थिनी नखं वाढवते, मोठे कानातले घालते, मोबाईल सोबत ठेवते अशा तक्रारींचा पाढा मुख्याध्यापकांनी पालकांसमोर वाचला. मी तुमच्या मुलीला शाळेतून काढून टाकेन, असंदेखील ते पुढे म्हणाले,' असं मुलीच्या काकांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे.धक्कादायक! ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १२ कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू८ एप्रिलला मुलगी शाळेतून घरी आली. ती घरी कोणाशीही बोलली नाही. तिनं काहीच खाल्लं नाही. ९ एप्रिलला विद्यार्थिनीचे पालक नववीत शिकत असलेल्या तिच्या भावाला घेऊन मुख्याध्यापकांना भेटायला गेले. मुलीला शाळेतून काढू नका, अशी विनंती त्यांनी केली. यानंतर मुख्याध्यापक संतापले. त्यांनी पालकांकडे दोन्ही मुलांच्या तक्रारी केल्या आणि त्यांची नावं शाळेतून कमी करण्यास सांगितली. पालकांनी मुख्याध्यापकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कोणाचंही ऐकून घेतलं नाही, असं मुलीच्या काकांनी तक्रारीत म्हटलं आहे.