शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाकिस्तानला बंदुकीने हाकला; आम्हाला वाचवा, पीओकेतील नागरिकांची भारताकडे याचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 12:32 IST

PoK News: : पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेचे नागरिक पाकिस्तानच्या विळख्यातून मुक्ततेसाठी भारताकडे मदतीची याचना करत आहेत. बाग, नीलम व्हॅली, गिलगिट बाल्टिस्तान (जीबी) येथील लोकांच्या मनात पाकविषयी कटुता निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेचे नागरिक पाकिस्तानच्या विळख्यातून मुक्ततेसाठी भारताकडे मदतीची याचना करत आहेत. बाग, नीलम व्हॅली, गिलगिट बाल्टिस्तान (जीबी) येथील लोकांच्या मनात पाकविषयी कटुता निर्माण झाली आहे. येथील राष्ट्रवादी समता पक्षाचे (एनईपी) अध्यक्ष प्रा. सज्जाद रझा म्हणाले की, जम्मू-काश्मीर विधानसभेत पीओकेसाठी २४ जागा राखीव आहेत. जेव्हा-जेव्हा निवडणुका असतात तेव्हा आम्हाला भारतीय संविधानानुसार नावनोंदणी करायची असते.

भारताने पीओकेत जन्मलेल्या नागरिकांनाही सुविधा द्याव्यात. त्यांना लोकसभा, राज्यसभेवरही स्थान द्यावे, अशी आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले. रझा म्हणाले, ‘पाकने बंदुकीच्या जोरावर पीओके ताब्यात घेतला. भारतानेही बंदुकीच्या जोरावर त्याला येथून हाकलून द्यावे.

५ वर्षांत पाकला हुसकावून लावू  पीओकेतील आरक्षित जागांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जावी. आम्ही पीओकेमध्ये रुग्णालये, शाळा बांधू. जर पाकिस्तानने हा विकास निधी वापरण्यास मज्जाव केला तर संपूर्ण जगात इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीसमोर त्याचा पर्दाफाश करू. भारताने आम्हाला साथ दिली तर आम्ही पाकिस्तानला पाच वर्षांत हाकलून लावू शकतो, असे ते म्हणाले.

पाकला उघडे पाडूपीओकेत कोणतीही निवडणूक नाही, सर्व काही लष्कर ठरवते. तथाकथित राष्ट्राध्यक्ष पाकच्या पैशाने जगभर फिरतात, काश्मीरबाबत खोटी विधाने करतात. जर भारताने आम्हाला पाठिंबा दिला तर आम्ही त्यांना जिनिव्हापासून संयुक्त राष्ट्रांपर्यंत सर्वत्र उघडे पाडू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :POK - pak occupied kashmirपीओकेIndiaभारत