शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

गुज्जरांच्या आंदोलनाने रस्ते, रेल्वे बंद; जमावबंदी लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 06:03 IST

लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच राजस्थानातील गुज्जर समाजाने सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात पाच टक्के राखीव जागांच्या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन पेटले आहे.

जयपूर : लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच राजस्थानातील गुज्जर समाजाने सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात पाच टक्के राखीव जागांच्या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन पेटले आहे. सोमवारी सलग चौथ्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग अडवून ठेवला. हा महामार्ग जयपूरला आग्य्राशी आणि राजस्थानच्या दौसा जिल्ह्याशी जोडणारा आहे. आंदोलनकर्त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू केली आहे.दौसात सिकंदरा येथे राष्ट्रीय महामार्ग ११ आंदोलकांनी बंद पाडला. बुंदी जिल्ह्यात नैनवा येथे रविवारी राज्य महामार्ग अडवून ठेवण्यात आला, तसेच सवाई माधोपूरमधील मलारना रस्ता आणि करौलीतील बुदला खेड्यात करौली-हिंदौन रस्ताही अडवून ठेवण्यात आला असल्याचे पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) एम. एल. माथूर यांनी सांगितले.दौसाचे पोलीस अधीक्षक प्रल्हाद सिंह म्हणाले की, अडवून ठेवण्यात आलेल्या रस्त्याकडे जाणारी वाहने पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली. वाहतूक वळविण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. रस्ता अडवून ठेवण्याचे हे आंदोलन शांततेत आहे, असे सिंह म्हणाले. रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षणी राजस्थानात एक राष्ट्रीय महामार्ग, एक राज्य महामार्ग, दोन प्रमुख रस्ते आणि दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग आंदोलकांनी बंद पाडले आहेत. त्यामुळे अनेक रेल्वे रद्द कराव्या लागल्या किंवा त्यांचे मार्ग बदलावे लागले. (वृत्तसंस्था)२५0 गाड्यांवर परिणामया आंदोलनाला ढोलपूर जिल्ह्यात रविवारी गोळीबार होऊन पोलिसांची वाहने पेटविली गेल्यावर हिंसक वळण लागले. त्यानंतर, अधिकाºयांनी ढोलपूर आणि करौली जिल्ह्यांत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १४४वे कलम (जमावबंदी) लागू केले. ते सध्याही लागू आहे. शुक्रवारी आंदोलन सुरू झाल्यापासून २५०पेक्षा जास्त रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थान