शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Gujarat: विजय रुपाणी-नितीन पटेल नेतृत्वात निवडणूक लढवणार होते; २७ दिवसांत भाजपानं निर्णय बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 12:32 IST

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विजयासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तेव्हा विजय रुपाणी हेच मुख्यमंत्री होते.

ठळक मुद्देमध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे राज्य सरकारच्या कामकाजाबद्दल लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले.गेल्या अनेक दिवसांपासून पटेल समुदायही भाजपावर नाराज होताभाजपानं विधानसभा निवडणुकीच्या १ वर्ष आधी मुख्यमंत्री चेहरा बदलण्याचा निर्णय घेतला.

अहमदाबाद - गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. परंतु तत्पूर्वी भारतीय जनता पार्टीने(BJP) त्यांचा मुख्यमंत्री बदलला आहे. कुणालाही काही भनक न लागताच गुजरातमध्ये विजय रुपाणी(Vijay Rupani) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि २४ तासांत भूपेंद्र पटेल(Bhupendra Patel) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुढे आले.

२७ दिवसांपूर्वीच भाजपानं आगामी २०२२ विधानसभा निवडणूक विजय रुपाणी-नितीन पटेल यांच्या जोडीसोबत लढणार असल्याचं जाहीर केले. नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी जेव्हापासून अहमदाबाद सोडून दिल्लीचं तख्त सांभाळलं आहे. तेव्हापासून गुजरातमध्ये भाजपाच्या नेतृत्वावर संकट येत आहे.

नरेंद्र मोदी यांच्यानंतर आनंदी बेन पटेल यांनी कमान सांभाळली. परंतु त्यांच्याविरोधात लोकांचा आक्रोश वाढला त्यानंतर भाजपाने नेतृत्वात बदल करुन विजय रुपाणी यांच्यावर जबाबदारी दिली. अलीकडेच विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळाची ५ वर्ष पूर्ण केली. १६ ऑगस्ट रोजी गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर पाटील यांनी आगामी निवडणूक विजय रुपाणी आणि नितीन पटेल यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं विधान केले होते. गुजरातमध्ये अनेक दिवसांपासून नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यावेळी पक्षाने रुपाणी-पटेल जोडी चांगले काम करत असून बदल करण्याची गरज नाही असं म्हटलं.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विजयासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तेव्हा विजय रुपाणी हेच मुख्यमंत्री होते. मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे राज्य सरकारच्या कामकाजाबद्दल लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले. ज्यामुळे रुपाणी यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली. गेल्या अनेक दिवसांपासून पटेल समुदायही भाजपावर नाराज होता. ही सगळी कारणं पाहता भाजपानं विधानसभा निवडणुकीच्या १ वर्ष आधी मुख्यमंत्री चेहरा बदलण्याचा निर्णय घेतला. पटेल समुदायातील भूपेंद्र पटेल यांना संधी देत समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. भाजपाने मागील काही दिवसांत कर्नाटक, उत्तराखंड याठिकाणचे मुख्यमंत्री बदलले. तर आसाममध्ये निवडणुकीनंतर नेतृत्वात बदल केला होता.

भाजपचे धक्कातंत्र कायम

गुजरातचे भावी मुख्यमंत्री म्हणून मनसुख मांडवीय, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांसह काही जणांची नावे शर्यतीत होती. भूपेंद्र पटेल यांचे नाव अजिबात चर्चेत नव्हते. अशाच नावाची निवड करून भाजपचे आपले धक्कातंत्र कायम ठेवले आहे. कर्नाटक व उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री अनुक्रमे बी. एस. ये़डीयुरप्पा, तीरथसिंह रावत यांचेही अचानक राजीनामे घेतले होते. 

टॅग्स :Bhupendra Patelभूपेंद्र पटेलNarendra Modiनरेंद्र मोदीVijay Rupaniविजय रूपाणीBJPभाजपाGujaratगुजरात