शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

तब्बल 13 वर्षानंतर पाकिस्तानवरुन परतला गुजरातचा मेंढपाळ, 2008 मध्ये चुकून केली होती बॉर्डर पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 11:47 IST

India And Pakistan : पाकिस्तानच्या कारागृहात अनेक वर्ष काढल्यानंतर हा मेंढपाळ भारतात परतला आहे.

नवी दिल्ली - गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील एक मेंढपाळ 2008 मध्ये चुकून पाकिस्तानच्या सीमेमध्ये गेला होता. गुप्तहेर असल्याचा आरोप करत त्याला अटक करण्यात आली असून पाकिस्तानच्या जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. मात्र आता पाकिस्तानच्या कारागृहात अनेक वर्ष काढल्यानंतर हा मेंढपाळ भारतात परतला आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या सीमेपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कच्छ जिल्ह्यातील नाना दिनारा गावातील 60 वर्षीय इस्माईल समा राहतात. आपल्या मेंढ्या चारत असताना चुकून त्यांनी पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. 

भारतीय उच्चायुक्तानी दाखल केलेल्या एका याचिकेवर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दोन दिवस आधीच इस्माईल समा यांची मुक्तता करण्यात आली आहे. अटारीमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी वाघा-अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवरुन इस्माईल समा हे अमृतसरला पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे काही कुटुंबीयही त्यांना घेण्यासाठी वाघा-अटारी बॉर्डरवर दाखल झाले होते. अमृतसरमध्ये काही औपचारिक गोष्टी पूर्ण केल्या जातील. ज्यामध्ये समा यांच्या आरोग्य तपासणीचा समावेश आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केलं जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

"मी आपल्या मेंढ्यांना चारत असताना चुकून पाकिस्तानच्या दिशेनं गेलो होतो. त्यांनी मला एक गुप्तहेर आणि RAW एजंट म्हणून अटक केली. आयएसआयने मला 6 महिने कारागृहात ठेवलं. त्यानंतर मला पाकिस्तानच्या सैन्याकडे सोपवण्यात आलं. 5 वर्षे शिक्षा सुनावली जाण्यापूर्वी मी 3 वर्षे त्यांच्या ताब्यात होतो. ऑक्टोबर 2016 मध्ये शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही माझी सुटका करण्यात आली नाही. मी 2018 पर्यंत हैदराबाद सेंट्रल जेलमध्ये होतो. त्यानंतर मला दोन अन्य भारतीय कैद्यांसोबत कराचीच्या कारागृहात पाठवण्यात आलं" अशी माहिती इम्साईल समा यांनी दिली आहे.

पत्रकार जतिन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, समा यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तान-इंडिया पीपल्स फॉर पीस अँड डेमोक्रसी आणि अन्य एका स्थानिक एनजीओने दोन्ही सरकारकडे संपर्क सुरू केला. त्याचबरोबर पाकिस्तान उच्चायुक्तांना एक पत्र लिहिलं आणि समा यांच्या सुटकेची मागणी केली. समा यांची सुटका ही भारतीय उच्चायुक्तांनी चार भारतीय कैद्यांच्या सुटकेसाठी याचिका दाखल केल्यानंतर होऊ शकली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातIndiaभारतPakistanपाकिस्तान