शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

गोध्रा प्रकरणात कायदा-सुव्यवस्था राखण्यात तत्कालीन गुजरात सरकार अपयशी, न्यायालयानं ओढले ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 14:07 IST

2002मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांड प्रकरणात कायदा-सुव्यवस्था राखण्यात तत्कालीन गुजरात सरकार अपयशी ठरल्याचे गुजरात उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत.

अहमदाबाद - 2002मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांड प्रकरणात कायदा-सुव्यवस्था राखण्यात तत्कालीन गुजरात सरकार अपयशी ठरल्याचे गुजरात उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. तर दुसरीकडे गुजरात उच्च न्यायालयानं 11 दोषींची फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर केलं आहे.तत्कालीन गुजरात सरकार कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा ठपकाही न्यायालयानं ठेवला आहे. 27 फेब्रुवारी 2002मधील गोध्रा कांडाचा आज निर्णय आला आहे. त्यावेळी साबरमती ट्रेनमध्ये आग लावण्यात आली होती. या दुर्घटनेत 59 लोकांचा मृत्यू झाला होता. या ट्रेनच्या डब्यातून अयोध्याहून परतणारे प्रवासी बहुतांश कारसेवक होते. या प्रकरणात एसआयटीच्या विशेष न्यायालयानं 31 आरोपींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. तर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती.एसआयटीनं या प्रकरणात 63 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. एसआयटीच्या निर्णयाला न्यायालयानं आरोपींच्या वकिलांनी आव्हान दिलं होतं. तसेच गुजरात सरकारनं 63 आरोपींची निर्दोष सुटका करण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना आज न्यायालयानं त्या 11 दोषींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर केलं आहे. गुजरात दंगलीवरून अनेकदा भाजपाला लक्ष्य करण्यात आलं आहे. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर गोध्रा प्रकरणावरून अनेकदा टीका करण्यात येते.विशेष म्हणजे तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही मोदींना राजधर्माचं पालन करण्याचा सल्ला दिला होता. काँग्रेस आणि विरोधी पक्ष गुजरात दंगलीवरून नेहमीच नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न करत असतात. गुजरात उच्च न्यायालयानं गोध्रा हत्याकांडातील पीडितांना 10 लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. न्यायालयानं 6 आठवड्यांच्या आत भरपाई देण्याचे आदेश गुजरात सरकारला दिले आहेत. 

टॅग्स :Gujarat Riots 2002गुजरात दंगल 2002GujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदी