शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Gujarat Election: अरविंद केजरीवालांमुळे नरेंद्र मोदी इतिहास घडवू शकतात; 'झाडू' चालला तर भाजपाला फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 13:11 IST

मात्र सर्वकाही सुरळीत राहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा यावेळी हा विक्रम मोडू शकतो.

सूरत - नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या. यानिमित्ताने गुजरातच्या मागील निवडणुकींचा आढावा घेतला जात आहे. १९८५ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने असा इतिहास रचला होता, जो आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही. माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून काँग्रेसने १८२ जागांच्या विधानसभेत १४९ जागा जिंकल्या होत्या. इतर कोणताही पक्ष आतापर्यंत या आकडेवारीच्या जवळपासही पोहोचलेला नाही. त्याआधी म्हणजेच १९८० च्या निवडणुकीत काँग्रेसने स्वतः १४१ जागा जिंकल्या होत्या.

मात्र सर्वकाही सुरळीत राहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा यावेळी हा विक्रम मोडू शकतो. अरविंद केजरीवाल हे भाजपाच्या विजयात सर्वात मोठी भूमिका बजावू शकतात, जे यावेळी गुजरातमध्ये भाजपाचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या उत्तराखंड आणि गोवा विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरून असे दिसून येते की, या राज्यांमध्ये भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या मतांच्या जवळपास समान टक्केवारीच्या फरकाने विजय मिळवला. निवडणुकीच्या गणितानुसार आम आदमी पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात नसता तर ही मते काँग्रेसकडे गेली असती आणि या राज्यांमध्ये ते सरकार स्थापन करू शकले असते.

गुजरातमध्ये सध्या काय परिस्थिती?गुजरात विधानसभा निवडणुकीतही उत्तराखंड, गोव्यासारखी परिस्थिती दिसून येत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आम आदमी पक्ष जर येथे मजबूत झाला आणि काँग्रेसची पाच ते सात टक्के मतेही कमी करण्यात यशस्वी झाला, तर या मतविभागणीचा थेट फायदा भाजपाला होईल आणि ते मोठा विजय मिळवू शकतील. पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेमुळे येथे भाजपा आधीच मजबूत स्थितीत आहे. त्यांचे सरकार स्थापनेचीही जवळपास निश्चित मानलं जात आहे, मात्र यावेळी त्यांच्या विजयाचे अंतर कितपत असू शकते, अशी चर्चा आहे.

या जागांवर लक्ष केंद्रित२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १० हजार पेक्षा कमी मतांच्या फरकाने १२ हून अधिक जागा जिंकल्या होत्या. ८३ जागांवर भाजपाच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले, तर ३० हून अधिक जागांवर भाजपा उमेदवारांच्या पराभवाचे अंतर केवळ २ हजार ते १० हजार मतांचे होते. त्यापैकी सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये सर्वाधिक जागा आहेत. या जागांवर बिगरभाजपा मतदारांमध्ये मतविभागणी झाल्यास त्याचा भाजपला फायदा होईल आणि त्यांचा विजयाचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे त्यांच्या जागांची संख्या वाढणार असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. 

गोव्यात असं बदललं समीकरणया वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. या निवडणुकीत भाजपला ३३.३% मते मिळाली. काँग्रेसला २३.५% मते मिळाली. काँग्रेसला भाजपपेक्षा ९.८ टक्के कमी मते मिळाली. त्याच निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला ६.८ टक्के आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (AITC) ५.२ टक्के मते मिळाली. या निवडणुकीत आम आदमी पक्ष किंवा तृणमूल काँग्रेस नसती, तर बिगरभाजपा पक्ष म्हणून या मतदारांचा प्राधान्यक्रम काँग्रेसलाच राहिला असता आणि गोवा सहज जिंकता आला असता, असं बोललं जातं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवालGujaratगुजरातBJPभाजपा