शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

"मोदी आले, नोटबंदी केली अन् तुमच्या खिशातून पैसा काढला, अब्जोपतींना फायदा झाला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 13:55 IST

Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी हे गुजरातच्या दाहोदमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी आदिवासी सत्याग्रह रॅलीला संबोधित केलं, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - गुजरातमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी काँग्रेस पक्षाने गुजरातमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) हे गुजरातच्या दाहोदमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी आदिवासी सत्याग्रह रॅलीला संबोधित केलं, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत मनरेगाची खिल्ली उडवली. तसेच मी हे रद्द करू इच्छितो पण नाही करणार कारण काँग्रेसने काय केलंय हे देशाला लक्षात राहिलं पाहिजे असं म्हटलं. याला राहुल यांनी उत्तर दिलं. 

आज जर कोरोनाच्या काळात मनरेगा नसती तर देशाची परिस्थिती काय झाली असती? असा सवाल राहुल यांनी विचारला आहे. तसेच कोरोनामुळे गुजरातमध्ये तीन लाख लोकांचा मृत्यू झाला. गंगा नदी मृतदेहाने भरून गेली. तर देशात ५०-६० लाख लोकांना जीव गमवावा लागला, पण हे लोक या गोष्टींवर अजिबात बोलत नाहीत. फक्त थाली बजाओ, लाईट जलाओ असं म्हणत आहेत. नोटबंदी आणि जीएसटीवरून देखील राहुल गांधी यांनी आता पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे. 

"पंतप्रधान आले, नोटबंदी केली आणि तुमच्या खिशातून पैसा काढला. काळ्या पैशाविरोधात लढाई आहे असं सांगितलं, पूर्ण देशाला बँकेच्या लाईनमध्ये उभं केलं. पण काळ्या पैशाविरोधात काहीच नाही झालं. अब्जोपतींना फायदा झाला असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला. ही जनसभा नाही हे आंदोलन आहे असंही म्हटलं आहे. मोदींनी देशाची दोन देशात वाटणी केली. पण काँग्रेस हे होऊ देणार नाही असं देखील राहुल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"आजच्या एका सिलिंडरची किंमत..."; दरवाढीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भल्यासाठी काम करतो असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतींची तुलना केली आहे. "काँग्रेसच्या काळात २०१४ पर्यंत एलपीजी सिलिंडरची किंमत ८२७ रुपये अनुदानासह ४१० रुपये होती, तर २०२२ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ती ९९९ रुपयांपेक्षा जास्त आहे आणि सबसिडी देखील शून्य आहे" असं म्हटलं आहे. "आजच्या एका सिलिंडरची किंमत काँग्रेसच्या काळातील दोन सिलिंडरच्या किमतीएवढी आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबांच्या भल्यासाठी फक्त काँग्रेसच काम करते. हा आपल्या आर्थिक धोरणाचा गाभा आहे" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण