शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

"मोदी आले, नोटबंदी केली अन् तुमच्या खिशातून पैसा काढला, अब्जोपतींना फायदा झाला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 13:55 IST

Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी हे गुजरातच्या दाहोदमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी आदिवासी सत्याग्रह रॅलीला संबोधित केलं, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - गुजरातमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी काँग्रेस पक्षाने गुजरातमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) हे गुजरातच्या दाहोदमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी आदिवासी सत्याग्रह रॅलीला संबोधित केलं, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत मनरेगाची खिल्ली उडवली. तसेच मी हे रद्द करू इच्छितो पण नाही करणार कारण काँग्रेसने काय केलंय हे देशाला लक्षात राहिलं पाहिजे असं म्हटलं. याला राहुल यांनी उत्तर दिलं. 

आज जर कोरोनाच्या काळात मनरेगा नसती तर देशाची परिस्थिती काय झाली असती? असा सवाल राहुल यांनी विचारला आहे. तसेच कोरोनामुळे गुजरातमध्ये तीन लाख लोकांचा मृत्यू झाला. गंगा नदी मृतदेहाने भरून गेली. तर देशात ५०-६० लाख लोकांना जीव गमवावा लागला, पण हे लोक या गोष्टींवर अजिबात बोलत नाहीत. फक्त थाली बजाओ, लाईट जलाओ असं म्हणत आहेत. नोटबंदी आणि जीएसटीवरून देखील राहुल गांधी यांनी आता पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे. 

"पंतप्रधान आले, नोटबंदी केली आणि तुमच्या खिशातून पैसा काढला. काळ्या पैशाविरोधात लढाई आहे असं सांगितलं, पूर्ण देशाला बँकेच्या लाईनमध्ये उभं केलं. पण काळ्या पैशाविरोधात काहीच नाही झालं. अब्जोपतींना फायदा झाला असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला. ही जनसभा नाही हे आंदोलन आहे असंही म्हटलं आहे. मोदींनी देशाची दोन देशात वाटणी केली. पण काँग्रेस हे होऊ देणार नाही असं देखील राहुल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"आजच्या एका सिलिंडरची किंमत..."; दरवाढीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भल्यासाठी काम करतो असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतींची तुलना केली आहे. "काँग्रेसच्या काळात २०१४ पर्यंत एलपीजी सिलिंडरची किंमत ८२७ रुपये अनुदानासह ४१० रुपये होती, तर २०२२ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ती ९९९ रुपयांपेक्षा जास्त आहे आणि सबसिडी देखील शून्य आहे" असं म्हटलं आहे. "आजच्या एका सिलिंडरची किंमत काँग्रेसच्या काळातील दोन सिलिंडरच्या किमतीएवढी आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबांच्या भल्यासाठी फक्त काँग्रेसच काम करते. हा आपल्या आर्थिक धोरणाचा गाभा आहे" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण