शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

"मोदी आले, नोटबंदी केली अन् तुमच्या खिशातून पैसा काढला, अब्जोपतींना फायदा झाला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 13:55 IST

Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी हे गुजरातच्या दाहोदमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी आदिवासी सत्याग्रह रॅलीला संबोधित केलं, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - गुजरातमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी काँग्रेस पक्षाने गुजरातमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) हे गुजरातच्या दाहोदमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी आदिवासी सत्याग्रह रॅलीला संबोधित केलं, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत मनरेगाची खिल्ली उडवली. तसेच मी हे रद्द करू इच्छितो पण नाही करणार कारण काँग्रेसने काय केलंय हे देशाला लक्षात राहिलं पाहिजे असं म्हटलं. याला राहुल यांनी उत्तर दिलं. 

आज जर कोरोनाच्या काळात मनरेगा नसती तर देशाची परिस्थिती काय झाली असती? असा सवाल राहुल यांनी विचारला आहे. तसेच कोरोनामुळे गुजरातमध्ये तीन लाख लोकांचा मृत्यू झाला. गंगा नदी मृतदेहाने भरून गेली. तर देशात ५०-६० लाख लोकांना जीव गमवावा लागला, पण हे लोक या गोष्टींवर अजिबात बोलत नाहीत. फक्त थाली बजाओ, लाईट जलाओ असं म्हणत आहेत. नोटबंदी आणि जीएसटीवरून देखील राहुल गांधी यांनी आता पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे. 

"पंतप्रधान आले, नोटबंदी केली आणि तुमच्या खिशातून पैसा काढला. काळ्या पैशाविरोधात लढाई आहे असं सांगितलं, पूर्ण देशाला बँकेच्या लाईनमध्ये उभं केलं. पण काळ्या पैशाविरोधात काहीच नाही झालं. अब्जोपतींना फायदा झाला असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला. ही जनसभा नाही हे आंदोलन आहे असंही म्हटलं आहे. मोदींनी देशाची दोन देशात वाटणी केली. पण काँग्रेस हे होऊ देणार नाही असं देखील राहुल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"आजच्या एका सिलिंडरची किंमत..."; दरवाढीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भल्यासाठी काम करतो असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतींची तुलना केली आहे. "काँग्रेसच्या काळात २०१४ पर्यंत एलपीजी सिलिंडरची किंमत ८२७ रुपये अनुदानासह ४१० रुपये होती, तर २०२२ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ती ९९९ रुपयांपेक्षा जास्त आहे आणि सबसिडी देखील शून्य आहे" असं म्हटलं आहे. "आजच्या एका सिलिंडरची किंमत काँग्रेसच्या काळातील दोन सिलिंडरच्या किमतीएवढी आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबांच्या भल्यासाठी फक्त काँग्रेसच काम करते. हा आपल्या आर्थिक धोरणाचा गाभा आहे" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण