शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

गीर अभयारण्यात सिंहगणना टळल्यामुळे ‘अंदाज अभ्यास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 02:22 IST

पर्यायी अभ्यासात सहभागी झाले ३०० बीट गार्ड : निष्कर्ष मात्र होणार नाही जाहीर; पाच वर्षांतून एकदा होते सिंहांची गणना

अहमदाबाद : जगप्रसिद्ध गीर वन्यजीव अभयारण्यात दर पाच वर्षांनी होणारी सिंहांची शिरगणती कोरोना साथीमुळे टळली असून, त्याऐवजी सिंहांच्या संख्येबाबतचा ‘अंदाज अभ्यास’ वन विभागाने केला आहे. यात थेट गणना न करता काही ठोकताळ्यांनुसार सिंहांची संख्या ठरविण्यात आली. एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याने सांगितले की, ५ व ६ जूनच्या मधल्या रात्री पौर्णिमेला अंदाज अभ्यास करण्यात आला. यात सिंहांच्या संख्येबाबत अंदाज बांधण्यात आला. हा आकडा जाहीर मात्र केला जाणार नाही.

यंदा मे महिन्यात पंचवार्षिक सिंह गणना होणार होती. त्यासाठी मोठी तयारीही करण्यात आली होती. तथापि, त्याआधीच कोरोना विषाणूची साथ पसरल्यामुळे ही गणना प्रक्रिया रद्द करण्यात आली. याआधीची सिंह गणना २०१५ मध्ये झाली होती. गीरमध्ये ५२३ सिंह त्यावेळी आढळले होते. गीर हे आशियाई सिंहांचे एकमेव आश्रयस्थान राहिले आहे.गुजरातचे प्रधान वन संरक्षक श्यामल टीकादार यांनी सांगितले की, सिंहांबाबतचा अंदाज अभ्यास हा औपचारिक अथवा अनौपचारिक गणना नाही. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना आपापल्या क्षेत्रात सिंहांवर नजर ठेवून त्यांच्या संख्येचा अंदाज बांधायला सांगितले. हे एक नेहमीचेच काम आहे. प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री आम्ही ही प्रक्रिया राबवीत असतो.या अभ्यासातील निष्कर्ष सामायिक करण्यास टीकादार यांनी नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासात ३०० बीट गार्ड सहभागी झाले. गीर अभयारण्याच्या परिसरातील गावांच्या सरपंचांनाही यात सहभागी करून घेण्यात आले होते. जुनागड वनवृत्ताचे मुख्य वन संरक्षक डी.टी. वासवदा यांनी सांगितले की, अंदाज अभ्यास शनिवारी पूर्ण करण्यात आला. यातून समोर आलेली आकडेवारी जाहीर करायची की नाही, ही धोरणात्मक बाब असून, याचा निर्णय राज्य सरकारच घेऊ शकते. लॉकडाऊनमुळे यंदा परिपूर्ण सिंह गणना करणे शक्य झाले नाही. वासवदा यांनी सांगितले की, दर पाच वर्षांनी होणारी सिंह गणना एक व्यापक प्रक्रिया असते. राष्ट्रीय वन्यजीवन महामंडळाचे सदस्य त्यात सहभागी असतात. केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, जंगलप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थाही यात सहभागी होत असतात. लॉनडाऊन असल्यामुळे या सर्वांना आम्ही बोलावू शकलो नाही.गणनेसाठी उन्हाळा आदर्शच्एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, सिंहांच्या गणनेसाठी उन्हाळा हा आदर्श काळ असतो. त्यानंतर येणारा पावसाळा हा सिंहांचा फलन काळ असतो. पावसाळ्याचे संपूर्ण चार महिने अभयारण्य बंद असते. हिवाळाही गणनेसाठी योग्य नसतो.च्आता टळलेली सिंह गणना कधी केली जाईल, या प्रश्नावर वासवदा यांनी सांगितले की, आता यंदा गणनाच केली जाणार नाही. ती पुढे ढकलण्यात आली आहे. पुढची तारीख आता सरकारच ठरवू शकते. वन्यजीव प्रेमी आणि कार्यकर्ते सिंह गणनेची वाट पाहत होते.आजारांचे संकटच्एका अधिकाºयाने सांगितले की, दोन वर्षांपासून गीरच्या सिंहांवर विविध आजारांची संकटे येताना दिसून येत आहेत. मागील तीन महिन्यांपासून गीर अभयारण्यात बेबेसियॉसिस या आजाराने सुमारे दोन डझन सिंह मरण पावले आहेत.च्बेबेसिया नावाच्या एका परजीवीमुळे हा आजार होतो. त्याची लक्षणे मलेरियासारखी असतात. तत्पूर्वी, आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१८ मध्येही कॅनाईन डिस्टेंपर विषाणूमुळे गीरमध्ये सुमारे ४० सिंह मरण पावले होते.जुनागढच्या नबाबाने घातली होती शिकारीवर बंदीच्गुजरातने गीरच्या जंगलात सिंहांच्या संरक्षणात मोठे यश मिळविले आहे. हा परिसर स्वातंत्र्यपूर्व काळात जुनागढ संस्थानच्या अखत्यारीत होता. जुनागढचा नवाब महाबत खान याने सिंहांच्या शिकारीवर प्रतिबंध घातला होता.च्गीर अभयारण्यातील सिंह अनेक वेळा शेजारील जिल्ह्यांतील शेतात येतात. अभयारण्य परिसरात असलेल्या शहरांत आणि मानवी वस्त्यांतही सिंह घुसण्याच्या घटना घडतात.

टॅग्स :ahmedabadअहमदाबादGujaratगुजरात