शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गीर अभयारण्यात सिंहगणना टळल्यामुळे ‘अंदाज अभ्यास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 02:22 IST

पर्यायी अभ्यासात सहभागी झाले ३०० बीट गार्ड : निष्कर्ष मात्र होणार नाही जाहीर; पाच वर्षांतून एकदा होते सिंहांची गणना

अहमदाबाद : जगप्रसिद्ध गीर वन्यजीव अभयारण्यात दर पाच वर्षांनी होणारी सिंहांची शिरगणती कोरोना साथीमुळे टळली असून, त्याऐवजी सिंहांच्या संख्येबाबतचा ‘अंदाज अभ्यास’ वन विभागाने केला आहे. यात थेट गणना न करता काही ठोकताळ्यांनुसार सिंहांची संख्या ठरविण्यात आली. एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याने सांगितले की, ५ व ६ जूनच्या मधल्या रात्री पौर्णिमेला अंदाज अभ्यास करण्यात आला. यात सिंहांच्या संख्येबाबत अंदाज बांधण्यात आला. हा आकडा जाहीर मात्र केला जाणार नाही.

यंदा मे महिन्यात पंचवार्षिक सिंह गणना होणार होती. त्यासाठी मोठी तयारीही करण्यात आली होती. तथापि, त्याआधीच कोरोना विषाणूची साथ पसरल्यामुळे ही गणना प्रक्रिया रद्द करण्यात आली. याआधीची सिंह गणना २०१५ मध्ये झाली होती. गीरमध्ये ५२३ सिंह त्यावेळी आढळले होते. गीर हे आशियाई सिंहांचे एकमेव आश्रयस्थान राहिले आहे.गुजरातचे प्रधान वन संरक्षक श्यामल टीकादार यांनी सांगितले की, सिंहांबाबतचा अंदाज अभ्यास हा औपचारिक अथवा अनौपचारिक गणना नाही. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना आपापल्या क्षेत्रात सिंहांवर नजर ठेवून त्यांच्या संख्येचा अंदाज बांधायला सांगितले. हे एक नेहमीचेच काम आहे. प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री आम्ही ही प्रक्रिया राबवीत असतो.या अभ्यासातील निष्कर्ष सामायिक करण्यास टीकादार यांनी नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासात ३०० बीट गार्ड सहभागी झाले. गीर अभयारण्याच्या परिसरातील गावांच्या सरपंचांनाही यात सहभागी करून घेण्यात आले होते. जुनागड वनवृत्ताचे मुख्य वन संरक्षक डी.टी. वासवदा यांनी सांगितले की, अंदाज अभ्यास शनिवारी पूर्ण करण्यात आला. यातून समोर आलेली आकडेवारी जाहीर करायची की नाही, ही धोरणात्मक बाब असून, याचा निर्णय राज्य सरकारच घेऊ शकते. लॉकडाऊनमुळे यंदा परिपूर्ण सिंह गणना करणे शक्य झाले नाही. वासवदा यांनी सांगितले की, दर पाच वर्षांनी होणारी सिंह गणना एक व्यापक प्रक्रिया असते. राष्ट्रीय वन्यजीवन महामंडळाचे सदस्य त्यात सहभागी असतात. केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, जंगलप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थाही यात सहभागी होत असतात. लॉनडाऊन असल्यामुळे या सर्वांना आम्ही बोलावू शकलो नाही.गणनेसाठी उन्हाळा आदर्शच्एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, सिंहांच्या गणनेसाठी उन्हाळा हा आदर्श काळ असतो. त्यानंतर येणारा पावसाळा हा सिंहांचा फलन काळ असतो. पावसाळ्याचे संपूर्ण चार महिने अभयारण्य बंद असते. हिवाळाही गणनेसाठी योग्य नसतो.च्आता टळलेली सिंह गणना कधी केली जाईल, या प्रश्नावर वासवदा यांनी सांगितले की, आता यंदा गणनाच केली जाणार नाही. ती पुढे ढकलण्यात आली आहे. पुढची तारीख आता सरकारच ठरवू शकते. वन्यजीव प्रेमी आणि कार्यकर्ते सिंह गणनेची वाट पाहत होते.आजारांचे संकटच्एका अधिकाºयाने सांगितले की, दोन वर्षांपासून गीरच्या सिंहांवर विविध आजारांची संकटे येताना दिसून येत आहेत. मागील तीन महिन्यांपासून गीर अभयारण्यात बेबेसियॉसिस या आजाराने सुमारे दोन डझन सिंह मरण पावले आहेत.च्बेबेसिया नावाच्या एका परजीवीमुळे हा आजार होतो. त्याची लक्षणे मलेरियासारखी असतात. तत्पूर्वी, आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१८ मध्येही कॅनाईन डिस्टेंपर विषाणूमुळे गीरमध्ये सुमारे ४० सिंह मरण पावले होते.जुनागढच्या नबाबाने घातली होती शिकारीवर बंदीच्गुजरातने गीरच्या जंगलात सिंहांच्या संरक्षणात मोठे यश मिळविले आहे. हा परिसर स्वातंत्र्यपूर्व काळात जुनागढ संस्थानच्या अखत्यारीत होता. जुनागढचा नवाब महाबत खान याने सिंहांच्या शिकारीवर प्रतिबंध घातला होता.च्गीर अभयारण्यातील सिंह अनेक वेळा शेजारील जिल्ह्यांतील शेतात येतात. अभयारण्य परिसरात असलेल्या शहरांत आणि मानवी वस्त्यांतही सिंह घुसण्याच्या घटना घडतात.

टॅग्स :ahmedabadअहमदाबादGujaratगुजरात