शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गीर अभयारण्यात सिंहगणना टळल्यामुळे ‘अंदाज अभ्यास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 02:22 IST

पर्यायी अभ्यासात सहभागी झाले ३०० बीट गार्ड : निष्कर्ष मात्र होणार नाही जाहीर; पाच वर्षांतून एकदा होते सिंहांची गणना

अहमदाबाद : जगप्रसिद्ध गीर वन्यजीव अभयारण्यात दर पाच वर्षांनी होणारी सिंहांची शिरगणती कोरोना साथीमुळे टळली असून, त्याऐवजी सिंहांच्या संख्येबाबतचा ‘अंदाज अभ्यास’ वन विभागाने केला आहे. यात थेट गणना न करता काही ठोकताळ्यांनुसार सिंहांची संख्या ठरविण्यात आली. एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याने सांगितले की, ५ व ६ जूनच्या मधल्या रात्री पौर्णिमेला अंदाज अभ्यास करण्यात आला. यात सिंहांच्या संख्येबाबत अंदाज बांधण्यात आला. हा आकडा जाहीर मात्र केला जाणार नाही.

यंदा मे महिन्यात पंचवार्षिक सिंह गणना होणार होती. त्यासाठी मोठी तयारीही करण्यात आली होती. तथापि, त्याआधीच कोरोना विषाणूची साथ पसरल्यामुळे ही गणना प्रक्रिया रद्द करण्यात आली. याआधीची सिंह गणना २०१५ मध्ये झाली होती. गीरमध्ये ५२३ सिंह त्यावेळी आढळले होते. गीर हे आशियाई सिंहांचे एकमेव आश्रयस्थान राहिले आहे.गुजरातचे प्रधान वन संरक्षक श्यामल टीकादार यांनी सांगितले की, सिंहांबाबतचा अंदाज अभ्यास हा औपचारिक अथवा अनौपचारिक गणना नाही. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना आपापल्या क्षेत्रात सिंहांवर नजर ठेवून त्यांच्या संख्येचा अंदाज बांधायला सांगितले. हे एक नेहमीचेच काम आहे. प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री आम्ही ही प्रक्रिया राबवीत असतो.या अभ्यासातील निष्कर्ष सामायिक करण्यास टीकादार यांनी नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासात ३०० बीट गार्ड सहभागी झाले. गीर अभयारण्याच्या परिसरातील गावांच्या सरपंचांनाही यात सहभागी करून घेण्यात आले होते. जुनागड वनवृत्ताचे मुख्य वन संरक्षक डी.टी. वासवदा यांनी सांगितले की, अंदाज अभ्यास शनिवारी पूर्ण करण्यात आला. यातून समोर आलेली आकडेवारी जाहीर करायची की नाही, ही धोरणात्मक बाब असून, याचा निर्णय राज्य सरकारच घेऊ शकते. लॉकडाऊनमुळे यंदा परिपूर्ण सिंह गणना करणे शक्य झाले नाही. वासवदा यांनी सांगितले की, दर पाच वर्षांनी होणारी सिंह गणना एक व्यापक प्रक्रिया असते. राष्ट्रीय वन्यजीवन महामंडळाचे सदस्य त्यात सहभागी असतात. केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, जंगलप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थाही यात सहभागी होत असतात. लॉनडाऊन असल्यामुळे या सर्वांना आम्ही बोलावू शकलो नाही.गणनेसाठी उन्हाळा आदर्शच्एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, सिंहांच्या गणनेसाठी उन्हाळा हा आदर्श काळ असतो. त्यानंतर येणारा पावसाळा हा सिंहांचा फलन काळ असतो. पावसाळ्याचे संपूर्ण चार महिने अभयारण्य बंद असते. हिवाळाही गणनेसाठी योग्य नसतो.च्आता टळलेली सिंह गणना कधी केली जाईल, या प्रश्नावर वासवदा यांनी सांगितले की, आता यंदा गणनाच केली जाणार नाही. ती पुढे ढकलण्यात आली आहे. पुढची तारीख आता सरकारच ठरवू शकते. वन्यजीव प्रेमी आणि कार्यकर्ते सिंह गणनेची वाट पाहत होते.आजारांचे संकटच्एका अधिकाºयाने सांगितले की, दोन वर्षांपासून गीरच्या सिंहांवर विविध आजारांची संकटे येताना दिसून येत आहेत. मागील तीन महिन्यांपासून गीर अभयारण्यात बेबेसियॉसिस या आजाराने सुमारे दोन डझन सिंह मरण पावले आहेत.च्बेबेसिया नावाच्या एका परजीवीमुळे हा आजार होतो. त्याची लक्षणे मलेरियासारखी असतात. तत्पूर्वी, आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१८ मध्येही कॅनाईन डिस्टेंपर विषाणूमुळे गीरमध्ये सुमारे ४० सिंह मरण पावले होते.जुनागढच्या नबाबाने घातली होती शिकारीवर बंदीच्गुजरातने गीरच्या जंगलात सिंहांच्या संरक्षणात मोठे यश मिळविले आहे. हा परिसर स्वातंत्र्यपूर्व काळात जुनागढ संस्थानच्या अखत्यारीत होता. जुनागढचा नवाब महाबत खान याने सिंहांच्या शिकारीवर प्रतिबंध घातला होता.च्गीर अभयारण्यातील सिंह अनेक वेळा शेजारील जिल्ह्यांतील शेतात येतात. अभयारण्य परिसरात असलेल्या शहरांत आणि मानवी वस्त्यांतही सिंह घुसण्याच्या घटना घडतात.

टॅग्स :ahmedabadअहमदाबादGujaratगुजरात