नुकसानग्रस्तांशी साधला पालकमंत्र्यांनी संवाद

By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:09+5:302015-08-14T22:54:09+5:30

नुकसानग्रस्तांशी साधला संवाद

Guardian minister talks to the victims of the damages | नुकसानग्रस्तांशी साधला पालकमंत्र्यांनी संवाद

नुकसानग्रस्तांशी साधला पालकमंत्र्यांनी संवाद

कसानग्रस्तांशी साधला संवाद
पालकमंत्र्यांनी दिले सर्वेक्षणाचे निर्देश : नुकसानीची केली पाहणी
कामठी : गुरुवारच्या मुसळधार पावसाने अतोनात नुकसान झाले. कामठी शहरासह तालुक्याचे नुकसान झाले. याबाबत महसूल आणि नगर परिषदेने सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. कामठी तहसील कार्यालयात नुकसानग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर प्रशासनाला निर्देश दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत बोरकर, तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी विद्यासागर चव्हाण, नगराध्यक्ष रिजवाना कुरेशी, उपाध्यक्ष रणजित सफेलकर, अरविंद खळतकर, भाजप पदाधिकारी रमेश चिकटे, मनीष वाजपेयी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. कामठीच्या कामगारनगर, रमानगर, वारीसपुरा, चंद्रमणी नगर, ईस्माईलपुरा, सैलाबनगर, आनंदनगर, रामगड, बुद्धनगर आदी भागात गुरुवारी पावसामुळे नुकसान झाले. तेथील नुकसानग्रस्तांशी बावनकुळे यांनी संवाद साधला. या नुकसानग्रस्तांना मदतनिधी देण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करावे आणि कुणीही त्यातून सुटू नये याची काळजी घ्यावी, असे यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Guardian minister talks to the victims of the damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.