शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

विकास वेडावलाच, विश्वासार्हताही घसरली! भाजपाच्या घसरगुंडीची कारणे

By किरण अग्रवाल | Updated: December 19, 2017 01:17 IST

गुजरातमध्ये शीर्षस्थ नेत्यांच्या अपेक्षेनुसार जागांचा आकडा भाजपाला गाठता आला नाही. यावरून गुजरातमध्ये विकास ‘वेडा’ झाल्याचे काही अंशी तरी खरे ठरलेच; शिवाय या वेळी भाजपाची विश्वासार्हता घसरल्यावर शिक्कामोर्तब झाले.

गुजरातमध्ये शीर्षस्थ नेत्यांच्या अपेक्षेनुसार जागांचा आकडा भाजपाला गाठता आला नाही. यावरून गुजरातमध्ये विकास ‘वेडा’ झाल्याचे काही अंशी तरी खरे ठरलेच; शिवाय या वेळी भाजपाची विश्वासार्हता घसरल्यावर शिक्कामोर्तब झाले.पंतप्रधानपदाची वाटचाल करताना ‘गुजरात नो बेटो, देश नो नेतो’ अशी ज्यांची प्रतिमा तयार करण्यात आली, त्या मोदी व देशातील क्रमांक एकचा पक्ष असलेल्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या गृहराज्यात खरे तर त्यांच्या पक्षाला गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा मिळणे अपेक्षित होते. सहज खिशात घालता येणारी ही निवडणूक ठरायला हवी होती. विकासपुरुष म्हणून दर्शविल्या गेलेल्या, ज्या ‘प्रतिमे’वर गेल्या लोकसभा निवडणुकीचे मैदान या पक्षाने अगदी एकहाती जिंकले, त्याच प्रतिमेवर यंदा ही वाढ अपेक्षित होती. खुद्द मोदी यांनीच तशी १५० जागांची अपेक्षा बोलून दाखविली होती. परंतु हा पक्ष गेल्या वेळच्या ११५ जागांपेक्षाही मागे राहिला.नोटाबंदी, जीएसटीचा व्यापारीवर्गाला बसलेला फटका, पटेल व शेतकरी आंदोलनाची झळ, धार्मिक ध्रुवीकरण टाळण्यासाठी काँग्रेसनेही अनुसरलेला मंदिरमार्ग व या सर्वांच्या जोडीला सोशल इंजिनीअरिंग घडवून आणण्यात काँग्रेसला आलेले यश यामुळे देशाचे नेतृत्व करणाºया नेत्यांना यंदा घरच्या अंगणात उठाबशा काढाव्या लागल्या. तीन-चार दशकांपासून राजकारण करणाºया मोदी-शहा यांना राहुल गांधींसह हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर व जिग्नेश मेवाणी यांच्यासारख्या तरुणांनी जेरीस आणले. सत्तेपर्यंत पोहोचता आले नसले तरी, भाजपाची दमछाक करण्यात काँग्रेसला यश आले.टीका करून भाजपाने विरोधकांचे महत्त्व वाढवले-तीन वर्षांत दोन मुख्यमंत्री बदलूनही विकासाचा मुद्दा चालविण्याऐवजी काँग्रेस व विशेषत: राहुल गांधी विरोधावर प्रचारात भर दिल्याने विरोधकांचेच महत्त्व अधोरेखित झाले.अतिआत्मविश्वास राखणाºया भाजपाला गोध्रा, वाघोडिया, जंबुसर, अकोटा, शहरवाडी, कलोल आदी अनेक ठिकाणची बंडखोरी टाळण्यात आलेले अपयश मतविभागणीला निमंत्रण देणारे ठरले.विकासासोबतच राज्यातील सर्व जाती, समूहांमध्ये व विशेषत: व्यापारी, शेतकरी आदी वर्ग विशेषांमध्ये सत्ताधाºयांना आपल्या प्रतिची विश्वासार्हता निर्माण करता येणे अपेक्षित असते. संपूर्ण राज्यातील व खासकरून सौराष्ट्रातील निकाल पाहता ती विश्वासार्हता कमी झाल्याचे स्पष्ट झाले.राहुल गांधी यांचे सोशल इंजिनीअरिंग-पक्षाचे तरुण नेते राहुल गांधी यंदा स्वत: मोठ्या आत्मविश्वासाने प्रचारात सहभागी होते. शिवाय टिष्ट्वटरवरील प्रश्नमालिकेने त्यांचा ‘होमवर्क’ही पक्का असल्याचे दिसून आले.भाजपाच्या सततच्या सत्तेमुळे राज्यातील ग्रामपातळीपर्यंतचे कॉँग्रेसचे केडर नामशेष झाल्यासारखी स्थिती असली तरी पाटीदार, ओबीसी, दलित, आदिवासी असे सर्व समाज घटकांचे ‘सोशल इंजिनीअरिंग’ घडविण्यात यश आले.विकासाचे नाव घेताना धार्मिक ध्रुवीकरणात काँग्रेसला नेहमी खलनायक दर्शविण्याची भाजपाची आजवरची खेळी काँग्रेसने मंदिरमार्ग अनुसरून उलटविली.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी