शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

विकास वेडावलाच, विश्वासार्हताही घसरली! भाजपाच्या घसरगुंडीची कारणे

By किरण अग्रवाल | Updated: December 19, 2017 01:17 IST

गुजरातमध्ये शीर्षस्थ नेत्यांच्या अपेक्षेनुसार जागांचा आकडा भाजपाला गाठता आला नाही. यावरून गुजरातमध्ये विकास ‘वेडा’ झाल्याचे काही अंशी तरी खरे ठरलेच; शिवाय या वेळी भाजपाची विश्वासार्हता घसरल्यावर शिक्कामोर्तब झाले.

गुजरातमध्ये शीर्षस्थ नेत्यांच्या अपेक्षेनुसार जागांचा आकडा भाजपाला गाठता आला नाही. यावरून गुजरातमध्ये विकास ‘वेडा’ झाल्याचे काही अंशी तरी खरे ठरलेच; शिवाय या वेळी भाजपाची विश्वासार्हता घसरल्यावर शिक्कामोर्तब झाले.पंतप्रधानपदाची वाटचाल करताना ‘गुजरात नो बेटो, देश नो नेतो’ अशी ज्यांची प्रतिमा तयार करण्यात आली, त्या मोदी व देशातील क्रमांक एकचा पक्ष असलेल्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या गृहराज्यात खरे तर त्यांच्या पक्षाला गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा मिळणे अपेक्षित होते. सहज खिशात घालता येणारी ही निवडणूक ठरायला हवी होती. विकासपुरुष म्हणून दर्शविल्या गेलेल्या, ज्या ‘प्रतिमे’वर गेल्या लोकसभा निवडणुकीचे मैदान या पक्षाने अगदी एकहाती जिंकले, त्याच प्रतिमेवर यंदा ही वाढ अपेक्षित होती. खुद्द मोदी यांनीच तशी १५० जागांची अपेक्षा बोलून दाखविली होती. परंतु हा पक्ष गेल्या वेळच्या ११५ जागांपेक्षाही मागे राहिला.नोटाबंदी, जीएसटीचा व्यापारीवर्गाला बसलेला फटका, पटेल व शेतकरी आंदोलनाची झळ, धार्मिक ध्रुवीकरण टाळण्यासाठी काँग्रेसनेही अनुसरलेला मंदिरमार्ग व या सर्वांच्या जोडीला सोशल इंजिनीअरिंग घडवून आणण्यात काँग्रेसला आलेले यश यामुळे देशाचे नेतृत्व करणाºया नेत्यांना यंदा घरच्या अंगणात उठाबशा काढाव्या लागल्या. तीन-चार दशकांपासून राजकारण करणाºया मोदी-शहा यांना राहुल गांधींसह हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर व जिग्नेश मेवाणी यांच्यासारख्या तरुणांनी जेरीस आणले. सत्तेपर्यंत पोहोचता आले नसले तरी, भाजपाची दमछाक करण्यात काँग्रेसला यश आले.टीका करून भाजपाने विरोधकांचे महत्त्व वाढवले-तीन वर्षांत दोन मुख्यमंत्री बदलूनही विकासाचा मुद्दा चालविण्याऐवजी काँग्रेस व विशेषत: राहुल गांधी विरोधावर प्रचारात भर दिल्याने विरोधकांचेच महत्त्व अधोरेखित झाले.अतिआत्मविश्वास राखणाºया भाजपाला गोध्रा, वाघोडिया, जंबुसर, अकोटा, शहरवाडी, कलोल आदी अनेक ठिकाणची बंडखोरी टाळण्यात आलेले अपयश मतविभागणीला निमंत्रण देणारे ठरले.विकासासोबतच राज्यातील सर्व जाती, समूहांमध्ये व विशेषत: व्यापारी, शेतकरी आदी वर्ग विशेषांमध्ये सत्ताधाºयांना आपल्या प्रतिची विश्वासार्हता निर्माण करता येणे अपेक्षित असते. संपूर्ण राज्यातील व खासकरून सौराष्ट्रातील निकाल पाहता ती विश्वासार्हता कमी झाल्याचे स्पष्ट झाले.राहुल गांधी यांचे सोशल इंजिनीअरिंग-पक्षाचे तरुण नेते राहुल गांधी यंदा स्वत: मोठ्या आत्मविश्वासाने प्रचारात सहभागी होते. शिवाय टिष्ट्वटरवरील प्रश्नमालिकेने त्यांचा ‘होमवर्क’ही पक्का असल्याचे दिसून आले.भाजपाच्या सततच्या सत्तेमुळे राज्यातील ग्रामपातळीपर्यंतचे कॉँग्रेसचे केडर नामशेष झाल्यासारखी स्थिती असली तरी पाटीदार, ओबीसी, दलित, आदिवासी असे सर्व समाज घटकांचे ‘सोशल इंजिनीअरिंग’ घडविण्यात यश आले.विकासाचे नाव घेताना धार्मिक ध्रुवीकरणात काँग्रेसला नेहमी खलनायक दर्शविण्याची भाजपाची आजवरची खेळी काँग्रेसने मंदिरमार्ग अनुसरून उलटविली.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी