शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

विकास वेडावलाच, विश्वासार्हताही घसरली! भाजपाच्या घसरगुंडीची कारणे

By किरण अग्रवाल | Updated: December 19, 2017 01:17 IST

गुजरातमध्ये शीर्षस्थ नेत्यांच्या अपेक्षेनुसार जागांचा आकडा भाजपाला गाठता आला नाही. यावरून गुजरातमध्ये विकास ‘वेडा’ झाल्याचे काही अंशी तरी खरे ठरलेच; शिवाय या वेळी भाजपाची विश्वासार्हता घसरल्यावर शिक्कामोर्तब झाले.

गुजरातमध्ये शीर्षस्थ नेत्यांच्या अपेक्षेनुसार जागांचा आकडा भाजपाला गाठता आला नाही. यावरून गुजरातमध्ये विकास ‘वेडा’ झाल्याचे काही अंशी तरी खरे ठरलेच; शिवाय या वेळी भाजपाची विश्वासार्हता घसरल्यावर शिक्कामोर्तब झाले.पंतप्रधानपदाची वाटचाल करताना ‘गुजरात नो बेटो, देश नो नेतो’ अशी ज्यांची प्रतिमा तयार करण्यात आली, त्या मोदी व देशातील क्रमांक एकचा पक्ष असलेल्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या गृहराज्यात खरे तर त्यांच्या पक्षाला गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा मिळणे अपेक्षित होते. सहज खिशात घालता येणारी ही निवडणूक ठरायला हवी होती. विकासपुरुष म्हणून दर्शविल्या गेलेल्या, ज्या ‘प्रतिमे’वर गेल्या लोकसभा निवडणुकीचे मैदान या पक्षाने अगदी एकहाती जिंकले, त्याच प्रतिमेवर यंदा ही वाढ अपेक्षित होती. खुद्द मोदी यांनीच तशी १५० जागांची अपेक्षा बोलून दाखविली होती. परंतु हा पक्ष गेल्या वेळच्या ११५ जागांपेक्षाही मागे राहिला.नोटाबंदी, जीएसटीचा व्यापारीवर्गाला बसलेला फटका, पटेल व शेतकरी आंदोलनाची झळ, धार्मिक ध्रुवीकरण टाळण्यासाठी काँग्रेसनेही अनुसरलेला मंदिरमार्ग व या सर्वांच्या जोडीला सोशल इंजिनीअरिंग घडवून आणण्यात काँग्रेसला आलेले यश यामुळे देशाचे नेतृत्व करणाºया नेत्यांना यंदा घरच्या अंगणात उठाबशा काढाव्या लागल्या. तीन-चार दशकांपासून राजकारण करणाºया मोदी-शहा यांना राहुल गांधींसह हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर व जिग्नेश मेवाणी यांच्यासारख्या तरुणांनी जेरीस आणले. सत्तेपर्यंत पोहोचता आले नसले तरी, भाजपाची दमछाक करण्यात काँग्रेसला यश आले.टीका करून भाजपाने विरोधकांचे महत्त्व वाढवले-तीन वर्षांत दोन मुख्यमंत्री बदलूनही विकासाचा मुद्दा चालविण्याऐवजी काँग्रेस व विशेषत: राहुल गांधी विरोधावर प्रचारात भर दिल्याने विरोधकांचेच महत्त्व अधोरेखित झाले.अतिआत्मविश्वास राखणाºया भाजपाला गोध्रा, वाघोडिया, जंबुसर, अकोटा, शहरवाडी, कलोल आदी अनेक ठिकाणची बंडखोरी टाळण्यात आलेले अपयश मतविभागणीला निमंत्रण देणारे ठरले.विकासासोबतच राज्यातील सर्व जाती, समूहांमध्ये व विशेषत: व्यापारी, शेतकरी आदी वर्ग विशेषांमध्ये सत्ताधाºयांना आपल्या प्रतिची विश्वासार्हता निर्माण करता येणे अपेक्षित असते. संपूर्ण राज्यातील व खासकरून सौराष्ट्रातील निकाल पाहता ती विश्वासार्हता कमी झाल्याचे स्पष्ट झाले.राहुल गांधी यांचे सोशल इंजिनीअरिंग-पक्षाचे तरुण नेते राहुल गांधी यंदा स्वत: मोठ्या आत्मविश्वासाने प्रचारात सहभागी होते. शिवाय टिष्ट्वटरवरील प्रश्नमालिकेने त्यांचा ‘होमवर्क’ही पक्का असल्याचे दिसून आले.भाजपाच्या सततच्या सत्तेमुळे राज्यातील ग्रामपातळीपर्यंतचे कॉँग्रेसचे केडर नामशेष झाल्यासारखी स्थिती असली तरी पाटीदार, ओबीसी, दलित, आदिवासी असे सर्व समाज घटकांचे ‘सोशल इंजिनीअरिंग’ घडविण्यात यश आले.विकासाचे नाव घेताना धार्मिक ध्रुवीकरणात काँग्रेसला नेहमी खलनायक दर्शविण्याची भाजपाची आजवरची खेळी काँग्रेसने मंदिरमार्ग अनुसरून उलटविली.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी