शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

हृदयद्रावक! 13 तारखेला लग्न, 16 ला रिसेप्शन, 17 ला नवरदेवाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 1:55 PM

लग्नानंतर अवघ्या चार दिवसात नवरदेवाचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.

लग्नाच्या सीझनमध्ये बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण मुंगेर जिल्ह्य़ातील आहे, जिथे लग्न समारंभ सुरू असलेल्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लग्नानंतर अवघ्या चार दिवसात नवरदेवाचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील भुसा गली येथील दुर्गा प्रसाद यांचा एकुलता एक मुलगा 30 वर्षीय आशिष कुमार याचा विवाह 13 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला.

एकुलत्या एक मुलाच्या लग्नामुळे दुर्गा प्रसाद य़ांच्यासह संपूर्ण कुटुंब खूप आनंदी होते. वडिलांनी मुलाच्या लग्नात कोणतीही कसर सोडली नाही. पाटणा येथील रहिवासी अशोक कुमार सिंह आणि किरण कुमारी रंजन यांची मुलगी करिश्मा हिचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारीला लग्नाची मिरवणूक मुंगेरला परतली, तर 16 फेब्रुवारीला रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं.

17 फेब्रुवारीला करिश्मा माहेरी गेली. करिश्मा आई-वडिलांच्या घरी गेल्यानंतर आशिष त्याच्या घरी पाहुण्यांची सेवा करण्यात व्यस्त राहिला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत घरात विखुरलेल्या वस्तू त्याने व्यवस्थित केल्या आणि रात्री एक वाजण्याच्या सुमारास तो झोपण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तो वडिलांना फोन करू लागला.

आशिष पलंगावरून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. त्याचे वडील व इतर कुटुंबीय त्याच्या खोलीत पोहोचले तोपर्यंत आशिषचा मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी सदर रुग्णालयात आणले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. एकुलता एक मुलगा गमावल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :marriageलग्न