शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

हरित न्यायाधिकरणात एकल पीठांना मनाई, सुप्रीम कोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 04:24 IST

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) अध्यक्षांनी दिल्लीमधील मुख्य न्यायपीठात किंवा कोणत्याही क्षेत्रीय खंडपीठांमध्ये प्रकरणांच्या सुनावणीचे काम कोणाही एकल सदस्याकडे देऊ नये, असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) अध्यक्षांनी दिल्लीमधील मुख्य न्यायपीठात किंवा कोणत्याही क्षेत्रीय खंडपीठांमध्ये प्रकरणांच्या सुनावणीचे काम कोणाही एकल सदस्याकडे देऊ नये, असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.प्रत्येक प्रकरणाच्या सुनावणीसाठी एक न्यायिक सदस्य व एक तज्ज्ञ सदस्य यांचे द्विसदस्य खंडपीठच नेमले जावे, असा आदेशही सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला. हरित न्यायाधिकरणाच्या नियमावलीत केंद्र सरकारने अलीकडेच दुरुस्ती करून एकल सदस्यही प्रकरणांवर सुनावणी करू शकेल, अशी तरतूद केली. न्यायाधिकरणाच्या पुणे येथील पश्चिम क्षेत्रीय खंडपीठातील वकील संघटनेने त्यांचे अध्यक्ष अ‍ॅड. सौरभ कुलकर्णी यांच्यामार्फत याचिका करून यास आव्हान दिले आहे.केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी न्यायाधिकरणात सदस्यांच्या जागा मोठ्या संख्येने रिकाम्या असण्याची अडचण पुढे केली. त्यावर याचिकाकर्त्यांचे ज्येष्ठ वकील मुकुल रोहटगी म्हणाले की, सदस्यांच्या पुरेशा संख्येअभावी न्यायाधिकरण चालू शकत नसेल तर एकल सदस्याने ती बेकायदा चालविणे हा पर्याय नाही. न्यायाधिकरण बंद करून प्रकरणे उच्च न्यायालयाकडे पाठवावी. तज्ज्ञ सदस्य एकटे प्रकरणे ऐकत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.४० पैकी फक्त सहा सदस्यनियमित अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार १९ डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यापासून न्यायाधिकरणाचे काम कार्यवाहक अध्यक्ष न्या. यू. डी. साळवी पाहात आहेत. रिक्त जागा वेळीच भरल्या न गेल्याने सध्या न्यायाधिकरणावर४०पैकी फक्त सहा सदस्य आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाची द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणे अशक्य होऊन बसले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत