शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

क्षमाशिलतेमध्ये मोठेपणा आणि वसुधैव कुटुंबकमचा संदेश, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचं प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:28 IST

Vishnu Dev Sai News: छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी रायपूरमध्ये आयोजित सकल दिगंबर जैन समाजाद्वारे आयोजित मैत्री महोत्सवाला भेट दिली. पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑडिटोरियममध्ये पूज्य आर्यिकारत्न १०५ अंतर्मती माताजी ससंघ यांच्या सानिध्यात आयोजित गुरू शरणम्-मैत्री महोत्सव-क्षमादान उत्सवामध्ये आमदार राजेश मुणत, जैन समाजातील पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

रायपूर -  छत्तीसगडचेमुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी रायपूरमध्ये आयोजित सकल दिगंबर जैन समाजाद्वारे आयोजित मैत्री महोत्सवाला भेट दिली. पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑडिटोरियममध्ये पूज्य आर्यिकारत्न १०५ अंतर्मती माताजी ससंघ यांच्या सानिध्यात आयोजित गुरू शरणम्-मैत्री महोत्सव-क्षमादान उत्सवामध्ये आमदार राजेश मुणत, जैन समाजातील पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी मंचावर पूज्य आर्यिकारत्न १०५ अंतर्मती माताजी ससंघ यांना श्रीफळ भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी जैन समाजातील पारंपरिक पगडी आणि शाल घालून मुख्यमंत्र्यांना सन्मानित करण्यात आले. तर या प्रसंगी मु्ख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले. तसेच आचार्य विद्यासागर कल्याण सेवा संस्थानच्या लोगोचं अनावरण केलं.

मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी सांगितले की, मैत्री महोत्सव हा केवळ एक कार्यक्रम नाही तर आत्मिक जागृती आणि शुद्धिकरणाचा पावन उत्सव आहे. भारताची ही पुण्यभूमी केवळ संस्कृतीची जननीच नाही तर आध्यात्मिकतेची जिवंत प्रयोगशाळा राहिलेली आहे. येथे धर्म केवळ पूजेपर्यंत मर्यादित नाही तर तो जीवन जगण्याची कला आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भगवान महावीर स्वामी यांनी जगा आणि जगू द्या हा संदेश दिला. हल्लीच साजऱ्या झालेल्या क्षमादान पर्वाचं सारही हेच आहे. क्षमाशिलता हाच मोठेपणा आहे आणि हाच वसुधैव कुटुंबकमचा खरा संदेश आहे. जैन धर्माने या भावनेला सर्वात सुंदर आणि सखोलतेने प्रस्तुत केले आहे. जैन समाज हा परोपकारी आहे आणि त्याच्या सेवाभावाचा लाभ हा छत्तीसगडला सातत्याने मिळत राहील, असा विश्वासही विष्णुदेव साय यांनी यावेळी व्यक्त केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Chhattisgarh CM Emphasizes Forgiveness, 'Vasudhaiva Kutumbakam' at Jain Event.

Web Summary : Chhattisgarh Chief Minister Vishnu Deo Sai attended a Jain community event in Raipur, highlighting forgiveness as greatness and the essence of 'Vasudhaiva Kutumbakam'. He praised the Jain community's selfless service to Chhattisgarh, emphasizing their profound contribution to spiritual and cultural values.
टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडChief Ministerमुख्यमंत्री