शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
6
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
7
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
8
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
9
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
10
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
11
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
12
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
13
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
14
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
15
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
16
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
17
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
18
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
19
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
20
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

क्षमाशिलतेमध्ये मोठेपणा आणि वसुधैव कुटुंबकमचा संदेश, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचं प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:28 IST

Vishnu Dev Sai News: छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी रायपूरमध्ये आयोजित सकल दिगंबर जैन समाजाद्वारे आयोजित मैत्री महोत्सवाला भेट दिली. पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑडिटोरियममध्ये पूज्य आर्यिकारत्न १०५ अंतर्मती माताजी ससंघ यांच्या सानिध्यात आयोजित गुरू शरणम्-मैत्री महोत्सव-क्षमादान उत्सवामध्ये आमदार राजेश मुणत, जैन समाजातील पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

रायपूर -  छत्तीसगडचेमुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी रायपूरमध्ये आयोजित सकल दिगंबर जैन समाजाद्वारे आयोजित मैत्री महोत्सवाला भेट दिली. पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑडिटोरियममध्ये पूज्य आर्यिकारत्न १०५ अंतर्मती माताजी ससंघ यांच्या सानिध्यात आयोजित गुरू शरणम्-मैत्री महोत्सव-क्षमादान उत्सवामध्ये आमदार राजेश मुणत, जैन समाजातील पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी मंचावर पूज्य आर्यिकारत्न १०५ अंतर्मती माताजी ससंघ यांना श्रीफळ भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी जैन समाजातील पारंपरिक पगडी आणि शाल घालून मुख्यमंत्र्यांना सन्मानित करण्यात आले. तर या प्रसंगी मु्ख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले. तसेच आचार्य विद्यासागर कल्याण सेवा संस्थानच्या लोगोचं अनावरण केलं.

मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी सांगितले की, मैत्री महोत्सव हा केवळ एक कार्यक्रम नाही तर आत्मिक जागृती आणि शुद्धिकरणाचा पावन उत्सव आहे. भारताची ही पुण्यभूमी केवळ संस्कृतीची जननीच नाही तर आध्यात्मिकतेची जिवंत प्रयोगशाळा राहिलेली आहे. येथे धर्म केवळ पूजेपर्यंत मर्यादित नाही तर तो जीवन जगण्याची कला आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भगवान महावीर स्वामी यांनी जगा आणि जगू द्या हा संदेश दिला. हल्लीच साजऱ्या झालेल्या क्षमादान पर्वाचं सारही हेच आहे. क्षमाशिलता हाच मोठेपणा आहे आणि हाच वसुधैव कुटुंबकमचा खरा संदेश आहे. जैन धर्माने या भावनेला सर्वात सुंदर आणि सखोलतेने प्रस्तुत केले आहे. जैन समाज हा परोपकारी आहे आणि त्याच्या सेवाभावाचा लाभ हा छत्तीसगडला सातत्याने मिळत राहील, असा विश्वासही विष्णुदेव साय यांनी यावेळी व्यक्त केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Chhattisgarh CM Emphasizes Forgiveness, 'Vasudhaiva Kutumbakam' at Jain Event.

Web Summary : Chhattisgarh Chief Minister Vishnu Deo Sai attended a Jain community event in Raipur, highlighting forgiveness as greatness and the essence of 'Vasudhaiva Kutumbakam'. He praised the Jain community's selfless service to Chhattisgarh, emphasizing their profound contribution to spiritual and cultural values.
टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडChief Ministerमुख्यमंत्री