शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

महात्मा गांधी भारतरत्न वा अन्य किताबांपेक्षा खूप मोठे - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 5:28 AM

मात्र सरकारला आम्ही निर्देश देऊ शकत नाही

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी हे भारतरत्न वा अन्य कोणत्याही किताबापेक्षा खूप मोठे आहेत. त्यांना अशा कोणत्याही औपचारिक मान्यतेची आवश्यकता नाही, असे सांगून गांधीजींना भारतरत्न किताब देण्यास केंद्र सरकारला आदेश द्यावेत, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.

महात्मा गांधी हे सर्वांसाठी राष्ट्रपिता आहेत आणि सर्वांना त्यांच्याविषयी कमालीचा आदर आहे. भारतरत्न वा अन्य कोणत्याही औपचारिक किताब वा पुरस्कारापेक्षा त्यांची उंची खूपच मोठी आहे. शिवाय त्यांना भारतरत्न हा किताब द्यावा, अशा सूचना आम्ही सरकारला देऊ शकत नाही, असे सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. भूषण गवई व न्या. सूर्य कांत यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

अनिल दत्त शर्मा यांनी महात्मा गांधी यांना भारतरत्न किताबाने भूषविण्यात यावे, अशी याचिका केली होती. ती सुनावणीला आली, तेव्हा सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले की, महात्मा गांधी यांना भारतरत्न देण्यासाठीच्या तुमच्या भावना आम्ही भावना समजू शकतो. महात्मा गांधी यांना भारतरत्न द्यावे, अशी विनंती तुम्ही केंद्र सरकारला करू शकता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMahatma Gandhiमहात्मा गांधी