शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

"न्यूटनने नंतर सांगितले, वैदिक ग्रंथांमध्ये आधीपासून उल्लेख"; गुरुत्वाकर्षणाबाबत हरिभाऊ बागडेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 10:27 IST

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी गुरुत्वाकर्षणाबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.

Rajasthan Governor Haribhau Bagde: माजी सभापती आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झालीय. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणाऱ्या आयझॅक न्यूटनबाबत राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मोठं विधान केलं आहे. न्यूटनच्याही आधी गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख वैदिक ग्रंथांमध्ये असल्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं. खूप आधीपासूनच वैदिक ग्रंथांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत उल्लेख असल्याचा दावा हरिभाऊ बागडे यांनी केला. त्यामुळे आता हरिभाऊ बागडे यांनी केलेल्या विधानावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या जयपूर प्रादेशिक केंद्रात आयोजित दीक्षांत समारंभात हरिभाऊ बागडे बोलत होते. भारत हे प्राचीन काळापासून ज्ञान आणि विज्ञानाचे केंद्र आहे. भारतातील नालंदा विद्यापीठासारख्या प्रसिद्ध संस्थेने जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित केल्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं. 

"न्यूटनने गुरुत्वाकर्षणाबद्दल खूप नंतर सांगितले. भारतात याचा उल्लेख वैदिक ग्रंथांमध्ये फार पूर्वीपासून आहे. भारताचे प्राचीन ज्ञान पुसून टाकण्याचे सतत प्रयत्न केले जात होते. ११९० च्या दशकात नालंदा ग्रंथालय जाळण्यात आलं होतं. इंग्रज आल्यानंतर त्यांनी भारतीय ज्ञान दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देशातील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवणे आणि त्यांना भारतीय ज्ञान आणि विज्ञानाशी जोडणे आवश्यक आहे," असं हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं.

"भारत देश हा प्राचीन काळापासून ज्ञान आणि विज्ञानाने समृद्ध आहे. भारतात नालंदासारखे मोठे विद्यापीठ होते. दूरदूरचे विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येत असत. भारतीय ज्ञान नष्ट करण्याचे सतत प्रयत्न होत होते पण ते यशस्वी झाले नाहीत. प्राचीन काळापासून भारत ज्ञान परंपरेत श्रेष्ठ आहे. भारताने जगाला दशांश प्रणाली दिली," असंही हरिभाऊ बागडे म्हणाले.

राजस्थान ही योद्ध्यांची भूमी असल्याचे सांगत बाप्पा रावल यांनी शंभर वर्षे परकीय आक्रमकांना येथे येऊ दिले नाही, असंही हरिभाऊ बागडेंनी म्हटलं.  शिकण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. विद्यार्थ्यांनीही त्यांची बौद्धिक क्षमता वाढवणारी आणि जीवनात यशस्वी होण्यास मदत करणारी पुस्तके वाचली पाहिजेत. रोजगार मिळवण्याची मानसिकता न ठेवता रोजगार देणारे बनण्याची मानसिकता ठेवायला हवी, असं हरिभाऊंनी म्हटलं. यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी व पदके प्रदान करण्यात आली. 

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेRajasthanराजस्थान