शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नोकरी सोडायची असल्यास आरबीआय गव्हर्नरने सरकारला नडावे : मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 12:37 IST

आरबीआय गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांमधील वादावरून मनमोहन सिंग यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे.

नवी दिल्ली : आरबीआय गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांमधील वादावरून मनमोहन सिंग यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे. मनमोहन यांनी त्याच्या मुलीने लिहिलेल्या पुस्तकात म्हटले होते, की अर्थमंत्रीपद हे आरबीआय गव्हर्नरपेक्षा वरचे असते. मनमोहन सिंग हे आरबीआय गव्हर्नरही होते. हा गव्हर्नर सरकारला तेव्हाच नडू शकतो, जेव्हा त्याने नोकरी सोडण्याचे ठरविले असले पाहिजे, असे या पुस्तकात म्हटले आहे. हे पुस्तक 2014 मध्ये प्रकाशित झाले होते. 

आरबीआयमधील काम केलेल्या दिवसांची आठवण सांगताना सिंग यांनी गव्हर्नरला कोणताही निर्णय घेताना आधी सरकारची मंजुरी घ्यावी लागते. अर्थमंत्र्यांचे पद मोठे असल्याने गव्हर्नरला त्यांच्या सूचना टाळता येत नाहीत. जर त्याला नोकरी सोडायची असेल तरच तो मंत्र्यांशी वाद घालू शकतो, असे म्हटले आहे. 

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सिंग हे गव्हर्नर होते. त्यावेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मी त्यांना आरबीआयची भुमिका स्पष्ट केली आणि इच्छा नसेल तर निर्णय फेटाळण्यासही सांगितले होते. ती एक सरकारी योजना होती. सरकारने आरबीआयला आदेश देऊन हा वाद संपवला, अशीही आठवण त्यांनी या पुस्तकामध्ये दिली आहे. दमन सिंग यांनी स्ट्रिक्टली पर्सनल: मनमोहन गुरुशरण हे पुस्तक लिहिले आहे. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकUrjit Patelउर्जित पटेलManmohan Singhमनमोहन सिंग