अल्पसंख्याकांमध्ये घबराट निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न

By Admin | Updated: July 4, 2015 00:05 IST2015-07-04T00:05:58+5:302015-07-04T00:05:58+5:30

- खा. अशोक चव्हाणांचा आरोप

Government's efforts to create panic among the minorities | अल्पसंख्याकांमध्ये घबराट निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न

अल्पसंख्याकांमध्ये घबराट निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न

-
ा. अशोक चव्हाणांचा आरोप
मुंबई : मदरशातील विद्यार्थ्यांना शाळाबाह्य ठरविण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा तीव्र विरोध असून सरकारचा हा निर्णय अल्पसंख्याक समाजात घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारचा हा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या धोरणाला छेद देणारा आहे. मुस्लीम समाजातील केवळ ४ टक्के मुले मदरशात शिक्षण घेत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. शिवाय येथील शिक्षणही दर्जेदार असते. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे चव्हाण म्हणाले.
कर्जमाफी न मिळाल्याने गेल्या सहा महिन्यांत राज्यात १०५९ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे येत्या ९ व १० जुलै रोजी संपूर्ण राज्यात मोर्चे, निदशर्ने, धरणे आदींच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतरही सरकारने कजर्माफी न दिल्यास विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटतील, असा इशारा त्यांनी दिला.
कजर्मुक्ती आंदोलनाची जिल्हानिहाय जबाबदारी विविध नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुणे व सातारा जिल्ह्यातील आंदोलनांचे नेतृत्व करणार असून, नारायण राणे सिंधुदूर्ग व रत्नागिरीतील आंदोलनांची धुरा सांभाळतील. अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन होईल. या व्यतिरिक्त आ. पतंगराव कदम (सांगली व कोल्हापूर), आ.बाळासाहेब थोरात (नाशिक), आ. माणिकराव ठाकरे (वाशिम व अकोला), रोहिदास पाटील (धुळे व जळगाव), खा. राजीव सातव (हिंगोली), आ. विजय वडे˜ीवार (चंद्रपूर), हर्षवर्धन पाटील (सोलापूर), रविशेठ पाटील (रायगड), आ. नसीम खान (ठाणे), आ. डी.पी. सावंत (नांदेड व परभणी), आ. रणजित कांबळे (वर्धा), आ. अब्दुल सत्तार (जालना), आ. अमित देशमुख (लातूर व बीड), आ. मधुकरराव चव्हाण (उस्मानाबाद), आ. गोपालदास अग्रवाल (गोंदिया), राजेंद्र गावीत (पालघर), पद्माकर वळवी (नंदूरबार), शिवाजीराव मोघे (बुलडाणा व यवतमाळ), वसंत पुरके (अमरावती), नितीन राऊत (नागपूर व भंडारा), नामदेव उसेंडी (गडचिरोली) आदी नेतेही या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत
----
भाजपा मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या आरोपांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मदरशांबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याची, खळबळ माजविण्याची ही भाजपाची जुनी नीती
- खा. अशोक चव्हाण

Web Title: Government's efforts to create panic among the minorities