शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

गायींच्या संरक्षणासाठी सरकारचं ठोस पाऊल, 'गो कॅबिनेट'ची स्थापना होणार

By महेश गलांडे | Updated: November 18, 2020 14:43 IST

राज्यात गो कॅबिनेटच्या स्थापनेसंदर्भातील पहिली बैठक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता घेण्यात येणार आहे, याचदिवशी गोपाळ अष्टमीही साजरी होत आहे. गौ अभयारण्य सालरिया आग्रा मालवा येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.

ठळक मुद्देराज्यात गो कॅबिनेटच्या स्थापनेसंदर्भातील पहिली बैठक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता घेण्यात येणार आहे, याचदिवशी गोपाळ अष्टमीही साजरी होत आहे. गौ अभयारण्य सालरिया आग्रा मालवा येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.

भोपाळ - मध्य प्रदेश सरकारने गाय संरक्षणासाठी गो कॅबिनेट स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. गोपाळाष्टमीच्या दिवशी गो कॅबिनेटची पहिली बैठक पार पडणार आहे.  या कॅबिनेटअंतर्गत पशुपालन, वन, पंचायत आणि ग्रामीण विकास, अर्थ, गृह आणि शेतकरी कल्याण विभागाचाही समावेश करण्यात येणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. 

राज्यात गो कॅबिनेटच्या स्थापनेसंदर्भातील पहिली बैठक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता घेण्यात येणार आहे, याचदिवशी गोपाळ अष्टमीही साजरी होत आहे. गौ अभयारण्य सालरिया आग्रा मालवा येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या कॅबिनेट बैठकीसाठी 6 विभागांचा सहभाग असणार आहे. गायींच्या संरक्षणासाठी सर्वच विभाग सामूहिकरित्या यासंदर्भात चर्चा करणार आहेत. 

पशुपालन विभागाकडूनच गायींच्या संरक्षण आणि प्रजननासंदर्भात काळजी घेईल. त्यासोबतच वन विभागही गायींच्या संरक्षणासाठी ठोस पाऊल उचलेल. गृह विभागाकडे संरक्षणाची जबाबदारी देण्यात येईल. राज्य सरकारने घोषणा केल्यानंतर हे सर्वच सहाही विभाग तयारीला लागले आहेत. त्यामुळेच, पहिल्या कॅबिनेट बैठकीत नेमके कोणते निर्णय घेतले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवराज सरकार निश्चितच गायींच्या संरक्षणासाठी ठोस निर्णय घेणार असल्याचे समजते.

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा

महाराष्ट्रातील युती सरकारने 1995 मध्ये गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याचा मसुदा तयार केला होता. त्यात केंद्राने सुधारणा करण्याची सूचना राज्याला केली होती. 30 जानेवारी 1996 रोजी तसा सुधारित प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला होता. गोवंशामध्ये गाय, बैल, वासरू, वळू यांचा समावेश राहील. आजवर गाय किंवा बैल आजारी असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र मिळविले जात होते आणि या जनावरांची कत्तल मोठ्या प्रमाणात सुरू होती. आता डॉक्टरांनाही प्रमाणपत्र देताना काळजी घ्यावी लागणार आहे. तब्बल 19 वर्षांपासून रखडलेल्या गोवंश हत्या बंदी कायद्यावर 2015 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केल्याने महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला. हा कायदा महाराष्ट्रासाठी असून अन्य राज्यांनाही तो त्यांच्या राज्यात लागू करता येऊ शकतो; मात्र तो अधिकार राज्यांचा असणार आहे.

टॅग्स :cowगायMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान