शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींना दंड करण्याचा मूर्खपणा सरकार करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 04:33 IST

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर आक्षेप घेण्याची प. बंगाल सरकारची भूमिका अगदी न्याय्य आहे.

कोलकाता : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसाठी (एनपीआर) विचारली जाणारी माहिती अनुचित आहे, अशा ठाम समजुतीने देशातील कोट्यवधी नागरिकांनी ती माहिती देण्यास नकार दिला तर त्या सर्वांना दंडित करण्याचा मूर्खपणा मोदी सरकार करणार नाही, अशी अपेक्षा आहे, असा उपरोधिक टोला ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी शनिवारी येथे मारला.सुधारित नागरिकत्व कायद्याच्या संदर्भात नेमकी कोणती भूमिका घ्यावी याचे प्रशिक्षण देण्यासाठी आलेले चिदम्बरम पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, सुधारित नागरिकत्व कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर आक्षेप घेण्याची प. बंगाल सरकारची भूमिका अगदी न्याय्य आहे. यावरून निर्माण होणारी कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती, लोकांचा असलेला व्यापक विरोध, हे काम करण्यात राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची अनुत्सुकता व माहिती देण्यास तयार नसलेल्या लोकांनी घरे बंद करून घेण्याचे त्यांना येणार हे अनुभव या सर्वाचे दाखल देऊन हा कायदा राबविणयस राज्याने विरोध करण्यात काहीच गैर नाही.जनगणना व ‘एनपीआर’च्या कामात सहकार्य मिळविण्यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यांच्या प्रतिनिधींची शुक्रवारी बैठक बोलाविली होती. प. बंगालचे प्रतिनिधी बैठकीला गेले नाहीत. मात्र काँग्रेसशासित राज्यांचे प्रतिनिधी गेले होते. यावरून विरोधकांमध्ये फाटाफूट पडल्याचे चित्र दिसते, असे वाटत नाही का, असे विचारता चिदम्बरम महणाले की, बैठकीला जाणे याचा अर्थ तो कायदा मान्य करणे असे नाही. केंद्राने बैठक बोलावल्यावर राज्यांनी आपले प्रतिनिधी पाठविणे व दोन्ही बाजूंनी परस्परांची मते व विचार समजावून घेणे ही योग्य पद्धत आहे. अनेक राज्यांच्या मुख्य सचिवांनी या कायद्यातील त्रुटी बैठकीत मांडल्या.एनपीआरसाठी माहिती गोळा करणारजनगणनेसाठी प्रगणक १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात घरोघरी जातील तेव्हा ते ‘एनपीआर’साठीही माहिती गोळा करणार आहेत. जे कोणी याला सहकार्य करणार नाहीत त्यांना दंडित करण्याची कायद्यात काही तरतूद आहे का, असे विचारता चिदम्बरम म्हणाले की, तसे होणार नाही, अशी अपेक्षा आहे. दंडित करायचे म्हटल्यास कोट्यवधी लोकांना करावे लागेल. असा मूर्खपणा मोदी सरकार करेल, असे वाटत नाही.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा